शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC च्या मुदत ठेवींत ८ महिन्यांत २ हजार कोटींनी घट; मागील ३ वर्षात १२ हजार कोटींची घसरण
2
रशियाने भारताला SU-57 लढाऊ विमानांची ऑफर दिली, त्याचे फिचर अन् महत्त्व जाणून घ्या
3
Aadhaar App :'आधार कार्ड'मध्ये बदल करणे होणार सोपे, नवीन अ‍ॅप लाँचच्या तयारीत;मिळणार खास फीचर
4
हाय गर्मी! उष्णतेचा प्रकोप जीवघेणा; युरोपमध्ये ६२,७०० जणांचा मृत्यू, वाढत्या तापमानाचा जगाला धोका
5
९४ मिनिटांचा थरार! विमानांच्या चाकांमध्ये लपून दिल्लीत आलेल्या अफगाणी मुलासोबत पुढे काय घडलं?
6
'चॅटजीपीटी'कडून बनावट नोटा तयार करण्याचे धडे; ५०० रुपयांच्या नोटा बनवल्या आणि बाजारातही वापरल्या
7
महिंद्रा, PNB आणि L&T... दिवाळीपूर्वी मोठी कमाईची संधी! बाजारातील 'हे' ५ शेअर्स ठरू शकतात गेमचेंजर
8
Ladki Bahin Yojana: २६ लाख लाडक्या बहिणींची नावे गायब, ४९०० कोटींचा महाघोटाळा; अजित पवारांच्या बहिणीचा गंभीर आरोप 
9
International: आता अमेरिकेचा हनुमानावरही आक्षेप; म्हणाले, 'खोट्या देवांची मूर्ती....'
10
VIRAL : एका झटक्यात महिला झाली कोट्यधीश; ChatGPTने पालटलं नशीब! वाचून व्हाल हैराण
11
३५० सीसीवरील मोटरसायकलचा जीएसटी वाढला; KTM, Triumph अन् Aprilia ने मोठा निर्णय घेतला...
12
घराशेजारच्या किराणा दुकानांमध्ये ‘GST बचत उत्सवा’चा लाभ नाहीच; ग्राहकांचा झाला अपेक्षाभंग
13
"महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा, आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घ्या’ काँग्रेसची मागणी  
14
Ghaziabad Encounter: गाझियाबाद एन्काउंटरची इतिहासात नोंद, असं वेगळं काय घडलं? 
15
अर्जुन तेंडुलकर राहुल द्रविडच्या मुलाला भिडला; समित द्रविड पहिल्यांदाच खेळला, पण... 
16
मराठी माणसाचं दुकान हडपल्याचा गुन्हा; 'त्या' परप्रांतीयाला शिंदेसेनेकडून जबाबदारी, पक्षात नाराजी
17
"गरबा कार्यक्रमांच्या प्रवेशद्वारावर गोमूत्र ठेवावं, गैर-हिंदूंना..."; धीरेंद्र शास्त्रींचं मोठं विधान
18
मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी, राज ठाकरेंविरोधातील याचिकेवर उच्च न्यायालयाचे प्रश्नचिन्ह
19
दिल्लीतील रस्त्यावर मध्यरात्री चकमकीचा थरार, माया गँगच्या म्होरक्याविरोधात STF ची मोठी कारवाई
20
वयाच्या २९व्या वर्षी वेगवान गोलंदाज निवृत्त; वकील बनण्यासाठी क्रिकेटशी तोडलं नातं!

१४ जलाशयांत केवळ १९ टक्केच जलसाठा

By admin | Updated: April 1, 2015 01:46 IST

उन्हाळा सुरू होताच जिल्ह्यातील जलशायची स्थिती खालावली आहे. एकूण १४ जलाशयात आजस्थितीला सरासरी केवळ १८.८८ टक्के जलसाठा शिल्लक आहे.

रूपेश खैरी वर्धाउन्हाळा सुरू होताच जिल्ह्यातील जलशायची स्थिती खालावली आहे. एकूण १४ जलाशयात आजस्थितीला सरासरी केवळ १८.८८ टक्के जलसाठा शिल्लक आहे. मंगळवारी नोंद झालेल्या पाण्याच्या या पातळीमुळे पाण्याचा प्रश्न बिकट होणार असल्याचे संकेत मिळत आहे. ही स्थिती मार्च महिन्याची असून पारा ३९ अंशावर स्थिरावत आहे. एप्रिल महिना उजाडत असला तरी मे, जून महिना अद्याप बाकी आहे. या दोन महिन्यात तापणाऱ्या कडाक्याच्या उन्हात जिल्ह्यातील जलाशयात पाणी राहील अथवा नाही याबाबत शंकाच निर्माण होत आहे. यंदा जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने दुष्काळसदृश स्थिती आहे. पावसाच्या दडीचा विपरीत परिणात शेतीवर झाल्याने महसूल विभागाच्यावतीने सर्व्हे झाला. यात सुमारे एक हजार ३६१ गावांत दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. पावसाच्या अत्यल्प प्रमाणामुळे जलसाठ्यांचीही हीच अवस्था आहे. जिल्ह्यातील मोठ्या जलाशयाची पातळीही खालावली आहे. जिल्ह्यात सध्याच्या स्थितीत अप्पर वर्धाच्या ऊर्ध्व प्रकल्पात सर्वाधिक ३६.७१ टक्के जलसाठा आहे. तर सर्वात कमी पाणी लालनाला प्रकल्पात असल्याची नोंद आहे. येथे ३.०३ टक्के जलसाठा शिल्लक आहे. उपलब्ध असलेला जलसाठा वापरात येऊ शकतो अथवा नाही हे सांगणेही कठीण आहे. नांद प्रकल्प कोरडा झाला असून पोथरा व लालनाला कोरडा पडण्याच्या मार्गावर आला आहे. इतर जलाशयात उपलब्ध असलेल्या जलसाठ्यात उद्योगाकरिता, पिण्याकरिता व शेतीकरिता पाण्याचे आरक्षण करण्यात आले आहे. यात सध्या शेतीचा हंगाम संपण्याच्या मार्गावर असल्याने शेतीला पाणी लागणार नसल्याचे बोलले जात आहे. तर जिल्ह्यात असलेल्या एकमेव मोठ्या उद्योगाकरिता पूर्वीपासूनच पाणी आरक्षित करण्यात आले आहे. जिल्ह्यात ृएकमेव धाम प्रकल्पात पिण्याकरिता पाणी आरक्षित करण्यात आले आहे. यामुळे पाण्याचा उपसा सुरूच आहे. पारगोठाण, परसोडीत ठणठणाट जिल्ह्यात असलेल्या २० लघु प्रकल्पापैकी पारगोठाण व परसोडीत पाण्याचा ठणठणाट आहे. उर्वरित १८ प्रकल्पात सरासरी २५.३१ टक्के जलसाठा शिल्लक आहे. असलेले पाणी वापरण्यायोग्य आहे अथवा नाही हे सांगणेही कठीण आहे. शिल्लक असलेल्या पाण्यात गाळ असल्याने ते वापरणे शक्य नाही.