शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
3
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
4
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
5
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
6
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
7
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
8
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
9
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
10
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
11
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
12
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
13
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
14
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
15
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
16
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
17
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
18
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
19
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
20
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
Daily Top 2Weekly Top 5

ऑफलाईन शाळेत, मुलांकडे मोबाईल कशाला?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2021 05:00 IST

स्क्रीन टाइम वाढल्याने मुलांचे मानसिक आरोग्यावरही परिणाम झाला होता. अशातच आता ऑफलाइन शाळा सुरू झाल्या असूनही मुलांजवळ मोबाइल राहत असून, मानसिक आरोग्यावर याचा परिणाम होतो आहे.  शाळा ऑफलाइन सुरू झाल्या असल्या, तरी आता अनेक विद्यार्थ्याकडे सुरक्षा काळजी   नावाखाली सर्रास मोबाइल दिसत आहे, त्यामुळे त्याचा दुष्परिणाम होण्याची भीती आता व्यक्त केला जात आहे.

राजेश सोळंकीलोकमत न्यूज नेटवर्कदेऊरवाडा/आर्वी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा, महाविद्यालये बंद होती. मुलांचे ऑनलाइन शिक्षण सुरू होते. त्यामुळे मुले  तासन् तास मोबाइल खेळत होते. कार्टुन गेम, सोशल मीडिया मनोरंजन आदी नवीन साधनांची ऑनलाइन  अभ्यासासोबतच त्यांना सवय लागली. स्क्रीन टाइम वाढल्याने मुलांचे मानसिक आरोग्यावरही परिणाम झाला होता. अशातच आता ऑफलाइन शाळा सुरू झाल्या असूनही मुलांजवळ मोबाइल राहत असून, मानसिक आरोग्यावर याचा परिणाम होतो आहे.  शाळा ऑफलाइन सुरू झाल्या असल्या, तरी आता अनेक विद्यार्थ्याकडे सुरक्षा काळजी   नावाखाली सर्रास मोबाइल दिसत आहे, त्यामुळे त्याचा दुष्परिणाम होण्याची भीती आता व्यक्त केला जात आहे.

सर्व शाळा झाल्या सुरू... म्हणून लागतो मुलांना मोबाइल... आता सर्वच शाळा सुरू झाल्या असल्या, तरी एसटी बंद असल्याने मुलांना खासगी वाहनाने शाळेत येणे-जाणे करावे लागते. त्यामुळे मुलांना काही अडचण आल्यास संपर्क, माहितीसाठी मोबाइल द्यावा लागतो, असे पालकांचे म्हणणे आहे. मात्र, मुलांची सवय टोकाला जाईपर्यंत पालकांनी प्रतीक्षा करू नये. सुरुवातीपासूनच याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. 

शाळेत मोबाईल नकोच......ऑनलाइनमुळे आता मोबाइलची सवय मुलांना  झाली. पालकही आता दुर्लक्ष करतात. शाळेत आल्यावर मुलांचे प्रत्यक्ष वर्गात लक्ष लागत नाही. काय मेसेज आला, कुणी काय पाठविले, याकडे त्यांचे लक्ष राहते. चॅटिंग करत राहत असल्याने शाळेत मोबाइल नकोच. मुलांच्या  मोबाइल सवयीवर पालकांनी नियंत्रण ठेवायला हवे.- साहेबराव अवथळे, प्राचार्य.

आधी मुलांना काही वेळेसाठीच मोबाइल मिळत होता. शाळा, महाविद्यालय, क्लासेस, मैदानावरील खेळ  यात मुलांचा वेळ जात होता. कोरोना  काळात मोबाइल स्क्रीनकडे मुले अत्यंत जवळ आली आहे. प्रत्यक्ष माणसाशी ते दूर गेल्याचे चित्र होते. आता शाळा सुरू झाल्या असल्याने, मोबाइलची सवय तोडणे आवश्यक असून, शाळेत येताना पालकांनी मुलांना मोबाइल देऊ नये.- संजय नांदे, मुख्याध्यापक.

मुलांची काळजी म्हणून दिला मोबाईल...कोरोनात शाळा बंद होत्या  ऑनलाइन क्लासेस होते, त्यामुळे त्यांचा स्क्रीन टाइम वाढलेला होता. आता मुलांना त्याची सवय झाली आहे, ही सवय आता बदलण्यासाठी पालकांना आता मेहनत घ्यावी लागेल, परंतु दुसरी बाब अशी की, मुले शिकण्यासाठी शहरात जातात काही अडचण आली, तर कसे करावे, म्हणून त्यांना मोबाइल दिला आहे.- संजय देशमुख, पालक.  

मोबाइलवर  मर्यादा आणणे आता आवश्यक आहे, परंतु आता बस नाही, खासगी वाहनाने, दुचाकीने मुले शाळेत जातात, त्यामुळे काळजी वाटते. त्यामुळे त्यांच्याकडे मोबाइल दिला आहे.- रवि वानखेडे, पालक. 

 

टॅग्स :SchoolशाळाMobileमोबाइल