शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

प्रवाशांचा प्रश्न; गर्दीच्या नऊ मार्गांवर बस कधी धावणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2021 05:00 IST

निकाल देत बडतर्फीच्या कारवाईला स्थगिती देण्यास कामगार न्यायालयाने स्पष्टपणे नकार दिला आहे. त्यामुळे संप करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांसाठी हा मोठा झटका मानला जातोय. तरीही हा संप सुरूच असून जिल्ह्यात आर्वी, पुलगाव, तळेगाव, वर्धा, हिंगणघाट या ५ आगारांमध्ये २१३  बसेस आहे. दररोज ७५ हजार किलो मीटर या बसेस धावत होत्या.

राजेश सोळंकीलोकमत न्यूज नेटवर्कदेऊरवाडा/आर्वी : राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा दोन महिन्यांपेक्षा अधिक काळापासून संप सुरूच आहे. विलीनीकरणाच्या मागणीवर कर्मचारी ठाम असून सरकारने अनेक प्रस्ताव दिलेत. तरीही मागणी पूर्ण होईस्तोवर संप मागे घेणार नाही, अशी कर्मचाऱ्यांची भूमिका आहे. त्यामुळे महामंडळाकडून जिल्ह्यातील २६३ कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले. तर काही कर्मचाऱ्यांनी कामगार न्यायालयात धाव घेत, बडतर्फीच्या कारवाईला स्थगिती देण्याची विनंती केली. यावर निकाल देत बडतर्फीच्या कारवाईला स्थगिती देण्यास कामगार न्यायालयाने स्पष्टपणे नकार दिला आहे. त्यामुळे संप करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांसाठी हा मोठा झटका मानला जातोय. तरीही हा संप सुरूच असून जिल्ह्यात आर्वी, पुलगाव, तळेगाव, वर्धा, हिंगणघाट या ५ आगारांमध्ये २१३  बसेस आहे. दररोज ७५ हजार किलो मीटर या बसेस धावत होत्या. वर्धा आगार वगळता चारही आगारात काही प्रमाणात  बसेस सुरू झाल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. पण जवळपास ९ ते १० गर्दीच्या ठिकाणी बसेस जात नसल्याने प्रवाशांची मोठी अडचण होत आहे.

या मार्गावर बसेस सुरू-    आर्वी- वर्धा, आर्वी- अमरावती, आर्वी -आष्टी, हिंगणघाट- वर्धा, हिंगणघाट -उमरेड, तळेगाव-वरुड,-    पुलगाव - वर्धा, आर्वी- वरुड.

या मार्गावर बसेस कधी सुरू होणार?- आर्वी - नागपूर, यवतमाळ- नांदेड, शेगाव, मोर्शी, उमरेड, चंद्र्पूर, गडचिरोली व भंडारा.

महामंडळाच्या निर्देशानुसार कर्मचाऱ्यांना कामावर हजर होण्याची संधी देण्यात आली आहे. मुख्यालयाच्या सूचनेचे पालन करून कार्यवाही करण्यात येत आहे. आतापर्यंत २६३ कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले आहे. जे कामावर रुजू झाले, त्या वाहक व चालक यांच्या संख्येनुसार गाड्या सोडल्या जात आहे.चेतन हसबनीस, विभागीय नियंत्रक

एसटीने प्रवास करण्याची सवय लागते की काय?

बसेस सुरू झाल्याने ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थ्यांची अडचण काहीशी दूर झाली आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा संप अद्याप सुरूच असल्याने अनेक जिल्ह्यांत जाणाऱ्या बसेस सुरू नाहीत. आता एसटी कर्मचाऱ्यांनी अधिक ताणून धरायला नको. नागरिकांच्या सुविधेचा विचार व्हावा.प्रवीण शेलोकार, प्रवासी

बसेस सुरू झाल्याने थोडाफार दिलासा मिळाला आहे. मात्र लांब पल्ल्याच्या बसेस अद्यापही बंद असल्याने प्रवास करताना अडचणीचा सामना करावा लागतोय. त्या बसेसही लवकरात लवकर सुरू व्हाव्यात.विजय गिरी, प्रवासी 

 

टॅग्स :ST Strikeएसटी संप