शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

हातगाडीधारक नियोजित स्थळी न गेल्यास दंडात्मक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2018 22:43 IST

शहरातील रस्ते मोकळे व्हावे या हेतूने स्थानिक पालिकेच्यावतीने अतिक्रमण हटाव मोहीम होती घेण्यात आली आहे.

ठळक मुद्देमुख्याधिकाऱ्यांच्या सूचना : सुटीच्या दिवशी अतिक्रमण हटाव मोहीम

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहरातील रस्ते मोकळे व्हावे या हेतूने स्थानिक पालिकेच्यावतीने अतिक्रमण हटाव मोहीम होती घेण्यात आली आहे. सुट्टीचा दिवस असलेल्या रविवारी न.प.चा गजराज बजाज चौक ते शास्त्री चौक या मार्गावरील अतिक्रमणावर चालला. बजाज चौकात नेहमीच होणाºया वाहतूक कोंडीचे खापर न.प.च्या माथी फोडल्या जात असल्याने मुख्याधिकारी अश्विनी वाघमळे यांनी हातगाड्यांवर फळविक्रीचा व्यवसाय करणाऱ्यांना काही मार्गदर्शक सुचना करीत त्याचे पालन न केल्यास दंडात्मक कारवाईला सोमोरे जावे लागेल, असे सांगितले.स्थानिक शिवाजी चौक ते बजाज चौक भागातील अतिक्रमण शनिवारी काढल्यानंतर रविवारी न. प. च्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपला मोर्चा बजाज चौक ते शास्त्री चौक या मार्गाकडे वळविला. रविवारी जेसीबीच्या सहाय्याने पालिका कर्मचाऱ्यांनी सदर रेल्वे स्थानक मार्गावरील ठिकठिकाणचे अतिक्रमण काढले. बजाज चौकात हातगाडीवाले रस्त्याच्या मधोमधच हातगाडी उभी करून फळ विक्रीचा व्यवसाय करतात. या परिसरात दररोज दोन वाहतुक शिपायांची नियुक्ती केली जात असली तरी वाहतूक नियंत्रण शाखेचे वरिष्ठ अधिकारी आल्यावर किंवा त्यांचे चारचाकी वाहन आल्यावरच बजाज चौक परिसरात रस्त्याच्या मधोमध हातगाडी उभी करून फळविक्री करणारे आपली हातगाडी इतर ठिकाणी हलवितात. न. प. मुख्याधिकारी वाघमळे यांनी रविवारी मोहिमेदरम्यान स्वत: हातगाडीधारकांना न.प.ने निश्चित करून दिलेल्या शास्त्री चौकातील जागेवर बंडी लावावी. शिवाय हातगाड्या लोकांना त्रास व वाहतुकीला अडथळा निर्माण होईल अशा लावल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल आदी सूचना केल्या.कचरा न.प.च्या कचरापेटीत टाकास्वच्छ सर्वेक्षण २०१८ च्या अनुषंगाने स्थानिक न.प.प्रशासनाच्यावतीने वर्धा शहरात स्वच्छतेबाबतचा जागर केल्या जात आहे. हातगाडीवर फळ व इतर साहित्य विक्री करणाऱ्यांनी कुठल्याही परिस्थितीत कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळावा. शिवाय त्यांनी त्यांच्याकडे गोळा होणारा कचरा रस्त्याच्याकडेला न टाकता ठिकठिकाणी न.प.ने लावलेल्या कचरापेटीत टाळावा, अशा सुचनाही याप्रसंगी न.प. मुख्याधिकारी अश्विनी वाघमळे यांच्यासह न.प. अधिकारी व कर्मचाºयांनी केल्या. कमी जाडीच्या प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर कुठल्याही व्यावसायिकांनी केल्यास त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असेही यावेळी छोट्या व्यावसायिकांना सांगण्यात आले.