शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
2
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
3
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
4
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
5
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
6
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
7
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
8
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
9
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
10
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
11
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
12
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
13
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
14
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
15
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
16
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
17
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
18
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
19
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
20
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसच्या जनसंपर्क कार्यालयात शांतता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2019 23:40 IST

लोकसभा निवडणुकीतील मतदानाअंती विविध चर्चा रंगल्या होत्या. ग्रामीण भागात भाजप सरकारविरुद्ध असलेला रोष काँग्रेसला मदत करणारा ठरेल, असा अंदाज बांधला जात होता. त्यामुळे काँग्रेसच्या गोटातही आशा पल्लवित झाली होती. परंतु, सकाळपासून लागलेल्या धक्कादायक निकालाने काँग्रेसच्या आशेवर पाणी फेरले.

ठळक मुद्देस्थानिक नेत्यांसह पदाधिकारीही दिसेना : कार्यालयापुढील मंडपात केवळ वाहने

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : लोकसभा निवडणुकीतील मतदानाअंती विविध चर्चा रंगल्या होत्या. ग्रामीण भागात भाजप सरकारविरुद्ध असलेला रोष काँग्रेसला मदत करणारा ठरेल, असा अंदाज बांधला जात होता. त्यामुळे काँग्रेसच्या गोटातही आशा पल्लवित झाली होती. परंतु, सकाळपासून लागलेल्या धक्कादायक निकालाने काँग्रेसच्या आशेवर पाणी फेरले.काँग्रेसच्या उमेदवार महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष अ‍ॅड. चारुलता टोकस यांच्या निवडणुकीची सूत्रे रामनगरातील जनसंपर्क कार्यालयातूनच हलविण्यात आली. आजही मतमोजणीच्या दिवशी काँग्रेस कमिटीचे जिल्हा कार्यालय असलेल्या सद्भावना भवनाला सकाळपासून कुलूप होते. तर त्यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर कापडी मंडप टाकण्यात आला होता. मतमोजणी असल्यामुळे पदाधिकारी व कार्यकर्तेही जोमात होते. नव्या उमेदीने निवडणुकीच्या निकालाकडे त्यांचे लक्ष लागले होते. परंतु, पहिल्याच फेरीत भाजपचे रामदास तडस यांनी ७ हजार ८१६ मतांनी आघाडी घेतली. त्यानंतरच्या सर्वच फेरीत भाजपचे उमेदवार आघाडीवर राहिल्याने आपसुकच काँग्रेसच्या जनसंपर्क कार्यालयात शांतता पसरत गेली. त्यामुळे दुपारच्या सुमारास कार्यालयाकडे फेरफटका मारला असता कार्यालयात शुकशुकाट दिसून आला.सोबतच जनसंपर्क कार्यालयापुढे टाकलेल्या कापडी मंडपात केवळ वाहनेच दिसून आली. पाच वर्षांत ओसरलेली मोदी लाट त्सुनामीच्या वेगाने आल्याने काँग्रेसचे मताधिक्य सर्वत्र वाहून गेले.यातून गांधी जिल्ह्यातील महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष अ‍ॅड. चारुलता टोकस यांनाही पराभव पत्करावा लागला. पराभवाचा परिणाम जनसंपर्क कार्यालयातील वातावरणातून सकाळपासूनच दिसून येत होता. मतमोजणीच्या फेऱ्यातील मताधिक्याची तफावत लक्षात घेत दुपारपर्यंतच निवडणुकीतील चित्र स्पष्ट होताच अनेक कार्यकर्त्यांनी घराचा रस्ता धरला होता.स्थानिक नेते व पदाधिकाऱ्यांनी जनसंपर्क कार्यालयात न येता आपापल्या निवासस्थावरूनच मतमोजणीतील मताधिक्याचा आढावा घेतला.पहिल्या फेरीपासूनच मावळत गेली आशामतदार संघातील मतदानाचा कौल लक्षात घेता कोणताही पक्ष विजयाचा दावा करू शकत नव्हता. त्यामुळे काँग्रेसलाही विजयाची आशा होती. पण, पहिली फेरीच काँग्रेसला ७ हजार ८१६ मताने पिछाडीवर घेऊन गेली. त्यांनतरच्या प्रत्येक फेरीत काँग्रेसला कमी मते मिळत गेल्याने स्थानिक नेत्यांसह, पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आशा मावळत गेली. शेवटी मतदारांनी दिलेला कौल मान्य करण्याशिवाय काँग्रेसकडे दुसरा पर्याय राहिला नाही.

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकाल