शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

प्रवाशांचा प्रश्न; गर्दीच्या नऊ मार्गांवर बस कधी धावणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2021 05:00 IST

निकाल देत बडतर्फीच्या कारवाईला स्थगिती देण्यास कामगार न्यायालयाने स्पष्टपणे नकार दिला आहे. त्यामुळे संप करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांसाठी हा मोठा झटका मानला जातोय. तरीही हा संप सुरूच असून जिल्ह्यात आर्वी, पुलगाव, तळेगाव, वर्धा, हिंगणघाट या ५ आगारांमध्ये २१३  बसेस आहे. दररोज ७५ हजार किलो मीटर या बसेस धावत होत्या.

राजेश सोळंकीलोकमत न्यूज नेटवर्कदेऊरवाडा/आर्वी : राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा दोन महिन्यांपेक्षा अधिक काळापासून संप सुरूच आहे. विलीनीकरणाच्या मागणीवर कर्मचारी ठाम असून सरकारने अनेक प्रस्ताव दिलेत. तरीही मागणी पूर्ण होईस्तोवर संप मागे घेणार नाही, अशी कर्मचाऱ्यांची भूमिका आहे. त्यामुळे महामंडळाकडून जिल्ह्यातील २६३ कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले. तर काही कर्मचाऱ्यांनी कामगार न्यायालयात धाव घेत, बडतर्फीच्या कारवाईला स्थगिती देण्याची विनंती केली. यावर निकाल देत बडतर्फीच्या कारवाईला स्थगिती देण्यास कामगार न्यायालयाने स्पष्टपणे नकार दिला आहे. त्यामुळे संप करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांसाठी हा मोठा झटका मानला जातोय. तरीही हा संप सुरूच असून जिल्ह्यात आर्वी, पुलगाव, तळेगाव, वर्धा, हिंगणघाट या ५ आगारांमध्ये २१३  बसेस आहे. दररोज ७५ हजार किलो मीटर या बसेस धावत होत्या. वर्धा आगार वगळता चारही आगारात काही प्रमाणात  बसेस सुरू झाल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. पण जवळपास ९ ते १० गर्दीच्या ठिकाणी बसेस जात नसल्याने प्रवाशांची मोठी अडचण होत आहे.

या मार्गावर बसेस सुरू-    आर्वी- वर्धा, आर्वी- अमरावती, आर्वी -आष्टी, हिंगणघाट- वर्धा, हिंगणघाट -उमरेड, तळेगाव-वरुड,-    पुलगाव - वर्धा, आर्वी- वरुड.

या मार्गावर बसेस कधी सुरू होणार?- आर्वी - नागपूर, यवतमाळ- नांदेड, शेगाव, मोर्शी, उमरेड, चंद्र्पूर, गडचिरोली व भंडारा.

महामंडळाच्या निर्देशानुसार कर्मचाऱ्यांना कामावर हजर होण्याची संधी देण्यात आली आहे. मुख्यालयाच्या सूचनेचे पालन करून कार्यवाही करण्यात येत आहे. आतापर्यंत २६३ कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले आहे. जे कामावर रुजू झाले, त्या वाहक व चालक यांच्या संख्येनुसार गाड्या सोडल्या जात आहे.चेतन हसबनीस, विभागीय नियंत्रक

एसटीने प्रवास करण्याची सवय लागते की काय?

बसेस सुरू झाल्याने ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थ्यांची अडचण काहीशी दूर झाली आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा संप अद्याप सुरूच असल्याने अनेक जिल्ह्यांत जाणाऱ्या बसेस सुरू नाहीत. आता एसटी कर्मचाऱ्यांनी अधिक ताणून धरायला नको. नागरिकांच्या सुविधेचा विचार व्हावा.प्रवीण शेलोकार, प्रवासी

बसेस सुरू झाल्याने थोडाफार दिलासा मिळाला आहे. मात्र लांब पल्ल्याच्या बसेस अद्यापही बंद असल्याने प्रवास करताना अडचणीचा सामना करावा लागतोय. त्या बसेसही लवकरात लवकर सुरू व्हाव्यात.विजय गिरी, प्रवासी 

 

टॅग्स :ST Strikeएसटी संप