शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
2
ठाकरे बंधूंच्या युतीला काँग्रेसचा ग्रीन सिग्नल? संजय राऊत म्हणतात, “आमची चर्चा झाली आहे...”
3
'क्रिमीलेअर'बाबत केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; उत्पन्नाची मर्यादा बदलणार?
4
पाकिस्तानातून अवैधपणे शस्त्रास्त्रे पुरवणाऱ्या सलीम पिस्तुलला मुसक्या बांधून आणलं भारतात
5
केवळ आठवणीतच राहणार 'ही' १३३ वर्ष जुनी कंपनी? बंद होण्याच्या मार्गावर, प्रत्येक घराशी आहे हिचं नातं
6
मोहम्मद रिझवान बॉल सोडायला गेला अन् क्लीन बोल्ड झाला! अंपायरनं अशी उडवली खिल्ली (VIDEO)
7
सरकार LIC मधील हिस्सा विकणार, पुढच्या आठवड्यापासून प्रक्रिया सुरू; शेअर विक्रीसाठी रांग
8
गणेशोत्सवासाठी मुंबईहून दोन मोफत ट्रेन सुटणार; टाईम टेबल, तिकीटे कधी मिळणार..., नितेश राणेंची घोषणा...
9
महागाई भत्त्याची १८ महिन्यांची थकबाकी मिळणार का? सरकारने संसदेत दिले उत्तर
10
स्वामींची सेवा न चुकता-नियमितपणे करतो, पण स्वामीकृपा झाली हे कसे ओळखावे? ‘हे’ अनुभव येतातच!
11
Gold Silver Price 13 August 2025: सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, Silver च्या दरात ₹१५३७ ची तेजी; खरेदीपूर्वी पाहा काय आहे नवी किंमत?
12
‘मत चोरी’वरून भाजपाचा काँग्रेसवर प्रतिहल्ला, रायबरेली आणि डायमंड हार्बर येथील उदाहरण देत घेरले   
13
भाजपा विरुद्ध भाजपा लढाईत विरोधी पक्ष बनला 'विजेता'; संसदेत राहुल गांधींनी टाकला डाव, काय घडलं?
14
ईडी चौकशी करत असलेल्या सुरेश रैनाकडे किती संपत्ती? उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत कोणता?
15
भटक्या कुत्र्यांबाबतीत कोर्टाच्या निर्णयाची चर्चा, तिकडे आर्चीने शेअर केला क्युट व्हिडिओ; म्हणाली...
16
जेवढे जन्माला येतायेत, त्यापेक्षा १० लाख जास्त मरतायेत; भारताच्या मित्र देशात 'सायलेंट इमरजंन्सी'!
17
ठाकरे बंधू दादरच्या कबुतरखाना विरोधातील आंदोलनात दिसणार? ‘या’ समितीचे सहभागी होण्याचे आवाहन
18
Jaiprakash associates limited: ₹४ चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणुकदारांच्या उड्या; आता बंद करावं लागलं ट्रेडिंग, अदानींचं जोडलंय नाव
19
चंद्रावर घेऊन जातो...! नासाच्या इंटर्नने चंद्रावरून आणलेला दगड चोरला, बेडखाली ठेवला अन् गर्लफ्रेंडसोबत रोमान्सही केला...

तीन ट्रकच्या धडके त एक ठार, दोन जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2019 21:57 IST

वर्धा ते नागपूर या महामार्गाचे सिमेंटीकरण व विस्तारीकरणाचे काम मागील सहा महिन्यांपासून सुरु आहे. ठिकठिकाणी रस्त्याचे अर्धवट काम व रस्ता वळविला असल्याने अपघातात वाढ होत आहे. मागील सहा महिन्याच्या कालावधीत या मार्गावर तिघांना जीव गमवावा लागला. सोमवारी दुपारी १२ वाजता याच मार्गावरील मामा-भांज्या यांच्या दर्गाहाजवळ तीन ट्रकची भीषण धडक झाल्याने एका चालकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसऱ्या ट्रकचा चालक गंभीर आहे.

ठळक मुद्देसहा महिन्यांत तिघांचा घेतला बळी : किरकोळ अपघात नेहमीचेच

लोकमत न्यूज नेटवर्कपवनार : वर्धा ते नागपूर या महामार्गाचे सिमेंटीकरण व विस्तारीकरणाचे काम मागील सहा महिन्यांपासून सुरु आहे. ठिकठिकाणी रस्त्याचे अर्धवट काम व रस्ता वळविला असल्याने अपघातात वाढ होत आहे. मागील सहा महिन्याच्या कालावधीत या मार्गावर तिघांना जीव गमवावा लागला. सोमवारी दुपारी १२ वाजता याच मार्गावरील मामा-भांज्या यांच्या दर्गाहाजवळ तीन ट्रकची भीषण धडक झाल्याने एका चालकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसऱ्या ट्रकचा चालक गंभीर आहे.गोपाल गुप्ता (४५) रा. नालासोपारा, असे मृतक चालकाचे नाव आहे. तर अकरम शेख मुर्शिदाबाद हा चालक गंभीर जखमी असून त्याच्यावर सेवाग्राम येथे उपचार सुरु आहे. पवनार ते वर्धा दरम्यान असलेल्या मामा-भांज्या यांच्या दर्गाहाजवळ एम. एच. ४८ ए. वाय. ९९३२, डब्ल्यू. बी. ११ डी. ७५०९ क्रमांकाचे ट्रक आणि सी. जी. ०४ जे. बी. ९२७३ क्रमांकांचा ट्रेलर, या तिन्ही वाहनांमध्ये जोरदार धडक झाली. वर्धेकडून एक ट्रक नागपूरकडे जात होता तर एक ट्रक व ट्रेलर नागपुरवरुन वर्धेकडे येत होता. या दरम्यान नागपूरकडून वर्धेकडे येणाºया ट्रकने समोरील ट्रेलरला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात समोरुन येणाºया ट्रकला जबर धडक दिली. यामुळे तिन्ही वाहने एकमेकांना धडकली. यात एम. एच. ४८ ए. वाय. ९९३२ क्रमांकाच्या ट्रकचा चालक गोपाल गुप्ता याचा स्टेअरींग व सीटमध्ये अडकून जागीच मृत्यू झाला. तर डब्ल्यू. बी. ११ डी.७५०९ क्रमांकाच्या ट्रकचा चालक अकरम शेख मुर्शिदाबाद हा गंभीर जखमी झाला. तसेच सी.जी.०४ जे. बी. ९२७३ क्रमांकांच्या ट्रेलरचा चालक सलीउद्दीन खान हा किरकोळ जखमी झाला.सेवाग्राम पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक बोठे व कर्मचारी किटे यांनी घटनास्थळ गाठून के्रनच्या सहाय्याने वाहने बाजुला करीत फसलेल्या मृतकाला बाहेर काढले. त्याच्या नातेवाईकांना घटनेची माहिती देत मृतदेह शवविच्छेदनाकरिता सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आला. या मार्गाचे काम धिम्यागतीने सुरु असल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. यापूर्वी एका शिक्षिकेला व दुचाकीस्वाराला जीव गमवावा लागला. मागील सहा महिन्यात जवळपास दहा पेक्षा जास्त अपघात झाले असून काहींना अपंगत्व आले आहे. त्यामुळे याकडे लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.