शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
3
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
4
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
5
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
6
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
7
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
8
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
9
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
10
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
11
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
12
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
13
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
14
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
15
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
16
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
17
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
18
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
19
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
20
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण

कामे प्रलंबितच, देयके मात्र ‘क्लियर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 1:02 AM

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना सिंचनाची सुविधा मिळावी म्हणून केंद्र व राज्य शासनाने पॅकेजच्या विहिरी दिल्या. वीज पुरवठ्याची सोय करून दिली; पण ही मोहीम राबविणारी यंत्रणाच भ्रष्ट असल्याने योजनेवर प्रश्नचिन्ह लागले.

ठळक मुद्देकृषीपंपाच्या वीज जोडणीतील प्रकार : जिल्ह्यातील ३ हजार ४०० शेतकरी प्रतीक्षेत

प्रशांत हेलोंडे।ऑनलाईन लोकमत वर्धा : आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना सिंचनाची सुविधा मिळावी म्हणून केंद्र व राज्य शासनाने पॅकेजच्या विहिरी दिल्या. वीज पुरवठ्याची सोय करून दिली; पण ही मोहीम राबविणारी यंत्रणाच भ्रष्ट असल्याने योजनेवर प्रश्नचिन्ह लागले. जिल्ह्यातील ३४०० शेतकरी आजही वीज जोडणीची प्रतीक्षा करीत आहे; पण यातील कंत्राटदारांची देयके मात्र कामे होण्यापूर्वीच ‘क्लियर’ केलीत.वीज जोडणी न मिळाल्याने शेतकरी कार्यालयात चकरा मारून थकले; पण वास्तव काही औरच आहे. वीज पुरवठ्याची जोडणी होण्यापूर्वीच लाखो रुपयांची देयके अदा केलीत. या प्रकरणी राज्याचे उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे जिल्ह्यातील शेतकºयांनी तक्रारी केल्या आहेत.महावितरण अधीक्षक अभियंता वर्धा कार्यालयांतर्गत कार्यकारी अभियंता वर्धा, हिंगणघाट, आर्वी असे तीन विभाग आहे. या विभागांनाही अधीक्षक अभियंत्यांनी स्वत:च्या मर्जीतील एजेंसी नेमून त्यांना कामे दिली आहे. ही कामे कुठे सुरू झाली तर काही ठिकाणी सुरूवातही झाली नाही; पण अ‍ॅडव्हान्स देयके अदा करण्यात आली आहेत. शेतकºयांच्या हक्काची ही योजना भ्रष्टाचाराच्या मार्गात अडकल्याने जिल्ह्यातील ३४०० शेतकरी वीज जोडणीच्या प्रतीक्षेत आहेत. वारंवार मागणी करूनही सातत्याने दुर्लक्ष केले जात आहे.सध्या रबी हंमाग सुरू झाला आहे. विहिरीवरून शेतातील सिंचनाची व्यवस्था करण्यासाठी वीज जोडणी गरजेची आहे. त्यांना त्वरित जोडणी देण्याची गरज आहे. मागील वर्षी मोठ्या प्रमाणात वीज जोडणीची कामे करण्यात आलीत; पण २०१७-१८ या वर्षात कुठेही वीज जोडणीची कामे झाली नाहीत. याबाबत वीज वितरण कंपनीला विचारणा केली असता एप्रिल २०१८ पासून आजपर्यंत निधीच आला नाही. मागील वर्षीच्या निधीतूनच कामे केली जात आहेत. यामुळे गतवर्षी काढलेली अ‍ॅडव्हान्स बिले आतापर्यंत पुरली काय, कामे झाली तर त्याचे आॅडीट गेले कुठे, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. या प्रश्नांची उत्तरे अधिकाºयांकडेही नसल्याने ते टाळाटाळ करीत असल्याचे दिसून आले. वीज जोडणी देण्यापूर्वीच कंत्राटदारांची देयके अदा करण्यात आली आहेत. यामुळे महावितरणच्या कार्यावरच संशय निर्माण होत असून चौकशी गरजेची आहे.शासनाची दिशाभूलकृषीपंप जोडणीच्या कामासाठी शासनाने मागील वर्षी निधी उपलब्ध करून दिला होता. या निधीतून अधिकाºयांनी अ‍ॅडव्हॉन्स काढून ठेवला आहे. काहींची बिले दिलीत. आता नेमलेल्या एजेंसी काम करण्यास टाळाटाळ करीत आहे. शेतकरी मात्र न्यायासाठी भटकंती करीत आहे. मागील वर्षीचा निधी पूर्ण खर्च झाला, असे दाखवून शासनाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू आहे.अभियंत्याचा प्रतापकृषीपंप जोडणीच्या कामांची देयके आर्वी येथील उपकार्यकारी अभियंता देशमुख यांनी मर्जीतील कंत्राटदारांना अ‍ॅडव्हान्समध्ये अदा केली. देशमुख यांनी जोडणीपूर्वीच देयके अदा केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. या प्रकरणाची चौकशी करून योग्य कार्यवाही करणे तथा उर्वरित वीज जोडण्या त्वरित देण्याची गरज निर्माण झाली आहे.कृषी पंप जोडणीच्या कामासाठी मागील वर्षी प्राप्त झालेला निधी खर्च करणे सुरू आहे. यावर्षी कुठलाही निधी आलेला नाही. ‘अ‍ॅडव्हान्स’ देयके देणाºया अधिकाºयांवर कारवाई करण्यात येईल.- सुनील देशपांडे, अधीक्षक अभियंता, वीज वितरण कंपनी, वर्धा.