शहरं
Join us  
Trending Stories
1
काय सांगता..! २,६५२ लाडक्या बहिणी निघाल्या सरकारी कर्मचारी, शासन करणार वसुली
2
आजचे राशीभविष्य: शुक्रवार 30 मे 2025; शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, नोकरी-व्यवसायात उत्साहित होऊन कामे कराल
3
पाक करणार होता हल्ला; पण भारताच्या ब्रह्मोसमुळे फसला, पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची कबुली
4
महापालिकेच्या निवडणुका सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये, महायुती म्हणून एकत्र लढणार : चंद्रशेखर बावनकुळे
5
पाकिस्तानी हेराचा हनी ट्रॅप; अभियंत्याला ठाण्यात अटक, डॉकयार्डमध्ये होता अभियंता
6
थकला-भागला 'विक्रम'; हमीभाव ठरविण्याची एकूण प्रक्रियाच संशयाच्या भोवऱ्यात
7
जोर ओसरतोय, पेरणीची घाई नको, ५ ते ६ दिवस पावसाची तीव्रता कमी असेल
8
IPL 2025 : रजतच्या नेतृत्वाखाली RCB संघाला 'सुवर्ण' संधी! पंजाबला शह देत थेट फायनलमध्ये एन्ट्री
9
ईडीच्या उपसंचालकांना लाच घेतल्याप्रकरणी सीबीआयने ताब्यात घेतले; नेमकं प्रकरण काय?
10
युद्धविराममध्ये कधीही व्यापाराचा उल्लेख नव्हता; भारताने ट्रम्प यांच्या टॅरिफ दाव्यांना पुन्हा एकदा नाकारले
11
वैष्णवी तर गेलीच आहे, आता वाईट बोलू नका; वडिल अनिल कस्पटेंच्या भावनांचा बांध फुटला
12
Vinayak Chaturthi 2025: सद्गुरू वामनराव पै सिद्धीविनायकाकडे काय मागावं हे सांगताहेत!
13
RCB vs PBKS : कोहलीचं सेलिब्रेशन बघून अनुष्का शर्माला आलं हसू; तो व्हिडिओ होतोय व्हायरल
14
धारावीत निम्मी जागा सार्वजनिक वापरासाठी; उर्वरित जागेत पुनर्वसन, नूतनीकरणाचे होणार काम
15
'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली महिलेची १ कोटी ८१ लाखांची फसवणूक; गुन्हे शाखेच्या कारवाईत टोळीचा पर्दाफाश
16
Covid-19 च्या डेल्टा व्हेरिएंटमुळे सायलेंट हॉर्ट अटॅक वाढले, आयआयटी इंदूरच्या अहवालात खुलासा
17
Ola Electric Q4 results: 'ओला'चे डोळे ओले! तोटा वाढून ₹८६० कोटींवर, महसुलातही ५९% ची घसरण
18
पाकिस्तानात गेलेल्या महिलेने हेरगिरी केल्याचा संशय, नागपुरात गुन्हा दाखल
19
राज्यसभेच्या ८ जागांसाठी १९ जूनला मतदान; मतांचे गणित जुळवणं सत्ताधाऱ्यांसमोर आव्हान

१६३.६० पैकी जिल्ह्याच्या वाट्याला केवळ १६.३६ कोटींचे अनुदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2020 05:00 IST

जिल्हा नियोजन समिती सर्वसाधारण सन २०२०-२१ अंतर्गत वर्धा जिल्ह्यातील विविध विकास कामांसाठी तसेच लोकप्रतिनिधींनी सूचविलेल्या कामांसाठी राज्यात कोरोनाचा शिरकाव होण्यापूर्वी एकूण १६३.६० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला होता. मात्र, त्यानंतर राज्यात कोरोनाचा शिरकाव झाल्याने राज्य शासनाने थेट यु-टर्न घेत जिल्हा नियोजन समितीच्या अनुदानास मोठी कात्री लावली आहे.

ठळक मुद्देमंजुरपैकी मिळणार ३३ टक्केच निधी : जिल्हा नियोजन समितीच्या अनुदानास कोविड कात्री

महेश सायखेडे।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोना संकटामुळे जिल्हा नियोजन समितीच्या अनुदानास राज्य शासनाकडून ६७ टक्क्यांनी कात्री लावण्यात आली आहे. शासनाच्या या निर्णयामुळे वर्धा जिल्ह्यासाठी मंजूर असलेल्या १६३.६० कोटींच्या निधीपैकी ३३ टक्के म्हणजे ५३.९९ कोटींचा निधी मिळणार आहे. त्यापैकी सध्या १६.३६ कोटी म्हणजे दहा टक्के निधी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे.जिल्हा नियोजन समिती सर्वसाधारण सन २०२०-२१ अंतर्गत वर्धा जिल्ह्यातील विविध विकास कामांसाठी तसेच लोकप्रतिनिधींनी सूचविलेल्या कामांसाठी राज्यात कोरोनाचा शिरकाव होण्यापूर्वी एकूण १६३.६० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला होता. मात्र, त्यानंतर राज्यात कोरोनाचा शिरकाव झाल्याने राज्य शासनाने थेट यु-टर्न घेत जिल्हा नियोजन समितीच्या अनुदानास मोठी कात्री लावली आहे. शासनाने कोरोना संकटाच्या काळात सदर कठोर निर्णय घेतला असला तरी पावसाळी आणि टंचाईच्या कामांना काही प्रमाणात तरतूर करण्यात येणार आहे. तर मिळणाऱ्या अनुदानापैकी २५ टक्के रक्कम आरोग्य सेवेसाठी दिली जाणार असून नवीन विकास कामांना ब्रेक लागणार असल्याचे सांगण्यात आले.कोविड लढ्यासाठी ५.४५ कोटींची रक्कम आरोग्य विभागाकडे होणार वळतीसुरूवातीला आरोग्य सेवेसाठी १६ कोटी २ लाख ८४ हजारांचा निधी मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर राज्य शासनाने डीपीडीसीच्या अनुदानास ६७ टक्क्यांची कोरोना कात्री लावत वर्धा जिल्ह्यासाठी ५३.९९ कोटींचा निधी देण्याचे निश्चित केले. त्यातही मंजूर अनुदानापैकी २५ टक्के म्हणजे १६.३६ कोटींचा निधी आरोग्य सेवेसाठी दिला जाणार असून आरोग्य विभागाकडून निधीची मागणी झाल्याने ५.४५ कोटींचा निधी सध्या जिल्हा नियोजन विभागाकडून वळता केला जात आहे. निधी वळता करण्याची प्रक्रिया सध्या जिल्हा प्रशासनातील नियोजन विभागात अंतीम टप्प्यात असून येत्या दोन ते तीन दिवसांत हा निधी आरोग्य विभागाला कोरोना संकटावर मात करण्यासाठी दिला जाणार आहे.कोरोनास हद्दपार करण्यास प्राधान्यजिल्हा प्रशासनाने एकूण २६ कोविड बाधितांची नोंद घेतली आहे. यापैकी बहूतांश व्यक्ती जिल्ह्याबाहेरील असून चार व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. तर १७ व्यक्ती कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या चार कोविड अ‍ॅक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहे. शासनाने डीपीडीसीच्या अनुदानात कपात केली असली तरी मिळणाºया निधीपैकी मोठा निधी कोरोनाला हद्दपार करण्यासाठी प्राधान्याने खर्च होणार आहे.अनुदान कपातीचे परिणामअंगणवाडी, शाळा बांधकाम आणि पांदण रस्ते दुरूस्तींच्या कामाला बे्रक लागणार आहे.ग्रामीण भागाला शहरांशी जोडणाऱ्या रस्त्याच्या रुंदीकरणासह मजबुतीकरण आणि डांबरीकरणाचे कामे थांबणार आहेत.लोकप्रतिनिधींनी सूचविले विविध विकास कामे थंडबस्त्यात राहणार आहे.राज्यशासनाकडून डीपीडीसी अनुदानास मोठी कात्री लावल्याने विकास कामांना ब्रेक लागत जिल्ह्याचा विकासच खुंटणार आहे.कोरोना संकटामुळे राज्यशासनाने डीपीडीसीच्या अनुदानात ६७ टक्क्यांची कपात केली आहे. शिवाय मंजूर अनुदानापैकी २५ टक्के निधी आरोग्य सेवेसाठी राखीव ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. सध्या १० टक्के म्हणजे १६.३६ कोटींचा निधी जिल्ह्याला प्राप्त झाला आहे. त्यापैकी ५.४५ कोटींचा निधी येत्या काही दिवसांत आरोग्य विभागाला वळता होणार आहे.- अरविंद टेंभूर्णे, जिल्हा नियोजन अधिकारी, वर्धा.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या