शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
3
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
4
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
5
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
6
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
7
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
8
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
9
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
10
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
11
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
12
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
13
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
14
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
15
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
16
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
17
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
18
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
19
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
20
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!

१४ जलाशयांत केवळ १९ टक्केच जलसाठा

By admin | Updated: April 1, 2015 01:46 IST

उन्हाळा सुरू होताच जिल्ह्यातील जलशायची स्थिती खालावली आहे. एकूण १४ जलाशयात आजस्थितीला सरासरी केवळ १८.८८ टक्के जलसाठा शिल्लक आहे.

रूपेश खैरी वर्धाउन्हाळा सुरू होताच जिल्ह्यातील जलशायची स्थिती खालावली आहे. एकूण १४ जलाशयात आजस्थितीला सरासरी केवळ १८.८८ टक्के जलसाठा शिल्लक आहे. मंगळवारी नोंद झालेल्या पाण्याच्या या पातळीमुळे पाण्याचा प्रश्न बिकट होणार असल्याचे संकेत मिळत आहे. ही स्थिती मार्च महिन्याची असून पारा ३९ अंशावर स्थिरावत आहे. एप्रिल महिना उजाडत असला तरी मे, जून महिना अद्याप बाकी आहे. या दोन महिन्यात तापणाऱ्या कडाक्याच्या उन्हात जिल्ह्यातील जलाशयात पाणी राहील अथवा नाही याबाबत शंकाच निर्माण होत आहे. यंदा जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने दुष्काळसदृश स्थिती आहे. पावसाच्या दडीचा विपरीत परिणात शेतीवर झाल्याने महसूल विभागाच्यावतीने सर्व्हे झाला. यात सुमारे एक हजार ३६१ गावांत दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. पावसाच्या अत्यल्प प्रमाणामुळे जलसाठ्यांचीही हीच अवस्था आहे. जिल्ह्यातील मोठ्या जलाशयाची पातळीही खालावली आहे. जिल्ह्यात सध्याच्या स्थितीत अप्पर वर्धाच्या ऊर्ध्व प्रकल्पात सर्वाधिक ३६.७१ टक्के जलसाठा आहे. तर सर्वात कमी पाणी लालनाला प्रकल्पात असल्याची नोंद आहे. येथे ३.०३ टक्के जलसाठा शिल्लक आहे. उपलब्ध असलेला जलसाठा वापरात येऊ शकतो अथवा नाही हे सांगणेही कठीण आहे. नांद प्रकल्प कोरडा झाला असून पोथरा व लालनाला कोरडा पडण्याच्या मार्गावर आला आहे. इतर जलाशयात उपलब्ध असलेल्या जलसाठ्यात उद्योगाकरिता, पिण्याकरिता व शेतीकरिता पाण्याचे आरक्षण करण्यात आले आहे. यात सध्या शेतीचा हंगाम संपण्याच्या मार्गावर असल्याने शेतीला पाणी लागणार नसल्याचे बोलले जात आहे. तर जिल्ह्यात असलेल्या एकमेव मोठ्या उद्योगाकरिता पूर्वीपासूनच पाणी आरक्षित करण्यात आले आहे. जिल्ह्यात ृएकमेव धाम प्रकल्पात पिण्याकरिता पाणी आरक्षित करण्यात आले आहे. यामुळे पाण्याचा उपसा सुरूच आहे. पारगोठाण, परसोडीत ठणठणाट जिल्ह्यात असलेल्या २० लघु प्रकल्पापैकी पारगोठाण व परसोडीत पाण्याचा ठणठणाट आहे. उर्वरित १८ प्रकल्पात सरासरी २५.३१ टक्के जलसाठा शिल्लक आहे. असलेले पाणी वापरण्यायोग्य आहे अथवा नाही हे सांगणेही कठीण आहे. शिल्लक असलेल्या पाण्यात गाळ असल्याने ते वापरणे शक्य नाही.