शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

प्रवासी दोन तास ताटकळत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2019 22:16 IST

प्रवाशांच्या सेवेसाठी असे ब्रिद वाक्य इतरांपासून म्हणून घेणाऱ्या रापमचा भोंगळ कारभार प्रवाशांसाठी डोकेदुखीच ठरत आहे. आर्वी बस स्थानकावरून मंगळवारी दुपारी १ ते ३ या कालावधीत सुमारे दहा ते पंधरा गाड्या सोडण्यात आल्या.

ठळक मुद्देआर्वी आगारातील प्रकार : अधिकाऱ्यांकडून सौजन्याची ऐसीतैसी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : प्रवाशांच्या सेवेसाठी असे ब्रिद वाक्य इतरांपासून म्हणून घेणाऱ्या रापमचा भोंगळ कारभार प्रवाशांसाठी डोकेदुखीच ठरत आहे. आर्वी बस स्थानकावरून मंगळवारी दुपारी १ ते ३ या कालावधीत सुमारे दहा ते पंधरा गाड्या सोडण्यात आल्या. परंतु, याच दरम्यान पुलगावच्या दिशेने जाणारी एकही गाडी न सोडल्याने तपत्या उन्हात अनेक प्रवाशांना ताटकळत रहावे लागले. चौकशी कक्षात विचारणा केल्यावर गाडी आल्यावर त्या दिशेने गाडी पाठविण्यात येईल, असे उत्तर देऊन वेळकाढू धोरणच अवलंबल्या गेले.आर्वी बस स्थानकावरून आर्वी आगाराच्या बसेस पुलगाव व इतर गावांसाठी सोडल्या जातात. परंतु, या बसस्थानकावर बसची प्रतीक्षा करणाऱ्या प्रवाशांसाठी धड बसण्याचीही व्यवस्था नाही. विशेष म्हणजे उकाड्यामुळे जीवाची लाहीलाही होत असली तरी प्रवाशी ज्या ठिकाणी बसची प्रतीक्षा करतात तेथील पंखेच नादुरूस्त आहेत. उल्लेखनिय म्हणजे व्यवस्थापकच त्यांच्या कक्षात राहत नसल्याने प्रवाशांनी तक्रार करावी कुणाला असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे आर्वी-पुलगाव मार्गावर अवैध प्रवासी वाहतूक होते. तब्बल दोन-दोन तास या मार्गावर बसेस सोडल्या जात नसल्याने रापमच्या अधिकाऱ्यांचे अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्यांसोबत सोटेलोटे तर नाही ना असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. येथील मनमर्जी कारभाराकडे विभाग नियंत्रकांचे दुर्लक्ष होत आहे.अन् संतप्त प्रवाशांनी मोडली अधिकाºयांच्या नावाने बोटेलग्न सभारंभाला उपस्थिती दर्शविल्यानंतर परतीचा प्रवास करणारे प्रवासी दुपारी १ वाजता आर्वी बस स्थानक येथे पोहोचले. या प्रवाशांमध्ये खुबगाव, पिपरी, पारगोठाण, धनोडी, सावंगी, रोहणा सुमारे २०० नागरिक होते. तर रोहणा येथील स्व. कोल्हटकर कला महाविद्यालयात परीक्षा देण्यासाठी जाणारे काही विद्यार्थीही होते. दीड तासाचा भºयाचा कालावधी लोटला तरी पुलगावच्या दिशेने बस न लागल्याने संतप्त प्रवाशांनी चौकशी कक्ष गाठले. परंतु, तेथेही समाधानकारक उत्तर न मिळाल्याने प्रवाशांनी आपला मोर्चा आगार व्यवस्थापकांच्या दालनाकडे वळविला. पण तेथे अधिकारीच नसल्याने प्रवाशांचा पारा आणखी चढला. त्यांंनी अधिकाºयांच्या नावाने बोटच मोडली. त्यानंतर काही काळीपिवळी गाडीने पुलगावच्या दिशेने निघाले. तर उर्वरित प्रवाशांनी रापमच्या अधिकाºयांनी ३.१५ वाजता लावलेल्या आर्वी-पुलगाव-यवतमाळ या रापमच्या गाडीने घर जवळ केले.

टॅग्स :state transportएसटी