शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

केवळ 27.10 टक्के व्यक्तींकडे ‘प्रधानमंत्री जनआरोग्य’ कार्ड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2022 11:15 PM

आतापर्यंत केवळ २७.१० टक्केच व्यक्तींना प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचे कार्ड वितरित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यात सेवा पंधरवडा राबवून विविध योजनांची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचवून नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ दिला जात आहे. पण याच सेवा पंधरवड्यात आतापर्यंत केवळ २१२ व्यक्तींना प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचे कार्ड वितरित करण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना ही जगातील सर्वात मोठी योजना आहे. इतकेच नव्हे तर त्याची अंमलबजावणी वर्धा जिल्ह्यातही केली जात आहे. या योजनेंतर्गत वर्धा जिल्ह्याला ४ लाख ७६ हजार ५१४ व्यक्तींची नोंदणी करून कार्ड वितरित करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले. पण आतापर्यंत केवळ २७.१० टक्केच व्यक्तींना प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचे कार्ड वितरित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यात सेवा पंधरवडा राबवून विविध योजनांची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचवून नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ दिला जात आहे. पण याच सेवा पंधरवड्यात आतापर्यंत केवळ २१२ व्यक्तींना प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचे कार्ड वितरित करण्यात आले आहे. त्यामुळे याविषयी जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देत योग्य कार्यवाही करण्याची गरज आहे.

केवळ १,२९,१६८ व्यक्तींनीच घेतले कार्ड- गरीब आणि गरजूंसाठी महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजना व प्रधानमंत्री जनआरोग्य योजना फायद्याची आहे; पण वास्तविक पाहता उद्दिष्टाच्या तुलनेत आतापर्यंत केवळ १ लाख २९ हजार १६८ व्यक्तींना प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचे कार्ड वितरित झाले आहे.

नवीन नोंदणी बंदचप्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचे कार्ड मिळविण्यासाठी नवीन नोंदणी बंद आहे; पण ज्यांची यापूर्वी नोंदणी झाली आहे, मात्र कार्ड मिळाले नाही अशांना नजीकच्या ई-सेवा केंद्रात जाऊन ते सहज प्राप्त करता येत असल्याचे सांगण्यात आले.

जिल्ह्यातील नऊ रुग्णालयांत मिळतेय सेवा- जिल्ह्यातील नऊ रुग्णालयांत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना तसेच महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजनेचा लाभ गरजू व गरिबांना दिला जात आहे. यात सावंगी (मेघे) येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय, सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालय, वर्धा जिल्हा सामान्य रुग्णालय, हिंगणघाट व आर्वी येथील उपजिल्हा रुग्णालय, कारंजा येथील ग्रामीण रुग्णालय, हिंगणघाट येथील लोढा हॉस्पिटल, आर्वी येथील राणे हॉस्पिटल तसेच हिंगणघाट येथील अरिहंत डायलेसीस सेंटरचा समावेश असल्याचे सांगण्यात आले.

महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना ठरतेय दिलासा देणारी- २०२१ ते ३१ ऑगस्ट २०२२ या कालावधीचा विचार केल्यास महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजनेचा जिल्ह्यातील तब्बल २० हजार ७५४ गरजूंना लाभ देण्यात आला आहे. एकूणच ही योजना गरजू व गरिबांसाठी दिलासा देणारीच ठरत आहे.

लिंक फेल होत असल्याने उद्भवतेय वेळोवेळी अडचणसुरू असलेल्या सेवा पंधरवड्यात जास्तीत जास्त नागरिकांना प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचे कार्ड वितरित करण्याचा मानस अधिकाऱ्यांचा असला तरी वेळोवेळी लिंक फेल होत असल्याने याचा नाहक त्रास चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना सोसावा लागत आहे. 

एप्रिल २०२१ ते ऑगस्ट २०२२ पर्यंत महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजनेचा २० हजार ७५४ गरजूंना लाभ देण्यात आला आहे. तर प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेसाठी जिल्ह्याला ४ लाख ७६ हजार ५१४ इतके उद्दिष्ट असून, आतापर्यंत १ लाख २९ हजार १६८ व्यक्तींना कार्ड वितरित करण्यात आले आहे.- डॉ. स्मिता हिवरे, जिल्हा समन्वयक, वर्धा

 

टॅग्स :ayushman bharatआयुष्मान भारत