शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

न्यायिक मागण्यांसाठी पेन्शनधारक रस्त्यावर, मोर्चा काढून जिल्हा कचेरीवर धडक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2018 14:58 IST

न्यायिक मागण्यांसाठी गुरुवारी निवृत्त कर्मचारी समन्वय समितीच्या नेतृत्त्वात जिल्ह्यातील पेन्शन धारकांनी मोर्चा काढून जिल्हा कचेरीवर धडक दिली.

वर्धा : न्यायिक मागण्यांसाठी गुरुवारी निवृत्त कर्मचारी समन्वय समितीच्या नेतृत्त्वात जिल्ह्यातील पेन्शन धारकांनी मोर्चा काढून जिल्हा कचेरीवर धडक दिली. स्थानिक झाशी राणी चौकातून काढण्यात आलेला मोर्चा दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास डॉ. आंबेडकर पुतळा परिसरात पोहोचल्यावर तो पोलिसांनी अडविला. त्यानंतर विविध मागण्यांचे निवेदन आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले.सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा लाभ पेन्शन धारकांना देण्यात यावा. ईपीएफओच्या पेन्शनर विरोधी तसेच कोर्ट निर्णय विरोधी भूमिकेच्या विरोधात देशातील अनेक उच्च न्यायालयांमध्ये पेन्शनरांचे दावे दाखल आहेत. ती सरकारसाठी चांगली गोष्ट नाही. उद्योग आणि सेवा क्षेत्रामध्ये निवृत्त पेन्शन धारकांनी जे योगदान दिले त्याच्याच भरवशावर आज देश महाशक्ती बनू पाहत आहे. परंतु अशाच पेन्शन धारकांवर सध्या उपाशी राहण्याची वेळ आली आहे. इतकेच नव्हे तर लोकप्रतिनिधींच्या मानधनात भरघोस वाढ केली जात आहे.सर्व ईपीएस पेन्शनधारकांना किमान नऊ हजार रुपये महागाई भत्ता व पेन्शन देण्यात यावी. अंतर्गत वाढीसाठी त्वरित प्रयत्न करण्यात यावे. कमिटी क्र. १४७ अन्वये पेन्शन आणि महागाई भत्ता लागू करावा. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय दोन्ही प्रकारच्या कर्मचा-यांना भेदभाव न करता विना अट लागू करण्यात यावा. सर्वांच्या आरोग्यासाठी ईएसआय लागू करून ईएसआय व्यवस्था सक्षम करण्यात यावी. कम्युटेशन रक्कम पुनर्स्थापित करण्यासाठी सीबीटीचा जो पूर्वी दिलेला निर्णय लागू करण्यात यावा.पेन्शन कम्युटेशन आणि आरओसी सुविधा पुनश्च लागू करण्यात यावी. पेन्शन धारकांना सुविध व्हावी म्हणून जीवन प्रमाणपत्रची कार्यवाही स्थानिक बँक खात्यांद्वारे करण्यात यावी आदी मागण्या या आंदोलनादरम्यान आंदोलनकर्त्यांनी केल्या. सदर मागण्यांचे निवेदन जिल्हाधिका-यांना आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाने सादर केले. आंदोलनाचे नेतृत्त्व प्रकाश येंडे, भिमराव डोंगरे, पुंडलिक पांडे यांनी केले. मोर्चात मोठ्या संख्येने पेन्शनधारक सहभागी झाले होते.