शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
‘सर्व भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढा, अन्यथा…’, अमेरिकन पत्रकाराचं वादग्रस्त विधान   
3
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
4
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
5
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
6
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
7
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
8
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
9
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
10
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
11
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
12
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
13
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
14
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
15
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
16
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
17
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
18
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
19
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
20
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

तीन हजारांच्यावर परप्रांतीय मजूर अद्यापही वर्ध्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2020 18:49 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक परप्रांतीय मजूर राज्यात अडकले आहेत. केंद्र व राज्य सरकारकडून विशेष प्रवासी रेल्वे गाड्या सोडून त्यांची घरवापसी केली जात असली तरी सध्या स्थितीत वर्धा जिल्ह्यात तब्बल ३ हजारांच्यावर परप्रांतीय मजूर ४२ निवारागृहांमध्ये आपला मुक्काम ठोकून आहेत.

ठळक मुद्देलॉकडाऊनचा फटका ४२ निवारागृहांत करताय घरवापसीची प्रतीक्षा

महेश सायखेडे

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक परप्रांतीय मजूर राज्यात अडकले आहेत. केंद्र व राज्य सरकारकडून विशेष प्रवासी रेल्वे गाड्या सोडून त्यांची घरवापसी केली जात असली तरी सध्या स्थितीत वर्धा जिल्ह्यात तब्बल ३ हजारांच्यावर परप्रांतीय मजूर ४२ निवारागृहांमध्ये आपला मुक्काम ठोकून आहेत. या मजुरांना आपल्या घराची ओढ लागली आहे. केंद्र व राज्य सरकारने तातडीने योग्य पाऊल उचलून त्यांची घरवापसी करावी अशी मागणी या मजुरांची आहे.देशात कोरोनाचा शिरकाव होताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाची साखळी तोडण्याच्या उद्देशाला केंद्रस्थानी ठेऊन लॉकडाऊन जाहीर केले. शिवाय परप्रांतीय मजुरांना जेथे आहात तेथेच थांबण्याचे आवाहन केले. सध्या लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्याची अंमलबजावणी केली जात आहे. इतकेच नव्हे तर केंद्र सरकारकडून मजुरांच्या घरवापसीसाठी विशेष प्रवासी रेल्वे गाड्या सोडल्या जात आहेत. परंतु, वर्धा सारख्या छोट्या जिल्ह्यात अजूनही ३ हजार ११२ परप्रांतीय व इतर जिल्ह्यातील मजूर अडकून असल्याचे वास्तव आहे. या मजुरांची राहण्याची व जेवनाची व्यवस्था ४२ निवारागृहांमध्ये करण्यात आली असली तरी त्यांना आपल्या घराची ओढ लागली आहे. सदर मजुरांना त्यांच्या मुळ गावी रवाना करण्यासाठी वर्धा जिल्हा प्रशासनाने नियोजनबद्ध कार्यक्रम आखला असून वरिष्ठांच्या सूचनांची सध्या प्रतीक्षा आहे.५ हजार ७१ मजुरांना पाठविले स्वगावीलॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर १६ एप्रिलला वर्धा जिल्ह्यात एकूण ८ हजार १८३ परप्रांतीय व जिल्ह्याबाहेरील मजूर असल्याची नोंद घेण्यात आली होती. शिवाय या मजुरांची राहण्याची व जेवनाची व्यवस्था ६१ निवारागृहात करण्यात आली होती. सदर निवारागृहांपैकी १३ शासकीय तर ४१ निवारागृह सामाजिक संघटनांच्या माध्यमातून तयार करून त्यात मजुरांना ठेवण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे वर्धा जिल्ह्यात अडकलेल्या एकूण ८ हजार १८३ मजुरांपैकी ५ हजार ७१ मजुरांना त्यांच्या मुळ गावी रवाना करण्यात आले आहे.लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर १६ एप्रिल या दिवशी वर्धा जिल्ह्यात ८ हजार १८३ परप्रांतीय व जिल्ह्याबाहेरील मजूर होते. त्यापैकी ५ हजार ७१ मजुरांना त्यांच्या स्वगावी रवाना करण्यात आले आहे. तर सध्या स्थितीत केवळ ३ हजार ११२ परप्रांतीय व जिल्ह्याबाहेरील मजूर वर्धा जिल्ह्यात आहेत. त्यांची राहण्याची आणि जेवनाची व्यवस्था ४२ निवारागृहांमध्ये करण्यात आली आहे. वर्धा जिल्ह्यात असलेल्या मजुरांना लवकरच त्यांच्या मुळगावी पाठविण्यात येईल.- प्रविण महिरे, उपजिल्हाधिकारी वर्धा.

 

 

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस