शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

पालकांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2018 22:30 IST

समाजात काम करताना अनेक अडचणी येत असता हे वास्तव आहे. आजचा विद्यार्थी उद्याच्या प्रगत भारताचा सुजान नागरिक राहणार असल्याने पालकांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे.

ठळक मुद्देरामदास तडस : गुणवंतांचा गुणगौरव सोहळा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : समाजात काम करताना अनेक अडचणी येत असता हे वास्तव आहे. आजचा विद्यार्थी उद्याच्या प्रगत भारताचा सुजान नागरिक राहणार असल्याने पालकांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे. गुणवंतांनी, ज्ञानवंतांनी, भाग्यवंतांनी आणि कष्टकऱ्यांनी आपले ज्ञान, अपार कष्ट, मेहनत, चिकाटी व प्रामाणिकपणाच्या जोरावर जे यश प्राप्त केले आहे. ते समाजापुढे येणे महत्त्वाचे असते. त्यांच्या यशाचे कौतुक करून त्यांच्याकडून भावी आयुष्यात अधिक चांगली कामे होऊन त्यांच्या कार्याचा झेंडा सर्वत्र फडकावा, असे प्रतिपादन खा. रामदास तडस यांनी केले.महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा वर्धा जिल्हा व संताजी सेवा सांस्कृतिक मंडळ, कृष्णनगर वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते मार्गदर्शन करताना बोलत होते. व्यासपीठावर वर्धेचे नगराध्यक्ष अतुल तराळे, आर्वीचे नगराध्यक्ष प्रशांत सव्वालाखे, महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभाचे जिल्हाध्यक्ष अतुल वांदीले, शेखर शेंडे, सुधाकर सुरकार, तेलरांधे, योगेश कुंभलकर, प्रतिभा बुरले, वंदना भुते, शुभांगी कोलते, शरद सहारे, पंकज सायंकार, मिलिंद भेंडे आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमादरम्यान जिल्ह्यातील दहावी व बारावीच्या एकूण ११० विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. तसेच याप्रसंगी सेलू नगरपंचायत समितीच्या नवनिर्वाचित अध्यक्षा शारदा माहुरे, पी.एच.डी. प्राप्त डोंगरे, छायाचित्रकार कवी भट यांचाही सत्कार करण्यात आला. खा. तडस पुढे म्हणाले, दहावी आणि बारावी नंतर विद्यार्थ्यांनी आपल्या भविष्याचा विचार करून आपले ध्येय निश्चित केले पाहिजे. योग्य शिक्षण आपल्या जीवनात महत्त्वाचे असून त्याची निवडही वेळीच विद्यार्थ्यांनी करावी. नविन तंत्रज्ञानाचा वापर जो ज्ञानासाठी करतो, तोच या युगात प्रगती करू शकतो, असे सांगत प्रत्येक विद्यार्थ्याने एक रोपटे लावून त्याच्या संगोपनाची जबाबदारी स्विकारावी असे आवाहन केले. याप्रसंगी नगराध्यक्ष अतुल तराळे, प्रशांत सव्वालाखे, अतुल वांदीले, शेखर शेंडे, शोभा तडस यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्तावीक संस्थेचे अध्यक्ष प्रशांत बुरले यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन प्रिया शेंदरे यांनी केले तर आभार सुनील शिंदे यांनी मानले. कार्यक्रमाला शैलेंद्र झाडे, शोभा तडस, सचिन सुरकार, जगन्नाथ लाकडे, नितीन साटोणे, सुधीर चाफले, विनायक तेलरांधे, पुष्पा डायगव्हाने, सुरेंद्र खोंड, हरिष हांडे, किशोर गुजरकर, अतुल पिसे, चंद्रकांत चामटकर, सतीश इखार, देवा निखाडे, विनोद इटनकर, मनीष तेलरांधे, शेखर लाजुरकर, सुप्रिया शिंदे, माया चाफले, माया उमाटे, मोना किमतकर आदींनी सहकार्य केले.

टॅग्स :Ramdas Tadasरामदास तडसStudentविद्यार्थी