शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

तीन ट्रकच्या धडके त एक ठार, दोन जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2019 21:57 IST

वर्धा ते नागपूर या महामार्गाचे सिमेंटीकरण व विस्तारीकरणाचे काम मागील सहा महिन्यांपासून सुरु आहे. ठिकठिकाणी रस्त्याचे अर्धवट काम व रस्ता वळविला असल्याने अपघातात वाढ होत आहे. मागील सहा महिन्याच्या कालावधीत या मार्गावर तिघांना जीव गमवावा लागला. सोमवारी दुपारी १२ वाजता याच मार्गावरील मामा-भांज्या यांच्या दर्गाहाजवळ तीन ट्रकची भीषण धडक झाल्याने एका चालकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसऱ्या ट्रकचा चालक गंभीर आहे.

ठळक मुद्देसहा महिन्यांत तिघांचा घेतला बळी : किरकोळ अपघात नेहमीचेच

लोकमत न्यूज नेटवर्कपवनार : वर्धा ते नागपूर या महामार्गाचे सिमेंटीकरण व विस्तारीकरणाचे काम मागील सहा महिन्यांपासून सुरु आहे. ठिकठिकाणी रस्त्याचे अर्धवट काम व रस्ता वळविला असल्याने अपघातात वाढ होत आहे. मागील सहा महिन्याच्या कालावधीत या मार्गावर तिघांना जीव गमवावा लागला. सोमवारी दुपारी १२ वाजता याच मार्गावरील मामा-भांज्या यांच्या दर्गाहाजवळ तीन ट्रकची भीषण धडक झाल्याने एका चालकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसऱ्या ट्रकचा चालक गंभीर आहे.गोपाल गुप्ता (४५) रा. नालासोपारा, असे मृतक चालकाचे नाव आहे. तर अकरम शेख मुर्शिदाबाद हा चालक गंभीर जखमी असून त्याच्यावर सेवाग्राम येथे उपचार सुरु आहे. पवनार ते वर्धा दरम्यान असलेल्या मामा-भांज्या यांच्या दर्गाहाजवळ एम. एच. ४८ ए. वाय. ९९३२, डब्ल्यू. बी. ११ डी. ७५०९ क्रमांकाचे ट्रक आणि सी. जी. ०४ जे. बी. ९२७३ क्रमांकांचा ट्रेलर, या तिन्ही वाहनांमध्ये जोरदार धडक झाली. वर्धेकडून एक ट्रक नागपूरकडे जात होता तर एक ट्रक व ट्रेलर नागपुरवरुन वर्धेकडे येत होता. या दरम्यान नागपूरकडून वर्धेकडे येणाºया ट्रकने समोरील ट्रेलरला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात समोरुन येणाºया ट्रकला जबर धडक दिली. यामुळे तिन्ही वाहने एकमेकांना धडकली. यात एम. एच. ४८ ए. वाय. ९९३२ क्रमांकाच्या ट्रकचा चालक गोपाल गुप्ता याचा स्टेअरींग व सीटमध्ये अडकून जागीच मृत्यू झाला. तर डब्ल्यू. बी. ११ डी.७५०९ क्रमांकाच्या ट्रकचा चालक अकरम शेख मुर्शिदाबाद हा गंभीर जखमी झाला. तसेच सी.जी.०४ जे. बी. ९२७३ क्रमांकांच्या ट्रेलरचा चालक सलीउद्दीन खान हा किरकोळ जखमी झाला.सेवाग्राम पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक बोठे व कर्मचारी किटे यांनी घटनास्थळ गाठून के्रनच्या सहाय्याने वाहने बाजुला करीत फसलेल्या मृतकाला बाहेर काढले. त्याच्या नातेवाईकांना घटनेची माहिती देत मृतदेह शवविच्छेदनाकरिता सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आला. या मार्गाचे काम धिम्यागतीने सुरु असल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. यापूर्वी एका शिक्षिकेला व दुचाकीस्वाराला जीव गमवावा लागला. मागील सहा महिन्यात जवळपास दहा पेक्षा जास्त अपघात झाले असून काहींना अपंगत्व आले आहे. त्यामुळे याकडे लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.