शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
2
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
3
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
4
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
5
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
6
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
7
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
8
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
10
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
11
Maharashtra Nagar Palika Election Result: अमरावतीत १२ पैकी ४ निकाल हाती, बच्चू कडूंच्या 'प्रहार', भाजपचं काय झालं?
12
क्रूरतेचा कळस! कोंबडा बनवलं, नाक घासायला लावलं...; कचरा वेचणाऱ्या मुलांना अमानुषपणे मारलं
13
धोक्याची घंटा! डिजिटल युगाचा 'सायलेंट किलर'; १८ हजार वृद्ध विसरले घरचा पत्ता, ५०० जणांचा मृत्यू
14
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
15
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
16
Jawhar Nagar Parishad Election Result 2025: जव्हार नगरपरिषदेवर भाजपचा भगवा, १४ जागांवर उधळला गुलाल, पूजा उदावंत नगरध्यक्ष; शिंदे सेनेला फक्त एवढ्या जागा
17
बँका तुम्हाला क्रेडिट कार्ड घेण्यासाठी का आग्रह धरतात? कुठून होते त्यांची खरी कमाई?
18
Newasa Nagar Panchayat Elections Results 2025 : नेवासामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा नगराध्यक्ष, तर शंकरराव गडाखांचा दबदबा कायम
19
Vengurla Nagar Parishad Election Result 2025: दीपक केसरकरांना धक्का, वेंगुर्ल्यात भाजपाचा ७ जागांवर विजय; शिंदेसेनेला मिळाली १ जागा
20
'देश सोडू नका, अन्यथा परतणे कठीण'; अमेरिकेत नोकरी करणाऱ्या भारतीयांना गुगलचा इशारा!
Daily Top 2Weekly Top 5

केवळ १४०० क्विंटल सोयाबीनची आवक

By admin | Updated: October 21, 2014 22:55 IST

दिवाळीच्या काळात जिल्ह्यातील कृषी बाजार समितीत सोयाबीन व कापूस येत असल्याचा आतापर्यंतचा इतिहास आहे. यंदा मात्र तसे नसल्याचे वास्तव आहे. दिवाळीचे दिवस सुरू झाले असताना जिल्ह्यातील

२७०० ते ३२०० चा दर : दिवाळीत बाजार समिती बंद वर्धा: दिवाळीच्या काळात जिल्ह्यातील कृषी बाजार समितीत सोयाबीन व कापूस येत असल्याचा आतापर्यंतचा इतिहास आहे. यंदा मात्र तसे नसल्याचे वास्तव आहे. दिवाळीचे दिवस सुरू झाले असताना जिल्ह्यातील केवळ एकमेव हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीत आतापर्यंत केवळ १ हजार ४०० क्विंटल सोयाबीन आले आहे. यामुळे यंदा शेतकऱ्यांची दिवाळी अंधारातच असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.आवक कमी असूनही सोयाबीनला मिळणारा भाव अत्यल्प असल्याचे दिसून येत आहे. या बाजारसमितीत आलेल्या सोयाबीनला दोन हजार ७०० ते तीन हजार २०० रुपये क्विंटलचा दर मिळाला आहे. यामुळे यंदा सोयाबीनपासून शेतकऱ्यांना विशेष लाभ होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. नगदी पीक म्हणून शेतकऱ्यांनी सोयाबीनकडे पाहिले आहे. यंदा मात्र तसे होणार असल्याचे चित्र नाही. सोयाबीनवर आलेल्या पैशाच्या आधारावर कुटुंबाची दिवाळी साजरी करण्याची शेतकऱ्यांची आशा सध्या मावळली आहे. शिवाय सोयाबीन विकून त्यातून आलेल्या पैशावर रबी हंगामाची तयारी करण्याची मनीषा बाळगून असतो, मात्र यंदा तीही धुळीस मिळाली आाहे. जिल्ह्यात यंदाच्या खरीपात कपाशीपेक्षा सोयाबीनचा पेरा अधिक झाला आहे. सोयाबीनवर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची भिस्त असताना निसर्गाच्या लहरीपणाचा त्याला चांगलाच फटका बसला. पाऊस उशिरा आल्याने पेरण्या उशिरा झाल्या. याचा विपरीत परिणात उत्पन्नावर झाला. वेळोवेळी पावसाने दिलेल्या दग्यामुळे सोयाबीनचा आकार ज्वारीच्या दाण्यासारखा झाला. यामुळे त्याला बाजारात दर मिळेल अथवा नाही याची चिंता शेतकऱ्यांना पडली आहे. काही भागात उत्पन्न येणार नसल्याची स्थिती आल्याने शेतकऱ्यांनी सोयाबीनची सवंगणी करण्याचेही टाळले आहे. काही ठिकाणी सोयाबीनची तोडणी करण्यात येत असल्याचे चित्र आहे. अशीच स्थिती कपाशीची आहे. पाऊस उशिरा आल्याने पेरण्याही उशिरा झाल्या. परिणामी दसऱ्याचा कापूस खरेदीचा मुहूर्त फसला. दिवाळीपूर्वी कापूस बाजारात येईल असे वाटत असताना यंदा तेही होत नसल्याचे चित्र आहे. दिवाळी तोंडावर आली असताना शेतातील कापूस अद्याप घरीच नसल्याने तो बाजारात येण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. या कारणाने कापसावर दिवाळी करण्याची आशा मावळली आहे.(प्रतिनिधी)