शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

जीर्ण इमारतीत चालतो अलाहाबाद बँकेचा कारभार

By admin | Updated: July 8, 2015 02:13 IST

स्थानिक अलाहाबाद बँकेचा कारभार गत कित्येक वर्षांपासून जीर्ण इमारतीतून सुरू आहे. ही इमारत कधीही ढासळून अपघात होण्याची शक्यता आहे.

अपघाताची शक्यता : लिंक फेलमुळे अधिकाऱ्यांसह ग्राहक त्रस्तविजयगोपाल : स्थानिक अलाहाबाद बँकेचा कारभार गत कित्येक वर्षांपासून जीर्ण इमारतीतून सुरू आहे. ही इमारत कधीही ढासळून अपघात होण्याची शक्यता आहे. याकडे लक्ष देत बँकेला स्वतंत्र इमारत देणे गरजेचे झाले आहे.अलाहाबाद बँक ४० वर्षांपासून जीर्ण इमारतीत सुरू आहे. ही इमारत कोसळून अपघाताची शक्यता आहे. ग्रामस्थांनी तोंडी व लेखी तक्रारी केल्या; पण वरिष्ठ अधिकारी दुर्लक्ष करीत आहे. सदर बँक दुसऱ्या ठिकाणी हलविण्यास अधिकारी टाळाटाळ करीत असल्याचा आरोप ग्रामस्थ करीत आहेत. बँक नियमानुसार जागा नसताना त्याच ठिकाणी ती सुरू आहे. गावात दुसरीकडे जागा असून नवीन इमारत तयार आहे; पण त्या इमारतीत नियमानुसार जागा नसल्याची बाब पूढे करून ती जागा ना-पसंत केली जात आहे. ही बँक अन्यत्र हलविण्यासाठी अपघाताची तर प्रतीक्षा केली जात नाही ना, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या बँकेत २० गावांतील शेतकरी, नागरिकांची खाती आहे. खातेदार संख्येनुसार बँकेत कर्मचारी संख्याही अत्यल्प आहे. कर्मचारी कमी असल्याने शेतकऱ्यांची बँकेत ताटकळ होते. यामुळे कर्मचारी नियुक्त करावे आणि बँक नवीन इमारतीत हलवावी, अशी मागणी होत आहे.(वार्ताहर)एटीएम मशीनच नाहीया बँकेने सर्व ग्राहकांना एटीएम कार्ड दिले; पण एटीएम मशीन नसल्याने कार्ड शोभेचे ठरत आहे. त्या कार्डचा कोणताही उपयोग होत नाही. बाहेरगावी दुसऱ्या बँकेच्या एटीएम मशीनमध्ये हे कार्ड वापरल्यास २० ते २५ रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागतो. अकारण २० ते २५ रुपयांचे नुकसान होत असल्याने गावातच अलाहाबाद बँकेने एटीएम सुरू करण्याची मागणीही जोर धरत आहे.नेहमीच लिंक फेल राहत असून याबाबत झोनल मॅनेजर नागपूर यांना तक्रार दिली आहे. शिवाय जीर्ण इमारतीत बँकेचे कामकाज चालत असून कमी जागेत काम करावे लागत आहे. लिंक फेल राहत असल्याने कर्मचाऱ्यांना वर्धा येथे जाऊन शेतकऱ्यांच्या कर्ज पुनर्गठणाची कामे करावी लागत आहेत.- अभिजीत वानखडे, शाखा व्यवस्थापक, अलाहाबाद बँक, विजयगोपाल.लिंक फेलमुळे व्यवहार ठप्पलिंक फेल होणे ही बाब नित्याची झाली आहे. बँक आॅनलाईन असून या बँकेची लिंक दररोज दोन ते तीन तास गायब होत असल्याने शेतकऱ्यांना बँकेत ताटकळावे लागत आहे. लिंक फे होत असल्याने शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. शिवाय अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही कामात व्यत्यय येत असून व्यवहार ठप्प होत आहेत.