शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

उद्घाटन तीन तास उशिरा, जेवण रात्री १ वाजता तेही गरम करुन!

By admin | Updated: January 7, 2017 00:47 IST

जिल्हा परिषद शाळांच्या तालुका स्तरीय क्रीडा स्पर्धांना शालेय विद्यार्थ्यांना मालवाहूतून नेले.

जिल्हास्तरीय क्रीडा महोत्सवातही भोंगळ कारभार : शालेय विद्यार्थ्यांसोबत जिल्हा परिषद प्रशासनाचा असाही खेळ वर्धा : जिल्हा परिषद शाळांच्या तालुका स्तरीय क्रीडा स्पर्धांना शालेय विद्यार्थ्यांना मालवाहूतून नेले. ही बाब ‘लोकमत’ उजेडात आणताच एकच खळबळ उडाली होती. यानंतर जिल्हा परिषद प्रशासनाचे यापासून बोध घेतला नसल्याची बाब वडनेर येथे आयोजित जिल्हास्तरीय क्रीडा महोत्सवातून स्पष्ट झाली. महोत्सवाच्या उद्घाटनाची वेळ दुपारी १२ वाजताची असताना ते तब्बल तीन तासांनी झाले. यानंतर तब्बल दोन तास लेझीम कवायती व अन्य कार्यक्रम झाले. सायंकाळी अंधार पडल्यानंतर स्पर्धांना सुरुवात झाली. रात्री १२ वाजतापर्यंत सांस्कृतिक कार्यक्रम पार पाडल्यानंतर रात्री १ वाजता विद्यार्थ्यांना जेवण मिळाले तेही गरम करुन. उल्लेखनीय बाब म्हणजे, या कार्यक्रमाला मुख्य कार्यकारी अधिकारी नयना गुंडे यांची गैरहजेरीही अनेकांना खटकली. एकूणच ढिसाळ आणि बेजबजाबदार नियोजनाची चर्चा सर्वत्र होऊ लागली आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांचा जिल्हास्तरीय क्रीडा महोत्सव गुरुवारपासून वडनेर येथे सुरू झाला. ही क्रीडा स्पर्धा जिल्ह्याच्या एका कोपऱ्यात होणार असल्याने त्याला प्रारंभी विरोध झाला. मात्र या विरोधाला न जुमानता शिक्षण विभागाने वडनेर हे गाव स्पर्धेकरिता कायम ठेवले. या स्पर्धेला शुक्रवारपासून सुरू असल्याने आठही पंचायत समितीतील शाळा यात सहभागी झाल्या. स्पर्धा एका कोपऱ्यावर असल्याने येथे पोहोचण्याकरिता दुपार झाली. यातच स्पर्धेच्या नियोजनशून्यतमुळे उद्घाटनाचा कार्यक्रम तीन तास लांबला. दुपारी संपणारी स्पर्धा सायंकाळी संपली. थंडीच्या दिवसात रात्री उशिरापर्यंत कार्यक्रम वर्धा : थंडीचे दिवस असल्याने उर्वरीत कार्यकम सायंकाळी घेण्याचे टाळून ते दुसऱ्या दिवशी लवकर घेणे क्रमप्राप्त असताना थंडीतच इतर कार्यक्रम पार पडले. यावेळी आयोजकांकडून कायदा धाब्यावर बसवून तब्बल रात्री १२ वाजतापर्यंत कार्यक्रम घेतले. याकडे येथील पोलीस विभागाकडूनही दुर्लक्ष झाले, याचेच नवल. हे कार्यक्रम झाल्यानंतर विद्यार्थ्यांना रात्री १ वाजेपर्यंत जेवण देण्यात आले. यातही आदेशित असलेल्या मेनूला बगल देत पातळ वरण व पोळ्याच या विद्यार्थ्यांच्या पुढ्यात ठेवण्यात आल्या. विद्यार्थ्यांकरिता दुपारी असलेल्या आयोजनातील मेनूवर आमंत्रित असलेल्या पाहुण्यांनी व त्यांच्यासह आलेल्या कार्यकर्त्यांनी ताव मारला. विद्यार्थ्यांकरिता रिकामी भांडीच पहावयाला मिळाली. जिल्हा परिषदेकडून या क्रीडा स्पर्धेकरिता थोडे थोडके नाही तर १० लाख रुपयांचे अनुदान आहे. या रकमेत उत्तम सोय करणे शक्य असताना असला प्रकार घडत असल्याबाबत काही शिक्षकांनी आश्चर्य व्यक्त केले. याकडे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने दुर्लक्ष केलेच शिवाय नियोजन योग्य आहे ना नाही याची जबाबदारी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचीही तेवढीच होती. तालुका स्पर्धांना विद्यार्थ्यांची मालवाहूतून वाहतूक व आता निकृष्ठ जेवण यामुळे जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांप्रती जिल्हा परिषद प्रशासनाची उदासीनता स्पष्ट होते. (प्रतिनिधी)