शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
9
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
10
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
11
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
12
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
13
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
14
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
15
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
16
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
17
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
18
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
19
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
20
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  

प्रवासी दोन तास ताटकळत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2019 22:16 IST

प्रवाशांच्या सेवेसाठी असे ब्रिद वाक्य इतरांपासून म्हणून घेणाऱ्या रापमचा भोंगळ कारभार प्रवाशांसाठी डोकेदुखीच ठरत आहे. आर्वी बस स्थानकावरून मंगळवारी दुपारी १ ते ३ या कालावधीत सुमारे दहा ते पंधरा गाड्या सोडण्यात आल्या.

ठळक मुद्देआर्वी आगारातील प्रकार : अधिकाऱ्यांकडून सौजन्याची ऐसीतैसी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : प्रवाशांच्या सेवेसाठी असे ब्रिद वाक्य इतरांपासून म्हणून घेणाऱ्या रापमचा भोंगळ कारभार प्रवाशांसाठी डोकेदुखीच ठरत आहे. आर्वी बस स्थानकावरून मंगळवारी दुपारी १ ते ३ या कालावधीत सुमारे दहा ते पंधरा गाड्या सोडण्यात आल्या. परंतु, याच दरम्यान पुलगावच्या दिशेने जाणारी एकही गाडी न सोडल्याने तपत्या उन्हात अनेक प्रवाशांना ताटकळत रहावे लागले. चौकशी कक्षात विचारणा केल्यावर गाडी आल्यावर त्या दिशेने गाडी पाठविण्यात येईल, असे उत्तर देऊन वेळकाढू धोरणच अवलंबल्या गेले.आर्वी बस स्थानकावरून आर्वी आगाराच्या बसेस पुलगाव व इतर गावांसाठी सोडल्या जातात. परंतु, या बसस्थानकावर बसची प्रतीक्षा करणाऱ्या प्रवाशांसाठी धड बसण्याचीही व्यवस्था नाही. विशेष म्हणजे उकाड्यामुळे जीवाची लाहीलाही होत असली तरी प्रवाशी ज्या ठिकाणी बसची प्रतीक्षा करतात तेथील पंखेच नादुरूस्त आहेत. उल्लेखनिय म्हणजे व्यवस्थापकच त्यांच्या कक्षात राहत नसल्याने प्रवाशांनी तक्रार करावी कुणाला असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे आर्वी-पुलगाव मार्गावर अवैध प्रवासी वाहतूक होते. तब्बल दोन-दोन तास या मार्गावर बसेस सोडल्या जात नसल्याने रापमच्या अधिकाऱ्यांचे अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्यांसोबत सोटेलोटे तर नाही ना असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. येथील मनमर्जी कारभाराकडे विभाग नियंत्रकांचे दुर्लक्ष होत आहे.अन् संतप्त प्रवाशांनी मोडली अधिकाºयांच्या नावाने बोटेलग्न सभारंभाला उपस्थिती दर्शविल्यानंतर परतीचा प्रवास करणारे प्रवासी दुपारी १ वाजता आर्वी बस स्थानक येथे पोहोचले. या प्रवाशांमध्ये खुबगाव, पिपरी, पारगोठाण, धनोडी, सावंगी, रोहणा सुमारे २०० नागरिक होते. तर रोहणा येथील स्व. कोल्हटकर कला महाविद्यालयात परीक्षा देण्यासाठी जाणारे काही विद्यार्थीही होते. दीड तासाचा भºयाचा कालावधी लोटला तरी पुलगावच्या दिशेने बस न लागल्याने संतप्त प्रवाशांनी चौकशी कक्ष गाठले. परंतु, तेथेही समाधानकारक उत्तर न मिळाल्याने प्रवाशांनी आपला मोर्चा आगार व्यवस्थापकांच्या दालनाकडे वळविला. पण तेथे अधिकारीच नसल्याने प्रवाशांचा पारा आणखी चढला. त्यांंनी अधिकाºयांच्या नावाने बोटच मोडली. त्यानंतर काही काळीपिवळी गाडीने पुलगावच्या दिशेने निघाले. तर उर्वरित प्रवाशांनी रापमच्या अधिकाºयांनी ३.१५ वाजता लावलेल्या आर्वी-पुलगाव-यवतमाळ या रापमच्या गाडीने घर जवळ केले.

टॅग्स :state transportएसटी