शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
3
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
4
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
5
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
6
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
7
"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
8
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
9
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
10
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
11
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
12
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
13
कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
14
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : उद्धव ठाकरेंकडूनच कोल्हापूरच्या गादीचा अपमान, उदय सामंत यांचा आरोप
15
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...
16
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
17
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
18
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
19
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे
20
Health Tips: उन्हाळ्यात प्रकृती थंड ठेवण्यासाठी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकरांनी सांगितला SST फॉर्म्युला!

अन्यथा मुख्यमंत्र्यांना धडा शिकविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 11:53 PM

धनगर समाजाने २०१३-१४ मध्ये कॉगे्रस-राष्ट्रवादीच्या काळात आंदोलनांतून आरक्षणाची मागणी लावून धरली; पण शासनाने कार्यवाही केली नाही. विरोधात असताना देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षणाची बाजू मांडली.

ठळक मुद्देधनगर समाज आरक्षण : नागपूर अधिवेशनात हल्लाबोल मोर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : धनगर समाजाने २०१३-१४ मध्ये कॉगे्रस-राष्ट्रवादीच्या काळात आंदोलनांतून आरक्षणाची मागणी लावून धरली; पण शासनाने कार्यवाही केली नाही. विरोधात असताना देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षणाची बाजू मांडली. सत्तेत आल्यावर आरक्षण देऊ, असे पत्र १० मार्च २०१४ रोजी दिले. आज सत्ता येऊन तीन वर्षे झाली; पण अंमल केला नाही. यामुळे एक-दीड महिन्यात अनु. जमातीच्या सवलती मिळाल्या नाही तर लबाड मुख्यमंत्र्यांना धनगर समाज धडा शिकवेल, असा इशारा माजी आमदार तथा भारिप बहुजन महासंघ अकोल्याचे हरिभाऊ भदे यांनी पत्रपरिषदेतून दिला.धनगर समाजाला अनु. जमाती प्रवर्गाच्या सवलती देण्याच्या मागणीसाठी ११ डिसेंबर रोजी नागपूर विधिमंडळावर हल्लाबोल मोर्चा आयोजित आहे. याबाबत माहिती देण्याकरिता शुक्रवारी विश्रामगृहात पत्रकार परिषद घेण्यात आली. ते पुढे म्हणाले की, भाजपाचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळात धनगर समाजाला अनु. जमातीचे आरक्षण आहे. याबाबत सबळ पुरावे आहेत; पण काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार धनगर समाजाला एसटीचे आरक्षण का देत नाही, असा प्रश्न उपस्थित केला होता. त्यावेळी बारामती येथे धनगर समाजाच्या आरक्षणासाठी उपोषण सुरू होते. हे उपोषण फडणवीस यांनी सोडविले. तेव्हा धनगर समाजाने एक गठ्ठा मते आम्हाला द्यावी, आमचे सरकार सत्तेवर आल्यास धनगर समाजाच्या एस.टी. आरक्षणाची अंमलबजावणी करू, अशी ग्वाही दिली होती. लोकसभा निवडणूक प्रचारात नरेंद्र मोदी यांनी सोलापूरच्या सभेत धनगर समाज मागासलेला आहे. धनगर समाजाला अनु. जमातीचे आरक्षण आवश्यक आहे. केंद्रात सरकार आल्यास आदेश काढू, अशी ग्वाही दिली होती. फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर नागपूर येथे ४ जानेवारी २०१५ रोजी धनगर समाजाने त्यांचा सत्कार केला. त्यावेळीही फडणवीस यांनी धनगर समाजामुळेच मी मुख्यमंत्री झालो. मंत्रीमंडळाच्या पहिल्याच बैठकीत धनगर समाजाच्या अनु. जमातीच्या आरक्षणाचा ठराव पारित करतो. केंद्र सरकारकडे पाठवितो, असे सांगितले होते. मंत्रिमंडळाच्या शेकडो बैठका झाल्या; पण कार्यवाही झाली नाही. यामुळे भाजपा सरकारवर राग व्यक्त करण्यासाठी तथा सत्तेतून बाहेर करण्यासाठी नागपूर विधी मंडळाच्या पहिल्याच दिवशी लाखोंच्या संख्येने धनगर समाज रस्त्यावर उतरणार आहे.धनगर समाजाच्या अनु. जमाती आरक्षणाची त्वरित अंमलबजावणी करावी. शासकीय सेवेत असणाºया धनगर समाजाच्या कर्मचाºयांची सेवा बढती थांबविली. मेंढपाळासाठी संरक्षित चराई क्षेत्र उपलब्ध करून द्यावे. अहिल्यादेवी होळकर शेळी-मेंढी महामंडळाद्वारे १०० टक्के अनुदानावर केवळ धनगर समाजाला शेळी-मेंढी उद्योगासाठी तरतूद करावी. धनगर समाजाला वनविभागाने सरंक्षण देणारा कायदा पारित करावा आदी मागण्या मोर्चातून लावून धरण्यात येणार असल्याचेही सांगितले. यशवंत स्टेडीयम नागपूर येथून मोर्चाची सरूवात होणार असल्याचे सांगण्यात आले. यावेळी धनगर समाज युवक मंडळ नागपूरचे अध्यक्ष रमेश पाटील, माजी जि.प. अध्यक्ष पुरूषोत्तम डाखोळे नागपूर, राजू गोरडे वर्धा यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.