शहरं
Join us  
Trending Stories
1
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
2
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
3
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
4
Vinayak Pande and Yatin Wagh: उद्धव ठाकरेंचा आदेश, विनायक पांडे- यतिन वाघ यांची पक्षातून हकालपट्टी; राऊतांची पोस्ट!
5
ज्यांनी घेतलीय त्यांनी मागच्या सीटवर बसू नका, या देशाने घातली मारुती सुझुकीच्या Fronx विक्रीवर बंदी...
6
"युतीमुळे तुम्हाला फरक पडत नाही, तर तोंडाची डबडी का वाजवताय?", संजय राऊत भाजपा नेत्यांवर भडकले
7
१७ वर्षानंतर तारिक रहमान बांगलादेशात परतले; राजकीय हालचालींना वेग, भारतासाठी फायद्याचे की तोट्याचे
8
एका वर्षात 'ग्रॅच्युइटी' मिळण्याचा नियम कागदावरच; नव्या लेबर कोडची प्रतीक्षा लांबली! का होतोय उशीर?
9
जीएसटी कमी होऊन, दोन महिनेही झाले नाहीत तोच कारच्या किंमती महागणार; मारुतीपासून महिंद्रापर्यंत सर्वच कंपन्या वाढवणार किमती
10
नांदेडमध्ये काळजाचा थरकाप! आई-वडील घरात मृतावस्थेत, तर मुलांनी रेल्वेखाली संपवलं आयुष्य
11
संतापजनक घटना! नातीनं विरोधात जाऊन लग्न केलं, संतापलेल्या आजीने नातीच्या ४० दिवसांच्या बाळाला संपवलं
12
जिथे कोंडी केली, तेच ठिकाण ‘गेम चेंजर’ ठरणार; ठाकूरांना खिंडीत गाठण्यासाठी भाजपाची रणनीती!
13
Nigeria Mosque Explosion: नायजेरिया हादरलं! मशिदीत नमाजाच्या वेळी मोठा बॉम्बस्फोट; ५ ठार, ३५ जण गंभीर जखमी
14
ऑस्ट्रेलियात ख्रिसमसपूर्वी ज्यूंवर पुन्हा हल्ला, कारवर 'फायर बॉम्बिंग'; PM अल्बनीज म्हणाले, 'अँटी-सेमिटिझम' कृत्य!
15
सुधीर मुनगंटीवारांचं पक्षाने ऐकलं? आमदार किशोर जोरगेवारांना पदावरून हटवलं; भाजपचा निवडणुकीच्या तोंडावर मोठा निर्णय
16
५० नगरपालिकांमध्ये भाजपाचा नगराध्यक्ष पण नगरसेवकांची संख्या निम्मीही नाही; २ ठिकाणी 'भोपळा'
17
महापालिका निवडणूक २०२६: काँग्रेस-वंचितची आघाडी फिस्कटली! अकोल्यात पाच उमेदवार जाहीर, यादीत कोणाची नावे?
18
“अखेर ‘बाळासाहेबांचे वाघ’ एकत्र आले”; ठाकरे बंधूंच्या युतीनंतर बाळा नांदगावकरांची खास पोस्ट
19
नक्षलवादानंतर अमित शाहांचे नवे मिशन; 2029 पर्यंत देशातून ड्रग्स हद्दपार करण्याचा निर्धार
20
इन्फोसिसमध्ये फ्रेशर्सची चांदी! 'या' पदांसाठी मिळणार २१ लाखांचे पॅकेज; २०,००० नव्या भरतीचे संकेत
Daily Top 2Weekly Top 5

त्यागमय जीवन जगणाऱ्या बापूंप्रति आमची श्रद्धाच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2021 19:20 IST

Wardha News बापूंप्रति आमची श्रद्धाच आहे, असे मत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्दे सेवाग्राम आश्रमात केली प्रार्थना

सेवाग्राम (वर्धा) : राष्ट्रपिता महात्मा गांधी सत्य, शांती व अहिंसेचे प्रेरक राहिले आहे. त्यांनी देशासाठी त्यागमय जीवन जगून हजारो व्यक्तींना प्रेरित केले असून, आजही जगाला प्रेरणा मिळत आहे. त्यामुळे बापूंप्रति आमची श्रद्धाच आहे, असे मत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी व्यक्त केले. (Bhagat singh Koshyari)

महात्मा गांधी यांच्या १५२व्या जयंतीनिमत्ताने आदरांजली वाहण्यासाठी राज्यपाल शनिवारी ते सेवाग्राम आश्रमात आले होते. यावेळी खासदार रामदास तडस, आमदार डॉ. पंकज भोयर, जिल्हा परिषद अध्यक्ष सरिता विजय गाखरे यांच्यासह आश्रम प्रतिष्ठानच्या वतीने अध्यक्ष टी. आर. एन. प्रभू व मंत्री मुकुंद मस्के यांनी सूतमाळेने स्वागत केले. त्यानंतर बापू कुटीत सर्वांनी प्रार्थना करून आदरांजली वाहिली. पुढे बोलताना ते म्हणाले की, आश्रमातील स्मारके जास्तीत जास्त काळ टिकली पाहिजे, असे नियोजन करावे. साबरमती आश्रमाच्या विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संकल्पना मांडली; पण त्याला विरोध झाला, असेही राज्यपाल यांनी सांगितले.

यावेळी जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार, पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे, तहसीलदार रमेश काळपे, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विपुल जाधव, जिल्हा परिषदेचे माजी सभापती मिलिंद भेंडे, अविनाश देव, वरूडच्या सरपंच सुनीता ढवळे, सेवाग्रामचे पोलीस निरीक्षक नीलेश ब्राह्मणे आदींची उपस्थिती होती.

राज्यपालांना आठवले आजोबांचे गाव

सेवाग्राम आश्रमातील बापू कुटीमध्ये प्रार्थना केल्यानंतर त्यांनी परिसरातील सर्व कुट्यांची पाहणी केली. यावेळी उपस्थितांसोबत चर्चा करताना येथील कुट्या पाहून त्यांना त्यांच्या आजोबाच्या घराची आठवण झाली. ‘माझ्या आजोबाचे घर असेच मातीचे होते. त्या घरात आम्ही राहिलो; पण आज त्याला टिकविणे कठीण आहे. आश्रमातील सर्वच कुट्या दीर्घकाळ कशा टिकतील याचा विचार होणे आवश्यक आहे,’ असे राज्यपाल म्हणाले. या कुट्यांच्या देखभालीसंदर्भात आश्रम प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रभू यांना विचारणा केली. तेव्हा आश्रमातील कुट्यांना उत्तम ठेवण्याकरिता प्रतिष्ठान सतत प्रयत्नशील असते. या कुट्यांमधून बापूंच्या विचारांचा सतत दरवळ असतो, असे प्रभू म्हणाले.

टॅग्स :bhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीSewagramसेवाग्राम