शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
2
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
3
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
4
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
5
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
6
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
7
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
8
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
9
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
10
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
11
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
12
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
13
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
14
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
15
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
16
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
17
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
18
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
19
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
20
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
Daily Top 2Weekly Top 5

वक्तृत्व स्पर्धेत घडला ‘स्वच्छतेतून समृद्धीकडे’चा जागर

By admin | Updated: January 12, 2016 02:04 IST

स्वच्छ भारत मिशन जिल्हा परिषद वर्धाच्या वतीने जिल्हास्तरीय स्वच्छता मित्र वक्तृत्व करंडक स्पर्धा यशवंत महाविद्यालय, वर्धा येथे घेण्यात आली.

स्वच्छता मित्र वक्तृत्व करंडक स्पर्धा : जिल्हा परिषद स्वच्छ भारत मिशनचा उपक्रमवर्धा : स्वच्छ भारत मिशन जिल्हा परिषद वर्धाच्या वतीने जिल्हास्तरीय स्वच्छता मित्र वक्तृत्व करंडक स्पर्धा यशवंत महाविद्यालय, वर्धा येथे घेण्यात आली. यामध्ये वरिष्ठ महाविद्यालयीन गटामधून सागर कुबेटकर तर कनिष्ठ महाविद्यालयीन गटामधून रश्मी खडीकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला. हे दोन्ही स्पर्धक राज्यस्तरीय स्वच्छतामित्र वक्तृत्व करंडक स्पर्धेत वर्धा जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य) विवेक ईलमे उपस्थित होते. उद्घाटक म्हणून उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुनील मेसरे तर प्रमुख अतिथी म्हणून यशवंत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विलास देशमुख, नाट्य दिग्दर्शक हरिष इथापे, पंकज वंजारे, रत्नाकर सिरसाट आदी मान्यवर उपस्थित होते.पाणी गुणवत्ता व परिसर स्वच्छता या विषयामध्ये युवा वर्गाला सहभागी करून घेण्यासाठी व स्वच्छतेची व्याप्ती वाढवून युवा वर्गामध्ये पाणी गुणवत्ता व स्वच्छतेबाबत जागृती निर्माण करून प्रत्येक महाविद्यालयामधून संदेश वाहक व अभ्यासू वक्ते तयार करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. यासाठी दरवर्षी शासनामार्फत तालुका, जिल्हा व राज्यस्तरावर सदर स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. जिल्ह्यात पाणी गुणवत्ता व स्वच्छतेबाबत जनजागृती होण्याच्या दृष्टीने वेगवेगळे उपक्रम स्वच्छ भारत मिशनच्या वतीने राबविण्यात येतात. ही स्पर्धा सदर उपक्रमाचाच एक भाग आहे. महिन्याभरात तालुकास्तरीय स्पर्धा घेण्यात आल्या. त्यामधील दोन्ही गटामधून प्रथम व द्वितीय क्रमांकाचे स्पर्धक जिल्हास्तरीय स्पर्धेकरिता पात्र ठरले. जिल्हास्तरावरून प्रथम व द्वितीय क्रमांक प्राप्त विजेत्यांना साधन व्यक्ती म्हणून मान्यता आहे. स्वच्छ भारत मिशन, राष्ट्रीय पेयजल कार्यक्रम, पाणी गुणवत्ता व सनियंत्रण कार्यक्रम या कार्यक्रमाचा प्रचार, प्रसार व क्षमता बांधणी यासारख्या उपक्रमामध्ये प्राधान्याने त्यांना साधन व्यक्ती म्हणून आमंत्रित करणार आहे.अत्ंयत चुरशीच्या झालेल्या या जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये स्पर्धकांनी स्वच्छ निर्मल शाळा, बालकास लावी लळा, शुद्ध थेंब पाण्याचा लाभ आरोग्यदायी जीवनाचा, कचरा नव्हे कांचन, करा घनकचऱ्याचे व्यवस्थापन, मिळून साऱ्या जनी मिळवू स्वच्छ व शुद्ध पाणी, तरूणाईचे नवे धडे स्वच्छतेतून समृद्धीकडे, करू सांडपाण्याचे व्यवस्थापन धरतीचे होईल नंदनवन, करू तपासणी पाण्याची हमी आरोग्याची जीवनाची, यासह इतरही अनेक विषयावर स्पर्धकांनी आपली अभ्यासपूर्ण मते मांडली. स्पर्धेचे परीक्षण वंजारे, इथापे व रत्नाकर सिरसाट यांनी केले. संचालन माहिती, शिक्षण संवाद तज्ज्ञ विनोद खोब्रागडे यांनी केले. आभार जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापन सचिन खाडे व शालेय स्वच्छता तज्ज्ञ कैलास बाळबुधे यांनी मानले. स्पर्धेला पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे सर्व अधिकारी तज्ज्ञ कर्मचारी आणि यशवंत महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचारी यांनी सहकार्य केले.वरिष्ठ महाविद्यालयीन गटात द्वितीय क्रमांक शगुप्ता अ. हसन, तर तृतीय क्रमांक वृषाली वाघमारे व राणी भांगे यांना विभागून देण्यात आला. तसेच कनिष्ठ महाविद्यालय गटात द्वितीय क्रमांक चंचल वाधवान व प्रगती पिसुड्डे यांना तर तृतीय क्रमांक किरण कापडे व मोहन गाखरे या चौघांना विभागून देण्यात आला.(शहर प्रतिनिधी) वरिष्ठ गटातून सागर कुबेटकर तर कनिष्ठ गटातून रश्मी खडीकर अव्वल युवकांमध्ये स्वच्छता आणि पाण्याचे योग्य व्यवस्थापन याबाबत जागृती वाढावी, त्यांनी स्वत: स्वच्छतेचा संदेश समाजात प्रषित करावा यासाठी म्हणून स्वच्छ भारत मोशन अंतर्गत हा स्पर्धात्मक उपक्रम राबविला जात आहे. या उपक्रमातून चांगले वक्तृत्वपटू तयार होत आहेत.