शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
4
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
5
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
6
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
7
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
8
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
9
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
10
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
11
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
12
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
13
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
14
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
15
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
16
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
17
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
18
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
19
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

बँकेच्या विलिनिकरणास खातेदारांचा विरोध

By admin | Updated: December 22, 2016 00:26 IST

येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा ३० डिसेंबरपासून आर्वी शाखेत स्थानांतरीत करण्याचा निर्णय प्राधिकृत अधिकारी समितीने घेतला आहे.

२७ गावांतील १३ सेवा सोसायट्या संलग्नित रोहणा : येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा ३० डिसेंबरपासून आर्वी शाखेत स्थानांतरीत करण्याचा निर्णय प्राधिकृत अधिकारी समितीने घेतला आहे. तत्सम पत्र शाखेला प्राप्त झाले; पण खातेदार, ठेवीदार, शेतकरी, शेतमजूर तसेच लघु व्यावसायिक यांचे हित लक्षात घेता सदर शाखा स्थानांतरीत करू नका, अशी मागणी विविध स्तरावरून होत आहे. वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची रोहणा येथे गत ४० ते ४५ वर्षांपासून शाखा आहे. शाखेशी वडगाव, दिघी, सायखेडा, धनोडी, पिपरी, बोथली, पांजरा, किन्हाळा, सावंगी, गौरखेडा, पाचोड, सालदरा, कृष्णापूर, खैरी, रामपूर, विरूळ, सोरटा, रसूलाबाद, काकडदरा, निजामपूर, टाकळी, बोदड, पिंपळगाव, वडाळा, सावरखेडा, सालफळ, वाई, पिंपळझरी या २७ गावांतील १३ विविध कार्यकरी सेवा सहकारी संस्था संलग्न आहेत. एखाद्या मोठ्या कार्यक्षेत्रातील शेतकरी, शेतमजूर लहान-मोठे व्यावसायिक या शाखेचे ग्राहक, ठेवीदार व कर्जदार आहेत. २०१२-१३ पासून जिल्हा बँक आर्थिक अडचणींचा सामना करीत आहे. परिणामी, जिल्ह्यातील सर्व शाखेतील आर्थिक व्यवहार ठप्प होते. या शाखेतील अनेक ठेविदारांच्या पाच कोटींच्या वरील ठेवी अडकून पडल्या आहे. आठ ते दहा हजार ग्राहकांना आर्थिक फटका बसला आहे. बँकेच्या याच शाखेचे शेतकरी, नोकरदार व व्यावसायिकांकडे सात कोटींवर कर्ज थकित आहे. जिल्ह्यातील इतर शाखांचीही हीच अवस्था आहे. काही दिवसांपूर्वी रिझर्व्ह बँकेने जिल्हा बँकेचा परवाना पुनर्जीवित केल्याने वसुली येणे सुरू झाले. यातून ठेवीच्या १० टक्के रक्कम ग्राहकांना परत करणे सुरू आहे. सहकारी बँकेवर ग्राहकांचा विश्वास आहे. बँकेच्या इमारतीचे भाडे, वीज व दूरध्वनी बील वाचावे म्हणून शाखा विलीन करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले. वर्षाकाठी केवळ ४२ हजारांचा खर्च रोहणा : येथील शाखेच्या इमारतीचे भाडे दरमहा अडीच हजार रुपये आहे. महिन्याकाठी वीज व दूरध्वनी बिलाचा खर्च एक हजार रुपयांपेक्षा अधिक नाही. वर्षाकाठी हा खर्च ४० ते ४२ हजाराचा आहे. एवढ्या कारणासाठी शाखा स्थानांतरीत करण्याचा निर्णय योग्य नसल्याचे मत खातेदार व्यक्त करीत आहेत. ही शाखा आर्वी येथे स्थानांतरीत झाल्यास बँकेची वसुली बंद होणार आहे. वसुली नसेल तर ठेवीदारांच्या ठेवी परत करण्याची प्रक्रिया ठप्प होईल. खातेदारांना प्रत्येक कामासाठी आर्वीला जावे लागेल. कर्मचारी नाही. लिंक नाही, अशा कारणांचा त्रास होणार आहे. तसेच या कृतीमुळे परिसरातील गरीब शेतकरी, शेतमजुरांचा मोठा आर्थिक फटका बसेल. मिळेल तिथून कर्ज घेऊन ते त्रास होईपर्यंत भरायचे नाही, अशी मानसिकता असलेल्या कर्जदारांचे फावणार आहे. यामुळे ही शाखा आर्वी येथे स्थानांतरीत करू नये, असा ठराव ग्रामपंचायतीने ग्रामसभेत पारित केला. जि.प. सदस्य हितेंद्र बोबडे यासह राजेंद्र पावडे हे भाजपा नेत्यांच्या माध्यमातून यासाठी प्रयत्नशील आहेत. जनमंचनेही तत्सम मागणी केली आहे.(वार्ताहर)