शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

काँग्रेसच्या जनसंपर्क कार्यालयात शांतता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2019 23:40 IST

लोकसभा निवडणुकीतील मतदानाअंती विविध चर्चा रंगल्या होत्या. ग्रामीण भागात भाजप सरकारविरुद्ध असलेला रोष काँग्रेसला मदत करणारा ठरेल, असा अंदाज बांधला जात होता. त्यामुळे काँग्रेसच्या गोटातही आशा पल्लवित झाली होती. परंतु, सकाळपासून लागलेल्या धक्कादायक निकालाने काँग्रेसच्या आशेवर पाणी फेरले.

ठळक मुद्देस्थानिक नेत्यांसह पदाधिकारीही दिसेना : कार्यालयापुढील मंडपात केवळ वाहने

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : लोकसभा निवडणुकीतील मतदानाअंती विविध चर्चा रंगल्या होत्या. ग्रामीण भागात भाजप सरकारविरुद्ध असलेला रोष काँग्रेसला मदत करणारा ठरेल, असा अंदाज बांधला जात होता. त्यामुळे काँग्रेसच्या गोटातही आशा पल्लवित झाली होती. परंतु, सकाळपासून लागलेल्या धक्कादायक निकालाने काँग्रेसच्या आशेवर पाणी फेरले.काँग्रेसच्या उमेदवार महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष अ‍ॅड. चारुलता टोकस यांच्या निवडणुकीची सूत्रे रामनगरातील जनसंपर्क कार्यालयातूनच हलविण्यात आली. आजही मतमोजणीच्या दिवशी काँग्रेस कमिटीचे जिल्हा कार्यालय असलेल्या सद्भावना भवनाला सकाळपासून कुलूप होते. तर त्यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर कापडी मंडप टाकण्यात आला होता. मतमोजणी असल्यामुळे पदाधिकारी व कार्यकर्तेही जोमात होते. नव्या उमेदीने निवडणुकीच्या निकालाकडे त्यांचे लक्ष लागले होते. परंतु, पहिल्याच फेरीत भाजपचे रामदास तडस यांनी ७ हजार ८१६ मतांनी आघाडी घेतली. त्यानंतरच्या सर्वच फेरीत भाजपचे उमेदवार आघाडीवर राहिल्याने आपसुकच काँग्रेसच्या जनसंपर्क कार्यालयात शांतता पसरत गेली. त्यामुळे दुपारच्या सुमारास कार्यालयाकडे फेरफटका मारला असता कार्यालयात शुकशुकाट दिसून आला.सोबतच जनसंपर्क कार्यालयापुढे टाकलेल्या कापडी मंडपात केवळ वाहनेच दिसून आली. पाच वर्षांत ओसरलेली मोदी लाट त्सुनामीच्या वेगाने आल्याने काँग्रेसचे मताधिक्य सर्वत्र वाहून गेले.यातून गांधी जिल्ह्यातील महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष अ‍ॅड. चारुलता टोकस यांनाही पराभव पत्करावा लागला. पराभवाचा परिणाम जनसंपर्क कार्यालयातील वातावरणातून सकाळपासूनच दिसून येत होता. मतमोजणीच्या फेऱ्यातील मताधिक्याची तफावत लक्षात घेत दुपारपर्यंतच निवडणुकीतील चित्र स्पष्ट होताच अनेक कार्यकर्त्यांनी घराचा रस्ता धरला होता.स्थानिक नेते व पदाधिकाऱ्यांनी जनसंपर्क कार्यालयात न येता आपापल्या निवासस्थावरूनच मतमोजणीतील मताधिक्याचा आढावा घेतला.पहिल्या फेरीपासूनच मावळत गेली आशामतदार संघातील मतदानाचा कौल लक्षात घेता कोणताही पक्ष विजयाचा दावा करू शकत नव्हता. त्यामुळे काँग्रेसलाही विजयाची आशा होती. पण, पहिली फेरीच काँग्रेसला ७ हजार ८१६ मताने पिछाडीवर घेऊन गेली. त्यांनतरच्या प्रत्येक फेरीत काँग्रेसला कमी मते मिळत गेल्याने स्थानिक नेत्यांसह, पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आशा मावळत गेली. शेवटी मतदारांनी दिलेला कौल मान्य करण्याशिवाय काँग्रेसकडे दुसरा पर्याय राहिला नाही.

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकाल