शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

प्रवासी दोन तास ताटकळत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2019 22:16 IST

प्रवाशांच्या सेवेसाठी असे ब्रिद वाक्य इतरांपासून म्हणून घेणाऱ्या रापमचा भोंगळ कारभार प्रवाशांसाठी डोकेदुखीच ठरत आहे. आर्वी बस स्थानकावरून मंगळवारी दुपारी १ ते ३ या कालावधीत सुमारे दहा ते पंधरा गाड्या सोडण्यात आल्या.

ठळक मुद्देआर्वी आगारातील प्रकार : अधिकाऱ्यांकडून सौजन्याची ऐसीतैसी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : प्रवाशांच्या सेवेसाठी असे ब्रिद वाक्य इतरांपासून म्हणून घेणाऱ्या रापमचा भोंगळ कारभार प्रवाशांसाठी डोकेदुखीच ठरत आहे. आर्वी बस स्थानकावरून मंगळवारी दुपारी १ ते ३ या कालावधीत सुमारे दहा ते पंधरा गाड्या सोडण्यात आल्या. परंतु, याच दरम्यान पुलगावच्या दिशेने जाणारी एकही गाडी न सोडल्याने तपत्या उन्हात अनेक प्रवाशांना ताटकळत रहावे लागले. चौकशी कक्षात विचारणा केल्यावर गाडी आल्यावर त्या दिशेने गाडी पाठविण्यात येईल, असे उत्तर देऊन वेळकाढू धोरणच अवलंबल्या गेले.आर्वी बस स्थानकावरून आर्वी आगाराच्या बसेस पुलगाव व इतर गावांसाठी सोडल्या जातात. परंतु, या बसस्थानकावर बसची प्रतीक्षा करणाऱ्या प्रवाशांसाठी धड बसण्याचीही व्यवस्था नाही. विशेष म्हणजे उकाड्यामुळे जीवाची लाहीलाही होत असली तरी प्रवाशी ज्या ठिकाणी बसची प्रतीक्षा करतात तेथील पंखेच नादुरूस्त आहेत. उल्लेखनिय म्हणजे व्यवस्थापकच त्यांच्या कक्षात राहत नसल्याने प्रवाशांनी तक्रार करावी कुणाला असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे आर्वी-पुलगाव मार्गावर अवैध प्रवासी वाहतूक होते. तब्बल दोन-दोन तास या मार्गावर बसेस सोडल्या जात नसल्याने रापमच्या अधिकाऱ्यांचे अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्यांसोबत सोटेलोटे तर नाही ना असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. येथील मनमर्जी कारभाराकडे विभाग नियंत्रकांचे दुर्लक्ष होत आहे.अन् संतप्त प्रवाशांनी मोडली अधिकाºयांच्या नावाने बोटेलग्न सभारंभाला उपस्थिती दर्शविल्यानंतर परतीचा प्रवास करणारे प्रवासी दुपारी १ वाजता आर्वी बस स्थानक येथे पोहोचले. या प्रवाशांमध्ये खुबगाव, पिपरी, पारगोठाण, धनोडी, सावंगी, रोहणा सुमारे २०० नागरिक होते. तर रोहणा येथील स्व. कोल्हटकर कला महाविद्यालयात परीक्षा देण्यासाठी जाणारे काही विद्यार्थीही होते. दीड तासाचा भºयाचा कालावधी लोटला तरी पुलगावच्या दिशेने बस न लागल्याने संतप्त प्रवाशांनी चौकशी कक्ष गाठले. परंतु, तेथेही समाधानकारक उत्तर न मिळाल्याने प्रवाशांनी आपला मोर्चा आगार व्यवस्थापकांच्या दालनाकडे वळविला. पण तेथे अधिकारीच नसल्याने प्रवाशांचा पारा आणखी चढला. त्यांंनी अधिकाºयांच्या नावाने बोटच मोडली. त्यानंतर काही काळीपिवळी गाडीने पुलगावच्या दिशेने निघाले. तर उर्वरित प्रवाशांनी रापमच्या अधिकाºयांनी ३.१५ वाजता लावलेल्या आर्वी-पुलगाव-यवतमाळ या रापमच्या गाडीने घर जवळ केले.

टॅग्स :state transportएसटी