शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

तीन ट्रकच्या धडके त एक ठार, दोन जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2019 21:57 IST

वर्धा ते नागपूर या महामार्गाचे सिमेंटीकरण व विस्तारीकरणाचे काम मागील सहा महिन्यांपासून सुरु आहे. ठिकठिकाणी रस्त्याचे अर्धवट काम व रस्ता वळविला असल्याने अपघातात वाढ होत आहे. मागील सहा महिन्याच्या कालावधीत या मार्गावर तिघांना जीव गमवावा लागला. सोमवारी दुपारी १२ वाजता याच मार्गावरील मामा-भांज्या यांच्या दर्गाहाजवळ तीन ट्रकची भीषण धडक झाल्याने एका चालकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसऱ्या ट्रकचा चालक गंभीर आहे.

ठळक मुद्देसहा महिन्यांत तिघांचा घेतला बळी : किरकोळ अपघात नेहमीचेच

लोकमत न्यूज नेटवर्कपवनार : वर्धा ते नागपूर या महामार्गाचे सिमेंटीकरण व विस्तारीकरणाचे काम मागील सहा महिन्यांपासून सुरु आहे. ठिकठिकाणी रस्त्याचे अर्धवट काम व रस्ता वळविला असल्याने अपघातात वाढ होत आहे. मागील सहा महिन्याच्या कालावधीत या मार्गावर तिघांना जीव गमवावा लागला. सोमवारी दुपारी १२ वाजता याच मार्गावरील मामा-भांज्या यांच्या दर्गाहाजवळ तीन ट्रकची भीषण धडक झाल्याने एका चालकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसऱ्या ट्रकचा चालक गंभीर आहे.गोपाल गुप्ता (४५) रा. नालासोपारा, असे मृतक चालकाचे नाव आहे. तर अकरम शेख मुर्शिदाबाद हा चालक गंभीर जखमी असून त्याच्यावर सेवाग्राम येथे उपचार सुरु आहे. पवनार ते वर्धा दरम्यान असलेल्या मामा-भांज्या यांच्या दर्गाहाजवळ एम. एच. ४८ ए. वाय. ९९३२, डब्ल्यू. बी. ११ डी. ७५०९ क्रमांकाचे ट्रक आणि सी. जी. ०४ जे. बी. ९२७३ क्रमांकांचा ट्रेलर, या तिन्ही वाहनांमध्ये जोरदार धडक झाली. वर्धेकडून एक ट्रक नागपूरकडे जात होता तर एक ट्रक व ट्रेलर नागपुरवरुन वर्धेकडे येत होता. या दरम्यान नागपूरकडून वर्धेकडे येणाºया ट्रकने समोरील ट्रेलरला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात समोरुन येणाºया ट्रकला जबर धडक दिली. यामुळे तिन्ही वाहने एकमेकांना धडकली. यात एम. एच. ४८ ए. वाय. ९९३२ क्रमांकाच्या ट्रकचा चालक गोपाल गुप्ता याचा स्टेअरींग व सीटमध्ये अडकून जागीच मृत्यू झाला. तर डब्ल्यू. बी. ११ डी.७५०९ क्रमांकाच्या ट्रकचा चालक अकरम शेख मुर्शिदाबाद हा गंभीर जखमी झाला. तसेच सी.जी.०४ जे. बी. ९२७३ क्रमांकांच्या ट्रेलरचा चालक सलीउद्दीन खान हा किरकोळ जखमी झाला.सेवाग्राम पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक बोठे व कर्मचारी किटे यांनी घटनास्थळ गाठून के्रनच्या सहाय्याने वाहने बाजुला करीत फसलेल्या मृतकाला बाहेर काढले. त्याच्या नातेवाईकांना घटनेची माहिती देत मृतदेह शवविच्छेदनाकरिता सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आला. या मार्गाचे काम धिम्यागतीने सुरु असल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. यापूर्वी एका शिक्षिकेला व दुचाकीस्वाराला जीव गमवावा लागला. मागील सहा महिन्यात जवळपास दहा पेक्षा जास्त अपघात झाले असून काहींना अपंगत्व आले आहे. त्यामुळे याकडे लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.