आर्थिक व्यवहारातून घडलेला प्रकारआकोली : महात्मा साखर कारखाना येथून काटोलकडे जाणारा ट्रक रहस्यमयरित्या मालक, चालकासह बेपत्ता झाला होता. यातील चालक व मालक दोघेही परत आले असून ट्रक मात्र अद्यापही बेपत्ताच आहे. १५ फेबु्रवारी रोजी ट्रक एमएच २७ एक्स ४७६४ ने मालक रामधन राठोड व चालक संजय नरूटे रा. पळसोना जि. हिंगोली हे काटोलकडे जात होते. दरम्यान, वाटेतून त्यांचा ट्रक बेपत्ता झाला, अशी तक्रार ट्रक मालकाचा मुलगा भारत राठोड याने सेलू पोलिसांत केली होती. पोलीस त्यादृष्टीने तपास करीत होते. दरम्यान, मंगळवारी मालक व चालक सेलू पोलीस ठाण्यात हजर झाले. चार चाकी वाहनातून आलेल्या नऊ लोकांनी ट्रक अडविला, धमकी देत दोघांनाही वाहनात कोंबून ट्रकसह अमरावती मार्गे औंढा-परभणी मार्गावर सोडल्याचे या दोघांनी सांगितले. ट्रक मालकाने महात्मा सहकारी साखर कारखान्याशी करार केला होता. शिवाय मराठवाड्यातील दुसऱ्या एका कारखान्याशीही करार करून सहा लाख रुपयांचा अग्रीम घेतला; पण मराठवाड्यातील त्या कारखान्याकडे ट्रक पाठविला नाही. तो ट्रक महात्मा साखर कारखान्यात पाठविला. यामुळे संबंधित कारखान्याचे कंत्राटदार आणि ट्रक मालकामध्ये देवाण-घेवाणीतून वाद होता. ट्रक मालकाच्या मुलाने मराठवाड्यातील त्या कंत्राटदाराला ११ फेबु्रवारी रोजी तीन लाख व १२ फेबु्रवारी रोजी तीन लाख तसेच व्याजापोटी एक लाख रुपये दिल्याचे बँक व्यवहारातून दिसून येते. सेलूच्या पोलीस उपनिरीक्षक शुभांगी ताकीत यांनी दोघांचेही बयाण नोंदवून प्रकरण खरांगणा पोलिसांच्या स्वाधीन केले. (वार्ताहर) अखेर रहस्य उलगडलेजामणी येथून काटोलकडे जाण्यासाठी निघालेला ट्रक रहस्यमयरीत्या बेपत्ता झाला होता. आठ दिवसांपासून ट्रक तसेच मालक व चालकाचा शोध घेतला जात होता. मंगळवारी ट्रकचा मालक व चालक सेलू पोलीस ठाण्यात हजर झाले व त्यांनी आपबिती सांगितली.
मालक व चालक परतले, ट्रक बेपत्ताच
By admin | Updated: February 24, 2016 02:10 IST