शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
2
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
3
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
4
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
5
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
6
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
7
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
8
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
9
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
10
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
11
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
12
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
13
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
14
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
15
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
16
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
17
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

केवळ सहाच शेतकऱ्यांना मिळाले अग्रीम कर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 00:35 IST

शासनाने कर्जमाफी जाहीर केल्यानंतर शेतकऱ्यांना १० हजार रुपयांचे अग्रीम कर्ज देण्याच्या सूचना केल्या.

पावसासह शासकीय योजनांचाही शेतकऱ्यांना दगा : जाचक अटींमुळे कर्जवाटपाची गती ढिम्मच रुपेश खैरी। लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : शासनाने कर्जमाफी जाहीर केल्यानंतर शेतकऱ्यांना १० हजार रुपयांचे अग्रीम कर्ज देण्याच्या सूचना केल्या. या सूचनांना बँकांनी नियमांची कैची लावून अग्रीम कर्जाकरिता गेलेल्या शेतकऱ्यांना परत पाठविले. यावर मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या अग्रीम कर्जाची हमी शासन घेईल असे म्हटले, तरीही बँकांनी शेतकऱ्यांना कर्ज देण्यास नकार दिला. अग्रीम कर्जाच्या नावावर वर्धेत केवळ सहाच शेतकऱ्यांना लाभ मिळाल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. यंदाच्या खरीपात शेतकऱ्यांना पावसासह शासनाच्या योजनाही दगा देणाऱ्याच ठरल्या. हवामान विभागाने यंदा उत्तम पाऊस असून तो वेळवेरच बरसणार असल्याचे भाकीत केले. यामुळे गत वर्षीचे नुकसान यंदा भरून काढण्याचा मानस बाळगत कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी मान्सूनपूर्व पेरणी केली. मात्र नेहमीप्रमाणे हवामान खात्याचा अंदाज फोल ठरला आणि शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले. यात मोठ्या दडीनंतर जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली. यात शेतकऱ्यांनी पुन्हा पेरणी केली; मात्र मारलेल्या दडीने काही भागात तिबार पेरणीच्या संकटाला समोरे जावे लागले. खरीपाच्या प्रारंभी शेतकऱ्यांनी कर्जमाफीकरिता राज्यभर आंदोलन केले. याची दखल घेत शासनाने कर्जमाफी जाहीर केली. मात्र ती शेतकऱ्यांच्या तोट्याचीच असल्याचे दिसून आले आहे. कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग होण्यास वेळ लागणार असल्याचे शासनाच्यवतीने शेतकऱ्यांना अग्रीम कर्ज देण्याचा निर्णय घेतला. मात्र बँकांकडून तसे कर्ज देण्यासंदर्भात आदेश दिले नसल्याचे शेतकऱ्यांना सांगत त्यांना आल्या पावली परत पाठविले जात आहे. या कर्जमाफीचा शेतकऱ्यांना लाभच नसल्याचे दिसते. कर्जमाफीची रक्कम बँकेत आल्याशिवाय नवे कर्ज मिळणार नसल्याचे बँका बोलत आहे. यामुळे ही कर्जमाफीही शेतकऱ्यांना दगा देणारीच ठरली असल्याच्या प्रतिक्रीया शेतकऱ्यांकडून मिळत आहे. शासनाच्या सुचनेनुसार जिल्हाधिकाऱ्यांनी अग्रणी बँकेच्या व्यवस्थापकांना शेतकऱ्यांना अग्रीम कर्ज वाटपाच्या सूचना दिल्या. असे असताना त्यांच्याकडून याकडे दुर्लक्ष होत आहे. आमच्याकडे शेतकरीच येत नसल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे. जिल्ह्यात केवळ देवळी येथील दोन बँकेतून केवळ सहा शेतकऱ्यांना १० हजार रुपयांचे अग्रिम कर्ज देण्यात आले आहे. सर्वांना कर्ज देण्याच्या सूचना असताना झालेले कर्जवाटप विचार करायला लावणारे आहे. - ए.बी. कडू, जिल्हा उपनिबंधक, वर्धा पेरण्या अंतिम टप्प्यात; पावसामुळे पीक सध्या समाधानकारक गत दोन तीन दिवसापांसून पावसाने जिल्ह्यात हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी पेरणीला वेग दिला आहे. जिल्ह्यात सरासरी पेरण्या अंतिम टप्प्यात आल्याचे दिसून आले आहे. १० जुलै पर्यंत जिल्ह्यतील ९० टक्के पेरण्या आटोपल्या होत्या. यात २ लाख २० हजार ८४६ हेक्टरवर कपाशी, ९६ हजार ६०१ हेक्टरवर सोयाबीन तर ५८ हजार ८८१ हेक्टरवर तुरीची पेरणी झाल्याची नोंद कृषी विभागात आहे. जिल्ह्यात खरीपाचे क्षेत्र ४ लाख २५ हजार ६५३ हेक्टर असून यंदाच्या हंगामात ४ लाख १८ हजार ५०० पिकांची लागवड होण्याची अपेक्षा कृषी विभागाला आहे. केवळ २०९ जणांनाच मिळाला पीक विम्याचा लाभ गत हंगामात पीक विम्याच्या नावावर केवळ २०९ शेतकऱ्यांना ९ लाख २६ हजार रुपयांचा विमा मंजूर करण्यात आला आहे. वर्धेत कर्जदार आणि गैरअर्जदार अशा एकूण ९६ हजार १७९ शेतकऱ्यांनी विम्याचा हप्ता अदा केला. या हप्त्यापोटी १४ कोटी ८५ लाख रुपये शेतकऱ्यांकडून वसूल करण्यात आले. या पैकी ९११ शेतकऱ्यांनी त्यांना लाभ मिळावा याकरिता नुकसानीची तक्रार केली होती. यात एकूण ७०२ शेतकऱ्यांना मदत नाकारण्यात आली. नव्या पीक विम्याची अंतिम तारीख ३१ जुलै आहे. यात आतापर्यंत कर्जदार गटातील १४ हजार १०७ शेतकऱ्यांनी नव्याने विमा उतरविल्याची माहिती आहे. या शेतकऱ्यांना कर्जाची उचल करतानाच पीक विम्याचा हप्ता कापण्यात आल्याची माहिती आहे.