शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
3
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
4
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
5
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
6
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
7
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
8
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
9
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
10
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
11
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
12
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
13
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
14
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
15
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
16
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
17
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
18
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
19
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
20
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप

१३ लाख नागरिकांसाठी केवळ १२ तज्ज्ञ डॉक्टर

By admin | Updated: June 26, 2014 23:26 IST

जिल्ह्यात एक जिल्हा सामान्य रुग्णालय, दोन उपजिल्हा रुग्णालय आणि पाच ग्रामीण रुग्णालयांच्या माध्यमातून १३ लाख नागरिकांना आरोग्य सेवा पुरविण्याचे काम आरोग्य विभागामार्फत करण्यात येत आहे.

वर्धा : जिल्ह्यात एक जिल्हा सामान्य रुग्णालय, दोन उपजिल्हा रुग्णालय आणि पाच ग्रामीण रुग्णालयांच्या माध्यमातून १३ लाख नागरिकांना आरोग्य सेवा पुरविण्याचे काम आरोग्य विभागामार्फत करण्यात येत आहे. या लोकसंख्येचे आरोग्य सुदृढ ठेवण्याची जबाबदारी केवळ १२ तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांना सांभाळावी लागत असल्याचे धक्कादायक वास्तव ‘लोकमत’ने केलेल्या स्टींग आॅपरेशनमधून उघड झाले. यामुळे रुग्णालये असून देखील आरोग्य सेवा मात्र जेमतेच असल्याची बाबही लपून राहिली नाही.जिल्हा मुख्यालयी असलेल्या सामान्य रुग्णालयात वर्गची १९ पदे मंजूर आहे. पैकी सात जागा भरलेल्या असून निम्म्यापेक्षा अधिक म्हणजे तब्बल १२ पदे रिक्त आहे. आर्वी उपजिल्हा रुग्णालयासह वडनेर, पुलगाव आणि समुद्रपूर ग्रामीण रुग्णालय एकाही ठिकाणी तज्ज्ञ डॉक्टर नाही. हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालय असूनही येथे एकही तज्ज्ञ डॉक्टर नाही.जिल्ह्यात आरोग्य यंत्रणेचीच वाणवा असल्याचे दिसून आले. वर्गची एकूण २७ पदे मंजूर आहे. पैकी १२ भरली असून १५ रिक्त आहेत. वर्ग २ ची ७१ पैकी पाच पदे रिक्त आहे. वर्ग ३ ची ३९८ पदे मंजूर असून ६५ पदे रिक्त आहे. वर्ग ४ ची २२८ पैकी ४० पदे रिक्त असल्याचे वास्तव आहे. वर्ग १ आणि वर्ग ३ व ४ च्या पदांमुळे खऱ्या अर्थाने रुग्णालयाची यंत्रणा परिपूर्ण होते. मात्र नेमकी हीच पदे रिक्त असल्यामुळे आरोग्य सेवा आणि स्वच्छतेचा बोजवारा झाला आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयासह उपजिल्हा, ग्रामीण रुग्णालये आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये स्वच्छतेची वाणवा आहे. उपजिल्हा आणि ग्रामीण रुग्णालयात आतील भागात नियमित स्वच्छता होत असल्याचे बघायला मिळाले. मात्र परिसरात घाणीचे साम्राज्य आहे. याकडे आरोग्य प्रशासनाचे लक्ष नसल्याची बाब काहींनी ‘लोकमत’जवळ सांगितली.