शहरं
Join us  
Trending Stories
1
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
2
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
3
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
4
४० लाख भाविकांसाठी महाप्रसाद; पुरीमध्ये अदानी फाउंडेशनची सेवा
5
वीज प्रति युनिट १ ते १.३० रुपयांनी महागणार; महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचा दावा
6
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
7
लग्नाचं आमिष दाखवून त्याने ५ वर्षांपासून…, RCBच्या स्टार खेळाडूवर शारीरिक शोषणाचा गंभीर आरोप
8
"तुझ्या कुंडलीत आकस्मिक मृत्यू...", शेफाली जरीवालाबाबत अभिनेत्याने केलेली भविष्यवाणी खरी ठरली
9
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
10
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
11
Panvel Crime News: प्रेमसंबंधातून जन्मलेल्या बाळाला फुटपाथवर फेकलं; २४ तासाच्या आत आरोपींना अटक
12
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
13
पतीचं निस्वार्थ प्रेम! शेफाली जरीवालाच्या अंत्यसंस्कारावेळी परागच्या 'त्या' कृतीने वेधलं लक्ष, व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील
14
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
15
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
16
चुका सुधारणार की मारच खात राहणार?
17
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
18
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
19
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
20
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा

दारूचे व्यसन थांबविल्यावरच राष्ट्रीय विकास शक्य

By admin | Updated: June 14, 2014 23:48 IST

दारू पिणाऱ्या शंभरातून किमान दहा व्यक्ती रोज दारूचे व्यसन करतात. त्यामुळे श्रम, वेळ, पैसा वाया जातो. मात्र त्याला त्याचे काहीही वाटत नाही. म्हणूनच दारूचे व्यसन हा आपल्या देशातील सर्वात गंभीर आजार

जनजागरण मोहिमेचा दुसरा टप्पा : अंनिसचा उपक्रमवर्धा : दारू पिणाऱ्या शंभरातून किमान दहा व्यक्ती रोज दारूचे व्यसन करतात. त्यामुळे श्रम, वेळ, पैसा वाया जातो. मात्र त्याला त्याचे काहीही वाटत नाही. म्हणूनच दारूचे व्यसन हा आपल्या देशातील सर्वात गंभीर आजार असल्याचे मत महाराष्ट्र अंधश्रद्ध निर्मूलन समितीचे राज्यसरचिटणीस गजेंद्र सुरकार यांनी व्यक्त केले.आंजी येथील विठ्ठल मंदीरात मार्गदर्शन करताना सुरकार बोलत होते. चेतना विकास या सामाजिक संस्थेतर्फे दारूच्या गंभीर परिणामामुळे होणारे कौटूंबिक वाद, मारहाण, अपघात, घटस्फोट आदींच्या प्रबोधनाकरिता संस्थेच्या मैत्री केंद्र व समाधान केंद्राच्या संयुक्त विद्यमाने जनजागरण मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात करण्यात आली. यांतर्गत हिंगणघाट तालुक्यातील कोरा, आष्टी तालुक्यातील माणिकनगर, वर्धा तालुक्यातील आंजी मोठी येथे महिलांसाठी जनजागरण मेळावे आयोजित करण्यात आले आहे.या प्रसंगी मंचावर व्यसनमुक्ती केंद्राचे संस्थापक दादाराव मुन, बचतगटाच्या अध्यक्षा प्रभा बावणकर, चेतना विकासचे संचालक मुरलीधर मोरे, शिबिर प्रमुख वर्षा ठाकरे आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.सुरकार दारूमुळे होत असलेल्या अपायावर मार्गदर्शन करताना म्हणाले, दारू एकही चांगली गोष्ट होवू देत नाही. शारीरिक, मानसिक, नैतिक पातळीवर दारू व्यक्तीला उद्ध्वस्त करते. दारू पिणारा संशयी होतो. त्यांना भ्रम होवू लागतात. तो खोटा बोलतो, घरातून पैसे चोरण्यापासून घरातील लोकांना मारझोड करतो. प्रसंगी आत्महत्या करतो किंवा दुसऱ्याची हत्या करतो. म्हणूनच दारूचे व्यसन हा कौटूंबिक, सामाजिक व राष्ट्रीय आजार आहे. त्याला थांबविणे म्हणजे राष्ट्राचा विकास होय असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. दारूचे व्यसन असलेल्या पुरुषाच्या पत्नीला दिव्यातून जावे लागते. त्यामुळे तिला काही प्राथमिक उपचार माहिती असने आवश्यक असते. त्यामुळे दादाराव मुन यांनीही औषध व प्रथमोपचाराची माहिती दिली. यावेळी माणिकनगर येथील मेळाव्यास सरपंच काशिनाथ धुर्वे तर कोरा येथे ग्रामपंचायत सदस्या संगिता तामगाडगे, महिला मंडळाच्या अध्यक्ष कुसुम झोडपे प्रामुख्याने उपस्थित होत्या. सोबतच आसपासच्या अनेक गावातील महिला या मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. संचालन मनीषा यादलकर यांनी केले. आभार विमल पांडे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उज्ज्वला वैद्य, छाया महल्ले, विना नाखले, शिला तामसे, लिला सुटे, संध्या सातपुते, शारदा बोरकुटे यांनी परिश्रम घेतले.(शहर प्रतिनिधी)