शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
2
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
3
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
4
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
5
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
6
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
7
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
8
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
9
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
10
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
11
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
12
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
13
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
14
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
15
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
16
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
17
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
18
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
19
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...
20
DSP सिराजनं बेन स्टोक्सला केलं 'अरेस्ट'! विकेट गमावल्यावर कॅप्टननं हवेत भिरकावली बॅट (VIDEO)

तीन हजारांच्यावर परप्रांतीय मजूर अद्यापही वर्ध्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2020 18:49 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक परप्रांतीय मजूर राज्यात अडकले आहेत. केंद्र व राज्य सरकारकडून विशेष प्रवासी रेल्वे गाड्या सोडून त्यांची घरवापसी केली जात असली तरी सध्या स्थितीत वर्धा जिल्ह्यात तब्बल ३ हजारांच्यावर परप्रांतीय मजूर ४२ निवारागृहांमध्ये आपला मुक्काम ठोकून आहेत.

ठळक मुद्देलॉकडाऊनचा फटका ४२ निवारागृहांत करताय घरवापसीची प्रतीक्षा

महेश सायखेडे

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक परप्रांतीय मजूर राज्यात अडकले आहेत. केंद्र व राज्य सरकारकडून विशेष प्रवासी रेल्वे गाड्या सोडून त्यांची घरवापसी केली जात असली तरी सध्या स्थितीत वर्धा जिल्ह्यात तब्बल ३ हजारांच्यावर परप्रांतीय मजूर ४२ निवारागृहांमध्ये आपला मुक्काम ठोकून आहेत. या मजुरांना आपल्या घराची ओढ लागली आहे. केंद्र व राज्य सरकारने तातडीने योग्य पाऊल उचलून त्यांची घरवापसी करावी अशी मागणी या मजुरांची आहे.देशात कोरोनाचा शिरकाव होताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाची साखळी तोडण्याच्या उद्देशाला केंद्रस्थानी ठेऊन लॉकडाऊन जाहीर केले. शिवाय परप्रांतीय मजुरांना जेथे आहात तेथेच थांबण्याचे आवाहन केले. सध्या लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्याची अंमलबजावणी केली जात आहे. इतकेच नव्हे तर केंद्र सरकारकडून मजुरांच्या घरवापसीसाठी विशेष प्रवासी रेल्वे गाड्या सोडल्या जात आहेत. परंतु, वर्धा सारख्या छोट्या जिल्ह्यात अजूनही ३ हजार ११२ परप्रांतीय व इतर जिल्ह्यातील मजूर अडकून असल्याचे वास्तव आहे. या मजुरांची राहण्याची व जेवनाची व्यवस्था ४२ निवारागृहांमध्ये करण्यात आली असली तरी त्यांना आपल्या घराची ओढ लागली आहे. सदर मजुरांना त्यांच्या मुळ गावी रवाना करण्यासाठी वर्धा जिल्हा प्रशासनाने नियोजनबद्ध कार्यक्रम आखला असून वरिष्ठांच्या सूचनांची सध्या प्रतीक्षा आहे.५ हजार ७१ मजुरांना पाठविले स्वगावीलॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर १६ एप्रिलला वर्धा जिल्ह्यात एकूण ८ हजार १८३ परप्रांतीय व जिल्ह्याबाहेरील मजूर असल्याची नोंद घेण्यात आली होती. शिवाय या मजुरांची राहण्याची व जेवनाची व्यवस्था ६१ निवारागृहात करण्यात आली होती. सदर निवारागृहांपैकी १३ शासकीय तर ४१ निवारागृह सामाजिक संघटनांच्या माध्यमातून तयार करून त्यात मजुरांना ठेवण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे वर्धा जिल्ह्यात अडकलेल्या एकूण ८ हजार १८३ मजुरांपैकी ५ हजार ७१ मजुरांना त्यांच्या मुळ गावी रवाना करण्यात आले आहे.लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर १६ एप्रिल या दिवशी वर्धा जिल्ह्यात ८ हजार १८३ परप्रांतीय व जिल्ह्याबाहेरील मजूर होते. त्यापैकी ५ हजार ७१ मजुरांना त्यांच्या स्वगावी रवाना करण्यात आले आहे. तर सध्या स्थितीत केवळ ३ हजार ११२ परप्रांतीय व जिल्ह्याबाहेरील मजूर वर्धा जिल्ह्यात आहेत. त्यांची राहण्याची आणि जेवनाची व्यवस्था ४२ निवारागृहांमध्ये करण्यात आली आहे. वर्धा जिल्ह्यात असलेल्या मजुरांना लवकरच त्यांच्या मुळगावी पाठविण्यात येईल.- प्रविण महिरे, उपजिल्हाधिकारी वर्धा.

 

 

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस