शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

वर्ध्यातील जनता कर्फ्यूबाबत व्यावसायिकांतच मतभिन्नता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2020 05:00 IST

शहरात कोरोनाची संसर्गसाखळी तोडण्याकरिता मोजक्या व्यापाऱ्यांनी शनिवार ते सोमवारपर्यंत जनता कर्फ्यूचे आवाहन केले होते. त्याला राजकीय रंग मिळाल्याने विरोधक आणि समर्थक आमने-सामने उभे ठाकले. लॉकडाऊनमुळे अगोदरच कंबरडे मोडलेल्यांना बंदची सक्ती करु नका, अशी भूमिका विरोधकांनी घेतली. तर ‘घरीच रहा, सुरक्षित रहा’, असे आवाहन समर्थकांनी केले.

ठळक मुद्देचार दिवसांचा बंद ठरतोय आभासी : बड्या व्यावसायिकांची साथ, तर छोट्या दुकानदारांनी फिरविली पाठ

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जनता कर्फ्यूच्या मुद्यावरून सुरुवातीपासून विरोध आणि समर्थनाचा धुराळा उडाला. जनता कर्फ्यूचा शुक्रवार हा पहिला दिवस होता. विशेषत: शुक्रवार गुमास्ता दिन असल्याने मुख्य बाजारपेठ कडकडीत बंद होती. मात्र, लघु व्यावसायिकांसह शहरातील इतरांची दुकाने मात्र सुरूच होती. शनिवार आणि रविवारीही या जनता कर्फ्यूला शहरात फारसा प्रतिसाद मिळाल्याचे चित्र नव्हते. मुख्य बाजारपेठ बंद असतानाही काहींच्या दुकानांचे शटर उघडेच होते. त्यामुळे जनता कर्फ्यूवरुन व्यापाऱ्यांमध्येच मतभिन्नता असल्यानेच इतरांनी आपली प्रतिष्ठाने सुरू ठेवली की काय? अशी शंकाही वर्धेकरांनी व्यक्त केली.शहरात कोरोनाची संसर्गसाखळी तोडण्याकरिता मोजक्या व्यापाऱ्यांनी शनिवार ते सोमवारपर्यंत जनता कर्फ्यूचे आवाहन केले होते. त्याला राजकीय रंग मिळाल्याने विरोधक आणि समर्थक आमने-सामने उभे ठाकले. लॉकडाऊनमुळे अगोदरच कंबरडे मोडलेल्यांना बंदची सक्ती करु नका, अशी भूमिका विरोधकांनी घेतली. तर ‘घरीच रहा, सुरक्षित रहा’, असे आवाहन समर्थकांनी केले. मात्र, शुक्रवारप्रमाणेच रविवारीही मुख्य बाजारपेठेतील कापड लाईन, सराफा लाईन, पत्रावळी चौक, धान्य मार्केट, किराणा लाईन या भागात बंद असतानाही काहिंनी दुकानांचे शटर उघडले होते. तसेच शहरातील इतर परिसरातील दुकाने सुरू होती. फेरीवाल्यांसह, लघु व्यावसायिकांनी रोजीरोटीला महत्त्व देत आपली दुकाने सुरूच ठेवली. शहरात एकंदरीत मोठ्या व्यावसायिकांचा बंद असल्याचेच चित्र दिसून आले.मात्र, समर्थन करणाºयांनी बंद दुकानांचे तर विरोधकांनी उघड्या दुकानांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करून आपली पाठ थोपटून घेण्याचा प्रयत्न केला. वर्धेकरांच्या दृष्टीने आभासी ठरलेल्या या जनता कफ्यूमध्ये समर्थक आणि विरोधक यांना फारसे यश आले नसले तरी कोरोनाच वरचढ ठरला, हे निश्चित.‘त्या’ व्यापाºयांच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्हशहरामध्ये कोरोनाचा शिरकाव होताच प्रशासनाकडून शहरामध्ये लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्यात आली होती. तेव्हा शहरातील काही व्यापाऱ्यांनी प्रशासनाच्या या कडक लॉकडाऊनचा विरोध केला होता. इतकेच नव्हे, तर प्रशासनाविरुद्ध एकजूट करण्यासाठी काहींनी व्यापाऱ्यांची बैठकही बोलावली होती. पण, प्रशासनाने वेळीच संचारबंदीअंतर्गत कारवाई करून त्यांची ही बैठक उधळून लावली होती. सुरुवातीला विरोध करणारे काही व्यापारी आता जनता कर्फ्यूकरिता अट्टहास करीत असल्याने कोरोनाकाळातील त्यांच्या या भूमिकेबद्दल वर्धेकरांच्या मनात शंकेने घर केले आहे.व्यावसायिकांची उपाययोजनांकडे पाठजिल्हा प्रशासनाने अनलॉकनंतर सर्व व्यावसायिकांनीच कोरोना प्रतिबंधित उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहे. दुकानामध्ये सामाजिक अंतर पाळणे, सॅनिटायझरचा वापर करणे, हॅण्डवॉशची व्यवस्था करणे तसेच सर्वांनी मास्क वापरणे बंधनकारक केले आहे. बाजारपेठेत दिवसेंदिवस गर्दी वाढत असल्याने या सर्व उपाययोजनांकडे व्यावसायिकांनी पाठ फिरविल्याचे चित्र आहे. त्यामुळे जनता कफ्यूऐवजी व्यावसायिकांनी यावर भर देण्याची गरज आहे. सोबतच प्रशासनानेही यावर लक्ष देण्याची मागणी होत आहे.अ‍ॅन्टिजेनला विरोध अन् जनता कर्फ्यूला समर्थनकाही दिवसांपूर्वी मुख्य बाजारपेठेतील काही दुकानदार आणि दुकानात काम करणारे कर्मचारी पॉझिटिव्ह आल्याने प्रशासनाने कंटेन्मेंट झोन तयार केला होता. तसेच प्रशासनाकडून तेथेच अ‍ॅन्टिजेन टेस्टचीही व्यवस्था करण्यात आली होती. कोरोना पॉझिटिव्ह आलेले व्यावसायिक या परिसरात राहत नसल्याने या ठिकाणी कंटेन्मेेंट झोन तयार करणे योग्य नाही. त्यामुळे आमचा व्यवसाय बुडतो. प्रशासनाने अ‍ॅन्टिजेन टेस्टची सक्ती करू नये, अशी आगपाखड करीत काही व्यापाऱ्यांनी प्रशासनाच्या भूमिकेविरोधात मोहीम उभारली होती. तसेच काहींनी वृत्तपत्रांच्या प्रतिनिधींशी संपर्क साधून दबावतंत्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. काही अंशी व्यापाºयांची मोहीम ‘फत्ते’ ही झाली. पण, आता तेच व्यापारी जनता कर्फ्यूला समर्थन दर्शवित असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.नो मास्क, नो एन्ट्रीकोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असून आता प्रशासनाकडूनही लॉकडाऊनचा अधिकार काढून घेण्यात आले आहे. लॉकडाऊन करून लहान व्यावसायिकांसह नागरिकांना वेठीस धरण्याऐवजी स्वत: च काळजी घेण्याची गरज आहे. त्यामुळे सर्व व्यावसायिकांनी ‘नो मास्क, नो एन्ट्री’ अशीच भूमिका घेण्याची गरज आहे. आपली जबाबदारी ओळखून नियमित मास्क लावणे, सामाजिक अंतर पाळणे ही सवय आता नागरिकांना अंगवळणी पाडावी लागणार आहे. मात्र, यादृष्टीने प्रयत्न होताना दिसत नाही.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या