शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

वर्धा जिल्ह्यातील सेवाग्रामच्या आदर्शनगरात पाणीबाणी! चार दिवसांआड पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 15:25 IST

Wardha news वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम येथे मागील अनेक वर्षांपासून आदर्शनगर येथे उन्हाळ्यात पाण्याची समस्या तीव्र रूप धारण करीत असून, अजूनही यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आली नाही.

ठळक मुद्दे पाण्यासाठी दारोदार भटकंती

लोकमत न्यूज नेटवर्क 

सेवाग्राम : वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम येथे मागील अनेक वर्षांपासून आदर्शनगर येथे उन्हाळ्यात पाण्याची समस्या तीव्र रूप धारण करीत असून, अजूनही यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आली नाही. सध्या या परिसरात पाणीबाणी सुरू असून, रहिवाशांना चार दिवसांआड पाणी मिळत असल्याने अनेकांना दुचाकी, चारचाकी, सायकलवरून पाणी भरण्यासाठी धावपळ करावी लागत असल्याचे चित्र आहे. यामुळे नागरिकांत संतापाची लाट उसळली आहे. आदर्श नगरात नव्या घरांची भर पडत असल्याने घरांची संख्याही ६०० वर गेली आहे.

या परिसराची लोकसंख्या १८०० वर आहे. रहिवाशांना ग्रा.पं.च्या विहिरीवरून पाणीपुरवठा केला जातो. यासाठी जलकुंभ असून, त्यात पाणी साठवून ठेवले जाते. पाणी समस्या लक्षात घेता चार पाॅइंटवरून पाणी सोडण्यात येते. यात एका पाॅइंटसाठी चार दिवसांची प्रतीक्षा करावी लागते. त्यामुळे चार दिवसांनंतरच पाणी मिळते. परिसरात तीन हँडपंप असून, त्या ठिकाणी सकाळी व सायंकाळी पाणी भरण्यासाठी रांगा लागतात‌. विशेष म्हणजे जुन्या कार्यकारिणीने जुन्या वस्तीतील विहिरीवरून पाइपलाइन टाकून आदर्शनगराच्या विहिरीत पाणी सोडण्याचा प्रयोग केला होता; पण तो प्रयोगही फोल ठरला. मात्र, आता पुन्हा ऐन उन्हाळ्यात पाणी प्रश्न पेटण्याची शक्यता आहे.

परिसरात पाणी समस्या आहे. ताकसांडे लेआऊटमधील विहिरीवरून पाणी घेण्यात येणार असल्याने समस्येवर काही प्रमाणावर तोडगा निघेल. ग्रा.पं.कडून प्रयत्न सुरू आहेत.

सुजाता ताकसांडे, सरपंच सेवाग्राम, ग्रा.पं.

ग्रामपंचायतीच्या ढिसाळ कारभारामुळे पाणी समस्या सुटत नाही. दरवर्षीची समस्या असल्याने तोडगा का काढला जात नाही, हे मात्र कळत नाही. भर उन्हाळ्यात लोकांना त्रास सहन करावा लागत आहे.

रोशन तेलंग, सामाजिक कार्यकर्ता.

पाण्याची बिकट समस्या आहे. म्हाडा कॉलनीतील हँडपंपवरून पाणी आणतो. मागील वर्षी वरूड रे. परिसरातील व्हाॅल्व्हवरून पाणी भरले. ग्रा.पं.ने तात्काळ उपाययोजना करून दिलासा द्यावा.

दिलीप शेंद्रे, नागरिक. आदर्शनगर.

टॅग्स :water shortageपाणीकपात