शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
4
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
5
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
6
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
7
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
8
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
9
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
10
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
11
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
12
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
13
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
14
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
15
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
16
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
17
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
18
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
19
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
20
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली

वर्धा जिल्ह्यात येणारा कांदा, बटाटा, लसूण आणि आले उतरणार गावाबाहेर; होणार निर्जंतुकीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2020 12:44 IST

राज्याच्या इतर जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. परंतु, याच जिल्ह्यांपैकी काही जिल्ह्यांमधून ग्रीन झोन असलेल्या वर्धा जिल्ह्यात आलू, कांदा, अद्रक आणि लसूण आणल्या जातो. सदर जीवनावश्यक वस्तूंसोबत वर्धा जिल्ह्यात कोरोनाची एन्ट्री होऊ नये म्हणून लोकवस्तीच्या दूर वर्धा जिल्ह्यातील तीन ठिकाणी अनलोडिंग पॉईंट तयार करण्यात आले आहे.

ठळक मुद्देशहराबाहेर ठरवले तीन अनलोडिंग पॉईंटजिल्हा प्रशासनासह कृउबाचा उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: राज्याच्या इतर जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. परंतु, याच जिल्ह्यांपैकी काही जिल्ह्यांमधून ग्रीन झोन असलेल्या वर्धा जिल्ह्यात आलू, कांदा, अद्रक आणि लसूण आणल्या जातो. सदर जीवनावश्यक वस्तूंसोबत वर्धा जिल्ह्यात कोरोनाची एन्ट्री होऊ नये म्हणून लोकवस्तीच्या दूर वर्धा जिल्ह्यातील तीन ठिकाणी अनलोडिंग पॉईंट तयार करण्यात आले आहे. या ठिकाणी इतर जिल्ह्यातून जीवनावश्यक वस्तू घेऊन आलेली वाहने सॅनिटाईज करून त्यातील माल पूर्वी सॅनिटाईज केलेल्या दुसऱ्या मालवाहूत लादून त्याचा स्थानिक व्यापाऱ्यांच्या माध्यमातून वर्धा जिल्ह्यातील नागरिकांना पुरवठा केल्या जाणार आहे. दत्तपूर टी-पॉईंटवरील अनलोडिंग पॉईंटचा श्रीगणेशा जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांच्या हस्ते करण्यात आला.वर्धा जिल्ह्याच्या शेजारी असलेल्या नागपूर, यवतमाळ व अमरावती जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. तेथील रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शिवार राज्यातील इतर जिल्ह्यांमध्येही कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहे. वर्धा जिल्ह्यातील नागरिकांला लागणारा आलू, कांदा, लसूण व अद्रक इतर जिल्ह्यातून येतो. या जीवनावश्यक वस्तूची वाहतूक करणारे अनेकांच्या संपर्कात येताच त्यामुळे त्यांच्या माध्यातून वर्धा जिल्ह्यात कोरोनाची एन्ट्री होऊ नये म्हणून वर्धा शहराच्या दूर दत्तपूर शिवारात अनलोडिंग पॉईंट तयार करण्यात आला आहे. असेच अनलोडिंग पॉईंटट जिल्ह्यात एकूण तीन ठिकाणी तयार करण्यात आले असून दत्तपूर शिवारातील अनलोडिंग पॉईंटचा श्रीगणेशा जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी केला. यावेळी जि.प.चे मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. सचिन ओंम्बासे, वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्याम कार्लेकर, उपविभागीय महसूल अधिकारी सुरेश बगळे, उपविभागीय पोलीस अधिकारी पियुष जगताप, तहसीलदार प्रिती डुडुलकर, जिल्हा माकेर्टींग अधिकारी गौतम वालदे आदींची उपस्थिती होती. अनलोडिंग पॉईंटटवर पहिल्या दिवशी एकूण १३ मोठ्या मालवाहूतील आलू, कांदा, लसूण दक्षता घेत उतरविण्यात आला.अशी राहते मागणीजिल्ह्याचे स्थळ असलेल्या वर्धा शहर आणि परिसरातील नागरिकांसाठी २० टनाचे ७ ते १० ट्रक कांदा तसेच तितकाच आलू, तीन ट्रक लसून व दोन ट्रक अद्रकाची आवश्यकता असते. शिवाय तशी मागणी असते. ही जीवनावश्यक वस्तू इतर जिल्ह्यातून वर्धा जिल्ह्यात येते. ती कोरोनामुक्त रहावी तसेच त्याची वाहतूक करणाऱ्यांच्या संपर्कात कमीत कमी व्यक्ती यावे या हेतूला केंद्रस्थानी ठेऊन दत्तपूर टी-पॉईंट भागातील एका हॉटेलच्या आवारात अनलोडिंग पॉईंट तयार करण्यात आला आहे.चालक राहतो भ्रमणध्वनीवर संपर्कातआलू, कांदा, लसून व अद्रक घेऊन वर्धा जिल्ह्यात येणाऱ्या मालवाहूचा चालक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात भ्रमणध्वनीवर राहतो. तो मालवाहू घेऊन वर्धा जिल्ह्यात एन्ट्री करणार त्यावेळी त्याला अनलोडिंग पॉईंटचे स्थळ सांगण्यात येते. त्याठिकाणी तो पोहोचल्यावर त्याचे वाहन सॅनिटाईज केले जाते. शिवाय त्या मालवाहूत असलेल्या व्यक्तींना वेगळे ठेवले जाते. त्यानंतर सॅनिटाईज केलेल्या दुसऱ्या वाहनात हा माल लादून वर्ध्याच्या व्यापाऱ्यांना वितरीत केला जात असल्याचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्याम कार्लेकर यांनी सांगितले.कोरोना बाधित जिल्ह्यांमधून वर्धा जिल्ह्यात आलू, कांदे, लसूण आणि अद्रकाची आयात होत. परंतु, या जीवनावश्यक वस्तूंसोबत कोरोनाची एन्ट्री वर्धा जिल्ह्यात होऊ नये म्हणून लोकवस्तीच्या दूर जिल्ह्यात तीन ठिकाणी अनलोडिंग पॉईंट तयार करण्यात आले आहे. या ठिकाणी इतर जिल्ह्यातून सदर जीवनावश्यक वस्तू घेऊन आलेले वाहन सॅनिटाईज केले जाते. त्यानंतर सॅनिटाईज केलेल्या दुसऱ्या वाहनात हा माल लादून तो व्यापाऱ्यांना दिला जातो. त्यांच्या माध्यमातून या मालाचा इतर व्यावसायिकांना पुरवठा होणार आहे. यामुळे जिल्हा कोरोनामुक्त रहाण्यासाठी फायदा होणार आहे. शिवाय आलू, कांदा, लसूण व अद्रकाची जिल्ह्यात टंचाई निर्माण होणार नाही.- विवेक भिमनवार, जिल्हाधिकारी वर्धा.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस