शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

१४ जलाशयांत केवळ १९ टक्केच जलसाठा

By admin | Updated: April 1, 2015 01:46 IST

उन्हाळा सुरू होताच जिल्ह्यातील जलशायची स्थिती खालावली आहे. एकूण १४ जलाशयात आजस्थितीला सरासरी केवळ १८.८८ टक्के जलसाठा शिल्लक आहे.

रूपेश खैरी वर्धाउन्हाळा सुरू होताच जिल्ह्यातील जलशायची स्थिती खालावली आहे. एकूण १४ जलाशयात आजस्थितीला सरासरी केवळ १८.८८ टक्के जलसाठा शिल्लक आहे. मंगळवारी नोंद झालेल्या पाण्याच्या या पातळीमुळे पाण्याचा प्रश्न बिकट होणार असल्याचे संकेत मिळत आहे. ही स्थिती मार्च महिन्याची असून पारा ३९ अंशावर स्थिरावत आहे. एप्रिल महिना उजाडत असला तरी मे, जून महिना अद्याप बाकी आहे. या दोन महिन्यात तापणाऱ्या कडाक्याच्या उन्हात जिल्ह्यातील जलाशयात पाणी राहील अथवा नाही याबाबत शंकाच निर्माण होत आहे. यंदा जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने दुष्काळसदृश स्थिती आहे. पावसाच्या दडीचा विपरीत परिणात शेतीवर झाल्याने महसूल विभागाच्यावतीने सर्व्हे झाला. यात सुमारे एक हजार ३६१ गावांत दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. पावसाच्या अत्यल्प प्रमाणामुळे जलसाठ्यांचीही हीच अवस्था आहे. जिल्ह्यातील मोठ्या जलाशयाची पातळीही खालावली आहे. जिल्ह्यात सध्याच्या स्थितीत अप्पर वर्धाच्या ऊर्ध्व प्रकल्पात सर्वाधिक ३६.७१ टक्के जलसाठा आहे. तर सर्वात कमी पाणी लालनाला प्रकल्पात असल्याची नोंद आहे. येथे ३.०३ टक्के जलसाठा शिल्लक आहे. उपलब्ध असलेला जलसाठा वापरात येऊ शकतो अथवा नाही हे सांगणेही कठीण आहे. नांद प्रकल्प कोरडा झाला असून पोथरा व लालनाला कोरडा पडण्याच्या मार्गावर आला आहे. इतर जलाशयात उपलब्ध असलेल्या जलसाठ्यात उद्योगाकरिता, पिण्याकरिता व शेतीकरिता पाण्याचे आरक्षण करण्यात आले आहे. यात सध्या शेतीचा हंगाम संपण्याच्या मार्गावर असल्याने शेतीला पाणी लागणार नसल्याचे बोलले जात आहे. तर जिल्ह्यात असलेल्या एकमेव मोठ्या उद्योगाकरिता पूर्वीपासूनच पाणी आरक्षित करण्यात आले आहे. जिल्ह्यात ृएकमेव धाम प्रकल्पात पिण्याकरिता पाणी आरक्षित करण्यात आले आहे. यामुळे पाण्याचा उपसा सुरूच आहे. पारगोठाण, परसोडीत ठणठणाट जिल्ह्यात असलेल्या २० लघु प्रकल्पापैकी पारगोठाण व परसोडीत पाण्याचा ठणठणाट आहे. उर्वरित १८ प्रकल्पात सरासरी २५.३१ टक्के जलसाठा शिल्लक आहे. असलेले पाणी वापरण्यायोग्य आहे अथवा नाही हे सांगणेही कठीण आहे. शिल्लक असलेल्या पाण्यात गाळ असल्याने ते वापरणे शक्य नाही.