शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
3
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
7
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
8
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
9
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
10
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
11
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
12
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
13
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
14
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
15
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
16
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
17
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
18
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
19
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
20
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

एक प्रकल्प, दोन तलाव कोरडे

By admin | Updated: April 20, 2017 00:46 IST

गतवर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने जिल्ह्यातील जलाशयांनी बऱ्यापैकी पातळी गाठली होती;

तीन प्रकल्पांनी गाठला तळ : जलाशयांत सरासरी १९.९१ टक्के जलसाठा वर्धा : गतवर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने जिल्ह्यातील जलाशयांनी बऱ्यापैकी पातळी गाठली होती; पण आता तापमानाने एप्रिल महिन्यातच कमाल मर्यादा गाठल्याने जलसाठ्यांमध्येही झपाट्याने घट होत असल्याचे पाहावयास मिळते. एप्रिल महिन्याच्या मध्यातच दोन तलाव व एक प्रकल्प कोरडा पडला असून तीन प्रकल्पांनी तळ गाठला आहे. शिवाय तलावांतील जलसाठ्यात कमालीची घट झाल्याने तीव्र पाणीटंचाईचे संकेत मिळू लागले आहेत. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा, उद्योगांना तसेच पिण्याचे पाणी पुरविण्याकरिता मोठे व मध्यम अशी १४ प्रकल्प असून २० तलाव आहेत. यातील वर्धा नदीवर असलेल्या अप्पर व निम्न वर्धा, धाम नदीवरील महाकाळी, बोर नदीवरील बोरधरण व वर्धा कार नदी प्रकल्प यावर पाणी पुरवठा योजना आहेत. शिवाय यातील पाणी सिंचन व उद्योगांकरिताही आरक्षित करण्यात आलेले आहे. सध्या या मोठ्या व मध्यम प्रकल्पांमध्ये जलसाठा असला तरी उन्हाळाभर पाणी पुरवठा होऊ शकेल, एवढा साठा नाही. यामुळे पाणी पुरवठ्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सेलू तालुक्यातील मदन उन्नई प्रकल्प कोरडा पडला आहे. या प्रकल्पाची २७१.३० दलघमी साठवण क्षमता आहे. मागील वर्षी एप्रिल महिन्यात पोथरा व पंचधारा हे दोन प्रकल्प कोरडे पडले होते; पण पावसाचे अत्यल्प प्रमाण त्यास कारणीभूत होते. पातळी न गाठल्यानेही झपाट्याने पाणी घटले होते; पण यंदा पातळी गाठूनही एक प्रकल्प कोरडा पडला असून पोथरा, पंचधारा, डोंगरगाव या प्रकल्पांनी तळ गाठला आहे. या जलाशयांत अनुक्रमे १.७१, १.६८ व ०.९८ दलघमी उपयुक्त जलसाठा शिल्लक आहे. जिल्ह्यातील १४ जलाशयांमध्ये सरासरी १९.९१ टक्के उपयुक्त जलसाठा शिल्लक राहिलेला आहे. आता या जलसाठ्यावर जिल्ह्यातील सिंचन, उद्योग आणि पाणी पुरवठा योजना किती काळ टिकतील, हा प्रश्नच आहे. सिंचन आणि पाणी पुरवठ्यामध्ये हातभार लावणाऱ्या जिल्ह्यातील २० पैकी परसोडी व बोरखेडी हे दोन तलाव कोरडे पडले आहेत. शिवाय उर्वरित १८ तलाव मिळूनही केवळ ५.४८ दलघमी जलसाठा शिल्लक राहिलेला आहे. यातील पारगोठाण, कवाडी व मलकापूर तलावांनी तळ गाठला असून उर्वरित तलावांतही अत्यल्प जलसाठा शिल्लक आहे. पाणी पुरवठा नसला तरी अनेक तलावांवर शेतकऱ्यांचे सिंचन अवलंबून आहे. हे तलाव एकामागून एक कोरडे पडत असल्याने सिंचनाचा प्रश्न गंभीर होईल, असे चित्र आहे.(कार्यालय प्रतिनिधी) उपाययोजनांना गती गरजेची जिल्ह्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाने ४३३ उपाययोजना आखल्या आहेत. यात एप्रिल ते जून या दुसऱ्या टप्प्यात ३०५ गावांमध्ये संभाव्य पाणीटंचाईवर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. यावर ५ कोटी ५४ लाख ३४ हजार रुपये खर्च करण्यात येणार आहे. या आराखड्यात ५० सार्वजनिक विहिरींचे खोलीकरण, ११२ नळ पाणी पुरवठा विहिरींची विशेष दुरुस्ती, ७ गावांत तात्पुरती पूरक योजना आणि १४८ खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात येणार आहे. एप्रिल महिन्याचा मध्यावधी सुरू असताना या उपाययोजनांना वेग आल्याचे दिसत नाही. यामुळे या उपाययोजनांना गती देणे गरजेचे झाले आहे. तापमानाच्या उच्चांकामुळे जलसाठ्यात वेगाने घट जिल्ह्यात साधारण मे महिन्यात उन्हाचा पारा ४५-४७ अंशांवर पोहोचतो; पण यंदा एप्रिल महिन्याच्या मध्यावधीतच पाऱ्याने ४५ अंश सेल्सिअस पार केले आहे. या परिणाम जिल्ह्यातील जलाशयांवर होऊ लागला आहे. पाण्याचे बाष्पीभवनही झपाट्याने होत असल्याने जलसाठ्यात दिवसागणिक घट होत असल्याचे पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले आहे.