शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
2
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
3
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
4
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
5
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
6
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
7
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
8
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
9
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
10
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
11
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
12
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
13
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
14
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
15
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
16
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
17
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
18
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
19
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
20
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या

वर्धा जिल्ह्यातील सेवाग्रामच्या आदर्शनगरात पाणीबाणी! चार दिवसांआड पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 15:25 IST

Wardha news वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम येथे मागील अनेक वर्षांपासून आदर्शनगर येथे उन्हाळ्यात पाण्याची समस्या तीव्र रूप धारण करीत असून, अजूनही यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आली नाही.

ठळक मुद्दे पाण्यासाठी दारोदार भटकंती

लोकमत न्यूज नेटवर्क 

सेवाग्राम : वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम येथे मागील अनेक वर्षांपासून आदर्शनगर येथे उन्हाळ्यात पाण्याची समस्या तीव्र रूप धारण करीत असून, अजूनही यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आली नाही. सध्या या परिसरात पाणीबाणी सुरू असून, रहिवाशांना चार दिवसांआड पाणी मिळत असल्याने अनेकांना दुचाकी, चारचाकी, सायकलवरून पाणी भरण्यासाठी धावपळ करावी लागत असल्याचे चित्र आहे. यामुळे नागरिकांत संतापाची लाट उसळली आहे. आदर्श नगरात नव्या घरांची भर पडत असल्याने घरांची संख्याही ६०० वर गेली आहे.

या परिसराची लोकसंख्या १८०० वर आहे. रहिवाशांना ग्रा.पं.च्या विहिरीवरून पाणीपुरवठा केला जातो. यासाठी जलकुंभ असून, त्यात पाणी साठवून ठेवले जाते. पाणी समस्या लक्षात घेता चार पाॅइंटवरून पाणी सोडण्यात येते. यात एका पाॅइंटसाठी चार दिवसांची प्रतीक्षा करावी लागते. त्यामुळे चार दिवसांनंतरच पाणी मिळते. परिसरात तीन हँडपंप असून, त्या ठिकाणी सकाळी व सायंकाळी पाणी भरण्यासाठी रांगा लागतात‌. विशेष म्हणजे जुन्या कार्यकारिणीने जुन्या वस्तीतील विहिरीवरून पाइपलाइन टाकून आदर्शनगराच्या विहिरीत पाणी सोडण्याचा प्रयोग केला होता; पण तो प्रयोगही फोल ठरला. मात्र, आता पुन्हा ऐन उन्हाळ्यात पाणी प्रश्न पेटण्याची शक्यता आहे.

परिसरात पाणी समस्या आहे. ताकसांडे लेआऊटमधील विहिरीवरून पाणी घेण्यात येणार असल्याने समस्येवर काही प्रमाणावर तोडगा निघेल. ग्रा.पं.कडून प्रयत्न सुरू आहेत.

सुजाता ताकसांडे, सरपंच सेवाग्राम, ग्रा.पं.

ग्रामपंचायतीच्या ढिसाळ कारभारामुळे पाणी समस्या सुटत नाही. दरवर्षीची समस्या असल्याने तोडगा का काढला जात नाही, हे मात्र कळत नाही. भर उन्हाळ्यात लोकांना त्रास सहन करावा लागत आहे.

रोशन तेलंग, सामाजिक कार्यकर्ता.

पाण्याची बिकट समस्या आहे. म्हाडा कॉलनीतील हँडपंपवरून पाणी आणतो. मागील वर्षी वरूड रे. परिसरातील व्हाॅल्व्हवरून पाणी भरले. ग्रा.पं.ने तात्काळ उपाययोजना करून दिलासा द्यावा.

दिलीप शेंद्रे, नागरिक. आदर्शनगर.

टॅग्स :water shortageपाणीकपात