शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

18 पैकी तीनच घाटांचे झाले लिलाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 05:00 IST

जिल्ह्यातील हिंगणघाट, समुद्रपूर, आष्टी, आर्वी, देवळी या पाच तालुक्यातून वाहणाऱ्या वर्धा, वणा व यशोदा नदी पात्रावरील ३७ वाळूघाट लिलावास पात्र ठरविण्यात आले होते. त्यापैकी २९ वाळू घाटांना पर्यावरण अनुमती दिल्याने या घाटांच्या लिलावाचा मार्ग मोकळा झाला होता. परंतु यातील जवळपास दहा घाट शासकीय कामांकरिता राखीव ठेवण्यात आल्याने ९ फेब्रुवारीला १८ घाटांचा ई-लिलाव करण्यात आला.

ठळक मुद्दे४ कोटी ९१ लाखांचा मिळणार महसूल : उर्वरित १५ घाटांकरिता फेरप्रक्रिया राबविणार

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : बऱ्याच दिवसाच्या कालावधीनंतर जिल्ह्यातील १८ वाळूघाटांच्या लिलावाकरिता लिलाव प्रक्रिया राबविण्यात आली. यामध्ये केवळ तीन घाटांकरिताच सहा जणांनी निविदा सादर केल्या होत्या. त्यामुळे तिन्ही घाटांचा वर्षभराकरिता ४ कोटी ९१ लाख २ हजार ८२८ रुपयांमध्ये लिलाव झाला असून उर्वरित १५ घाटांकरिता फेरलिलाव प्रक्रिया राबविली जाणार आहे.जिल्ह्यातील हिंगणघाट, समुद्रपूर, आष्टी, आर्वी, देवळी या पाच तालुक्यातून वाहणाऱ्या वर्धा, वणा व यशोदा नदी पात्रावरील ३७ वाळूघाट लिलावास पात्र ठरविण्यात आले होते. त्यापैकी २९ वाळू घाटांना पर्यावरण अनुमती दिल्याने या घाटांच्या लिलावाचा मार्ग मोकळा झाला होता. परंतु यातील जवळपास दहा घाट शासकीय कामांकरिता राखीव ठेवण्यात आल्याने ९ फेब्रुवारीला १८ घाटांचा ई-लिलाव करण्यात आला. यामध्ये देवळी तालुक्यातील सोनेगाव (बाई), टाकळी (चना), हिंगणघाटमधील जुनोना, बोरगाव (दातार), चिकमोह, टेंभा-परसोडी, घाटसावली, चिंचोली, खारडी-भारडी, काजळसरा, गणेशपूर-बोरखेडी तर समुद्रपूर तालुक्यातील शेकापूर (बाई), खुनी-वदली-सेवा, मांडगाव-२, मनगाव, बरबडी, उमरा-औरंगपूर रिठ, औरंगपूर रिठ-उमरा, चाकूर आणि पारडी या घाटांचा समावेश होता. परंतू जिल्ह्यात राजरोसपणे सुरु असलेल्या अवैध वाळू उपस्यामुळे शेकापूर (बाई), मांडगाव-२ आणि मनगाव या तीनच घाटांचा लिलाव झाला. त्यामुळे शासनाच्या तिजोरीतही महसूलाचा ठणठणाट असल्याने दिसून येत आहे.        

या कारणांमुळे लिलावधारकांनी निविदा भरण्याकडे फिरविली पाठ जिल्ह्यात वणा आणि वर्धा नदीपात्रातून सर्वाधिक वाळू उपसा होतो. वर्धा नदीपात्रावर अमरावती व यवतमाळ जिल्ह्याच्या सीमा आहेत.लगतच्या जिल्ह्यात पूर्वीच घाटांचे लिलाव झाल्यामुळे त्यांनी वर्धा जिल्ह्यातील लिलावाकडे दुर्लक्ष केल्याचे बोलले जात आहे.यावर्षी उशिराने घाटांचा लिलाव करण्यात आला आहे. त्यामुळे घाटधारकांनाही कमी कालावधी मिळणार असल्याने घाटाकरिता निविदा प्राप्त झाल्या नाहीत. तसेच जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा सुरु असल्याने सहजच वाळू उपलब्ध होत आहे. त्यामुळेही लिलावाला फारसा प्रतिसाद मिळाला नाही.जिल्ह्यातील पाच वाळूघाट शासकीय बांधकामाकरिता राखीव ठेवण्यात आली आहे. त्यामुळे घाटधारकांकडून शासकीय कामाकरिता वाळू घेतली जाणार नसल्याने घाटधारकांनी यावर्षी लिलाव घेण्याकडे पाठ फिरविल्याचे दिसून येत आहे.

यांनी लावली सर्वाधिक बोली हिंगणघाट तालुक्यातील शेकापूर (बाई) येथील घाटकरिता तिघांच्या निविदा प्राप्त झाल्या. त्यातील लक्ष्मी इन्फ्रा या निविदाधारकाने १ कोटी ५५ लाख २९ हजार ९४८ रुपयात हा घाट घेतला. समुद्रपूर तालुक्यातील मांडगाव-२ आणि मनगांव या दोन घाटांचा लिलाव झाला. मांडगाव येथील घाटाकरिता एकच निविदा प्राप्त झाली होती. मॉ दुर्गा ट्रेडर्सने हा घाट २ कोटी ९ लाख ११ हजार ८०० रुपयांमध्ये घेतला आहे. तर मनगाव येथील घाटाकरिता दोन निविदा प्राप्त झाल्यात. त्यामध्ये सुहानी बिल्डींग मटेरियल सप्लायर्सने १ कोटी २६ लाख ६१ हजार ८० रुपयात वाळू घाट घेतला आहे.

 

टॅग्स :sandवाळू