शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
3
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
4
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
5
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
6
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
7
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
8
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
9
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
10
VIDEO : अहमदाबाद प्लेन क्रॅशमध्ये मोठा चमत्कार...! विमानाचे धातूही वितळले, पण 'या' धर्मग्रंथाला साधा स्पर्षही करू शकली नाही आग!
11
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
12
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
13
MLC 2025: भारतीय फलंदाजाचा धुमधडाका! चार चेंडूत मारले चार षटकार, केली तुफान फटकेबाजी
14
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
15
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
16
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
17
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
18
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
19
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
20
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल

त्यागमय जीवन जगणाऱ्या बापूंप्रति आमची श्रद्धाच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2021 19:20 IST

Wardha News बापूंप्रति आमची श्रद्धाच आहे, असे मत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्दे सेवाग्राम आश्रमात केली प्रार्थना

सेवाग्राम (वर्धा) : राष्ट्रपिता महात्मा गांधी सत्य, शांती व अहिंसेचे प्रेरक राहिले आहे. त्यांनी देशासाठी त्यागमय जीवन जगून हजारो व्यक्तींना प्रेरित केले असून, आजही जगाला प्रेरणा मिळत आहे. त्यामुळे बापूंप्रति आमची श्रद्धाच आहे, असे मत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी व्यक्त केले. (Bhagat singh Koshyari)

महात्मा गांधी यांच्या १५२व्या जयंतीनिमत्ताने आदरांजली वाहण्यासाठी राज्यपाल शनिवारी ते सेवाग्राम आश्रमात आले होते. यावेळी खासदार रामदास तडस, आमदार डॉ. पंकज भोयर, जिल्हा परिषद अध्यक्ष सरिता विजय गाखरे यांच्यासह आश्रम प्रतिष्ठानच्या वतीने अध्यक्ष टी. आर. एन. प्रभू व मंत्री मुकुंद मस्के यांनी सूतमाळेने स्वागत केले. त्यानंतर बापू कुटीत सर्वांनी प्रार्थना करून आदरांजली वाहिली. पुढे बोलताना ते म्हणाले की, आश्रमातील स्मारके जास्तीत जास्त काळ टिकली पाहिजे, असे नियोजन करावे. साबरमती आश्रमाच्या विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संकल्पना मांडली; पण त्याला विरोध झाला, असेही राज्यपाल यांनी सांगितले.

यावेळी जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार, पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे, तहसीलदार रमेश काळपे, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विपुल जाधव, जिल्हा परिषदेचे माजी सभापती मिलिंद भेंडे, अविनाश देव, वरूडच्या सरपंच सुनीता ढवळे, सेवाग्रामचे पोलीस निरीक्षक नीलेश ब्राह्मणे आदींची उपस्थिती होती.

राज्यपालांना आठवले आजोबांचे गाव

सेवाग्राम आश्रमातील बापू कुटीमध्ये प्रार्थना केल्यानंतर त्यांनी परिसरातील सर्व कुट्यांची पाहणी केली. यावेळी उपस्थितांसोबत चर्चा करताना येथील कुट्या पाहून त्यांना त्यांच्या आजोबाच्या घराची आठवण झाली. ‘माझ्या आजोबाचे घर असेच मातीचे होते. त्या घरात आम्ही राहिलो; पण आज त्याला टिकविणे कठीण आहे. आश्रमातील सर्वच कुट्या दीर्घकाळ कशा टिकतील याचा विचार होणे आवश्यक आहे,’ असे राज्यपाल म्हणाले. या कुट्यांच्या देखभालीसंदर्भात आश्रम प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रभू यांना विचारणा केली. तेव्हा आश्रमातील कुट्यांना उत्तम ठेवण्याकरिता प्रतिष्ठान सतत प्रयत्नशील असते. या कुट्यांमधून बापूंच्या विचारांचा सतत दरवळ असतो, असे प्रभू म्हणाले.

टॅग्स :bhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीSewagramसेवाग्राम