शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
4
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
5
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
6
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
7
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
8
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
9
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
10
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
11
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
12
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
13
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
14
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
15
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
16
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
17
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
18
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
19
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
20
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

केवळ 27.10 टक्के व्यक्तींकडे ‘प्रधानमंत्री जनआरोग्य’ कार्ड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2022 23:15 IST

आतापर्यंत केवळ २७.१० टक्केच व्यक्तींना प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचे कार्ड वितरित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यात सेवा पंधरवडा राबवून विविध योजनांची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचवून नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ दिला जात आहे. पण याच सेवा पंधरवड्यात आतापर्यंत केवळ २१२ व्यक्तींना प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचे कार्ड वितरित करण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना ही जगातील सर्वात मोठी योजना आहे. इतकेच नव्हे तर त्याची अंमलबजावणी वर्धा जिल्ह्यातही केली जात आहे. या योजनेंतर्गत वर्धा जिल्ह्याला ४ लाख ७६ हजार ५१४ व्यक्तींची नोंदणी करून कार्ड वितरित करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले. पण आतापर्यंत केवळ २७.१० टक्केच व्यक्तींना प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचे कार्ड वितरित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यात सेवा पंधरवडा राबवून विविध योजनांची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचवून नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ दिला जात आहे. पण याच सेवा पंधरवड्यात आतापर्यंत केवळ २१२ व्यक्तींना प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचे कार्ड वितरित करण्यात आले आहे. त्यामुळे याविषयी जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देत योग्य कार्यवाही करण्याची गरज आहे.

केवळ १,२९,१६८ व्यक्तींनीच घेतले कार्ड- गरीब आणि गरजूंसाठी महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजना व प्रधानमंत्री जनआरोग्य योजना फायद्याची आहे; पण वास्तविक पाहता उद्दिष्टाच्या तुलनेत आतापर्यंत केवळ १ लाख २९ हजार १६८ व्यक्तींना प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचे कार्ड वितरित झाले आहे.

नवीन नोंदणी बंदचप्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचे कार्ड मिळविण्यासाठी नवीन नोंदणी बंद आहे; पण ज्यांची यापूर्वी नोंदणी झाली आहे, मात्र कार्ड मिळाले नाही अशांना नजीकच्या ई-सेवा केंद्रात जाऊन ते सहज प्राप्त करता येत असल्याचे सांगण्यात आले.

जिल्ह्यातील नऊ रुग्णालयांत मिळतेय सेवा- जिल्ह्यातील नऊ रुग्णालयांत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना तसेच महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजनेचा लाभ गरजू व गरिबांना दिला जात आहे. यात सावंगी (मेघे) येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय, सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालय, वर्धा जिल्हा सामान्य रुग्णालय, हिंगणघाट व आर्वी येथील उपजिल्हा रुग्णालय, कारंजा येथील ग्रामीण रुग्णालय, हिंगणघाट येथील लोढा हॉस्पिटल, आर्वी येथील राणे हॉस्पिटल तसेच हिंगणघाट येथील अरिहंत डायलेसीस सेंटरचा समावेश असल्याचे सांगण्यात आले.

महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना ठरतेय दिलासा देणारी- २०२१ ते ३१ ऑगस्ट २०२२ या कालावधीचा विचार केल्यास महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजनेचा जिल्ह्यातील तब्बल २० हजार ७५४ गरजूंना लाभ देण्यात आला आहे. एकूणच ही योजना गरजू व गरिबांसाठी दिलासा देणारीच ठरत आहे.

लिंक फेल होत असल्याने उद्भवतेय वेळोवेळी अडचणसुरू असलेल्या सेवा पंधरवड्यात जास्तीत जास्त नागरिकांना प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचे कार्ड वितरित करण्याचा मानस अधिकाऱ्यांचा असला तरी वेळोवेळी लिंक फेल होत असल्याने याचा नाहक त्रास चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना सोसावा लागत आहे. 

एप्रिल २०२१ ते ऑगस्ट २०२२ पर्यंत महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजनेचा २० हजार ७५४ गरजूंना लाभ देण्यात आला आहे. तर प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेसाठी जिल्ह्याला ४ लाख ७६ हजार ५१४ इतके उद्दिष्ट असून, आतापर्यंत १ लाख २९ हजार १६८ व्यक्तींना कार्ड वितरित करण्यात आले आहे.- डॉ. स्मिता हिवरे, जिल्हा समन्वयक, वर्धा

 

टॅग्स :ayushman bharatआयुष्मान भारत