शहरं
Join us  
Trending Stories
1
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
2
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
3
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
4
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
5
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
6
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
7
निवडणुकीआधी हत्यांमध्ये वाढ; बिहार हादरले, पोलिसांचा दावा काय...
8
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय
9
गुप्तपणे केलेले फोन रेकॉर्डिंग घटस्फोटाच्या खटल्यात कायदेशीर पुरावा मानता येईल
10
‘मोसाद’चे धाडसी ऑपरेशन्स आणि त्याची खासियत काय?
11
इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी यंदा विक्रमी विद्यार्थी नोंदणी 
12
मुंबईकरांच्या स्वप्नातील मोठ्या घराचे स्वप्न साकारणार : मुख्यमंत्री
13
राज्यात १० ऑटोमेटेड ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक
14
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
15
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
16
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
17
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
18
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
19
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
20
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग

मुनगंटीवारांनाच जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदी राहू द्या !

By admin | Updated: July 9, 2016 02:14 IST

फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा शुक्रवारी विस्तार होताच जिल्ह्यात पालकमंत्री बदलाची चर्चा सर्वत्र होऊ लागली आहे.

मुख्यमंत्र्यांना साकडे : मंत्रिमंडळ विस्तार होताच पालकमंत्री बदलाची चर्चावर्धा : फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा शुक्रवारी विस्तार होताच जिल्ह्यात पालकमंत्री बदलाची चर्चा सर्वत्र होऊ लागली आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे वर्धेसह त्यांच्या चंद्रपूर या गृह जिल्ह्याचे पालकमंत्रीपद आहे. मंत्री मंडळाच्या विस्तारानंतर ते वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्रीपद सोडतील, अशी चर्चा वर्धेकरांना अस्वस्थ करीत आहे.इतकेच नव्हे, तर ना. सुधीर मुनगंटीवार यांनी पालकमंत्रीपद सोडले, तर मंत्रिमंडळाच्या विस्तारात राज्यमंत्रीपदी वर्णी लागलेले मुंबईतील डोंबीवलीचे भाजपचे आमदार रवींद्र चव्हाण यांना वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मिळणार, अशीही चर्चा रंगत आहे. मंत्री मंडळ विस्तारापूर्वी यवतमाळचे आमदार मदन येरावार यांची मंत्रिमंडळात वर्णी लागणार असून त्यांच्याकडे वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री पद येणार अशी चर्चा होती. त्यांची मंत्रिमंडळात वर्णी लागली, परंतु मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर ही चर्चा मागे पडली असून ना. रवींद्र चव्हाण यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. वर्धेतील लोकप्रतिनिधींचे मुख्यमंत्र्यांना साकडेवर्धा : अर्थमंत्री व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्रीपद स्वीकारल्यापासून जिल्ह्याच्या विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणावर निधीची तरतुद व्हायला लागली. आघाडी सरकारच्या काळातील सेवाग्राम विकास आराखड्याच्या कामाला गतीच आली नाही, तर निधीचीही तरतुद करण्यात आली. दरम्यानच्या काळात जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने सुरू असलेली वाटचाल बघता भविष्यात वर्धा विकासात अगे्रसर राहील, असे चित्र निर्माण झाले. त्यांनी केवळ विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून दिला नाही, तर जिल्ह्याच्या विकासाची दिशाही निश्चित केली आहे. अशातच त्यांच्याकडून पालकमंत्रीपद निघाले, तर विकासाची गती खुंटतील, अशी भीतीही वर्धेकरांना सतावू लागली आहे. वर्धा जिल्ह्याचे खा. रामदास तडस, आ. डॉ. पंकज भोयर, आ. समीर कुणावार हे सेवाग्राम विकास आराखड्याबाबतची बैठक आणि मंत्रिमंडळ विस्ताराच्या निमित्ताने मुंबईत आहेत. त्यांनाही पालकमंत्री बदलाची चाहुल लागताच त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे घालून ना. सुधीर मुनगंटीवार यांनाच पालकमंत्री म्हणून कायम ठेवावे, असा आग्रह धरला आहे. सोबतच सुधीर मुनगंटीवार यांनाही वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्रीपद सोडू नये, यासाठी साकडे घातल्याची माहिती आहे. याबाबत खा. रामदास तडस यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या बाबीला दुजोरा दिला. आज रात्री मुख्यमंत्र्यासोबत बैठक होणार असून यावेळीही ही मागणी त्यांच्या पुढे ठेवण्यात येणार असल्याचेही खा. तडस म्हणाले.(जिल्हा प्रतिनिधी)