शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

एक प्रकल्प, दोन तलाव कोरडे

By admin | Updated: April 20, 2017 00:46 IST

गतवर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने जिल्ह्यातील जलाशयांनी बऱ्यापैकी पातळी गाठली होती;

तीन प्रकल्पांनी गाठला तळ : जलाशयांत सरासरी १९.९१ टक्के जलसाठा वर्धा : गतवर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने जिल्ह्यातील जलाशयांनी बऱ्यापैकी पातळी गाठली होती; पण आता तापमानाने एप्रिल महिन्यातच कमाल मर्यादा गाठल्याने जलसाठ्यांमध्येही झपाट्याने घट होत असल्याचे पाहावयास मिळते. एप्रिल महिन्याच्या मध्यातच दोन तलाव व एक प्रकल्प कोरडा पडला असून तीन प्रकल्पांनी तळ गाठला आहे. शिवाय तलावांतील जलसाठ्यात कमालीची घट झाल्याने तीव्र पाणीटंचाईचे संकेत मिळू लागले आहेत. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा, उद्योगांना तसेच पिण्याचे पाणी पुरविण्याकरिता मोठे व मध्यम अशी १४ प्रकल्प असून २० तलाव आहेत. यातील वर्धा नदीवर असलेल्या अप्पर व निम्न वर्धा, धाम नदीवरील महाकाळी, बोर नदीवरील बोरधरण व वर्धा कार नदी प्रकल्प यावर पाणी पुरवठा योजना आहेत. शिवाय यातील पाणी सिंचन व उद्योगांकरिताही आरक्षित करण्यात आलेले आहे. सध्या या मोठ्या व मध्यम प्रकल्पांमध्ये जलसाठा असला तरी उन्हाळाभर पाणी पुरवठा होऊ शकेल, एवढा साठा नाही. यामुळे पाणी पुरवठ्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सेलू तालुक्यातील मदन उन्नई प्रकल्प कोरडा पडला आहे. या प्रकल्पाची २७१.३० दलघमी साठवण क्षमता आहे. मागील वर्षी एप्रिल महिन्यात पोथरा व पंचधारा हे दोन प्रकल्प कोरडे पडले होते; पण पावसाचे अत्यल्प प्रमाण त्यास कारणीभूत होते. पातळी न गाठल्यानेही झपाट्याने पाणी घटले होते; पण यंदा पातळी गाठूनही एक प्रकल्प कोरडा पडला असून पोथरा, पंचधारा, डोंगरगाव या प्रकल्पांनी तळ गाठला आहे. या जलाशयांत अनुक्रमे १.७१, १.६८ व ०.९८ दलघमी उपयुक्त जलसाठा शिल्लक आहे. जिल्ह्यातील १४ जलाशयांमध्ये सरासरी १९.९१ टक्के उपयुक्त जलसाठा शिल्लक राहिलेला आहे. आता या जलसाठ्यावर जिल्ह्यातील सिंचन, उद्योग आणि पाणी पुरवठा योजना किती काळ टिकतील, हा प्रश्नच आहे. सिंचन आणि पाणी पुरवठ्यामध्ये हातभार लावणाऱ्या जिल्ह्यातील २० पैकी परसोडी व बोरखेडी हे दोन तलाव कोरडे पडले आहेत. शिवाय उर्वरित १८ तलाव मिळूनही केवळ ५.४८ दलघमी जलसाठा शिल्लक राहिलेला आहे. यातील पारगोठाण, कवाडी व मलकापूर तलावांनी तळ गाठला असून उर्वरित तलावांतही अत्यल्प जलसाठा शिल्लक आहे. पाणी पुरवठा नसला तरी अनेक तलावांवर शेतकऱ्यांचे सिंचन अवलंबून आहे. हे तलाव एकामागून एक कोरडे पडत असल्याने सिंचनाचा प्रश्न गंभीर होईल, असे चित्र आहे.(कार्यालय प्रतिनिधी) उपाययोजनांना गती गरजेची जिल्ह्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाने ४३३ उपाययोजना आखल्या आहेत. यात एप्रिल ते जून या दुसऱ्या टप्प्यात ३०५ गावांमध्ये संभाव्य पाणीटंचाईवर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. यावर ५ कोटी ५४ लाख ३४ हजार रुपये खर्च करण्यात येणार आहे. या आराखड्यात ५० सार्वजनिक विहिरींचे खोलीकरण, ११२ नळ पाणी पुरवठा विहिरींची विशेष दुरुस्ती, ७ गावांत तात्पुरती पूरक योजना आणि १४८ खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात येणार आहे. एप्रिल महिन्याचा मध्यावधी सुरू असताना या उपाययोजनांना वेग आल्याचे दिसत नाही. यामुळे या उपाययोजनांना गती देणे गरजेचे झाले आहे. तापमानाच्या उच्चांकामुळे जलसाठ्यात वेगाने घट जिल्ह्यात साधारण मे महिन्यात उन्हाचा पारा ४५-४७ अंशांवर पोहोचतो; पण यंदा एप्रिल महिन्याच्या मध्यावधीतच पाऱ्याने ४५ अंश सेल्सिअस पार केले आहे. या परिणाम जिल्ह्यातील जलाशयांवर होऊ लागला आहे. पाण्याचे बाष्पीभवनही झपाट्याने होत असल्याने जलसाठ्यात दिवसागणिक घट होत असल्याचे पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले आहे.