शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

ऑफलाईन शाळेत, मुलांकडे मोबाईल कशाला?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2021 05:00 IST

स्क्रीन टाइम वाढल्याने मुलांचे मानसिक आरोग्यावरही परिणाम झाला होता. अशातच आता ऑफलाइन शाळा सुरू झाल्या असूनही मुलांजवळ मोबाइल राहत असून, मानसिक आरोग्यावर याचा परिणाम होतो आहे.  शाळा ऑफलाइन सुरू झाल्या असल्या, तरी आता अनेक विद्यार्थ्याकडे सुरक्षा काळजी   नावाखाली सर्रास मोबाइल दिसत आहे, त्यामुळे त्याचा दुष्परिणाम होण्याची भीती आता व्यक्त केला जात आहे.

राजेश सोळंकीलोकमत न्यूज नेटवर्कदेऊरवाडा/आर्वी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा, महाविद्यालये बंद होती. मुलांचे ऑनलाइन शिक्षण सुरू होते. त्यामुळे मुले  तासन् तास मोबाइल खेळत होते. कार्टुन गेम, सोशल मीडिया मनोरंजन आदी नवीन साधनांची ऑनलाइन  अभ्यासासोबतच त्यांना सवय लागली. स्क्रीन टाइम वाढल्याने मुलांचे मानसिक आरोग्यावरही परिणाम झाला होता. अशातच आता ऑफलाइन शाळा सुरू झाल्या असूनही मुलांजवळ मोबाइल राहत असून, मानसिक आरोग्यावर याचा परिणाम होतो आहे.  शाळा ऑफलाइन सुरू झाल्या असल्या, तरी आता अनेक विद्यार्थ्याकडे सुरक्षा काळजी   नावाखाली सर्रास मोबाइल दिसत आहे, त्यामुळे त्याचा दुष्परिणाम होण्याची भीती आता व्यक्त केला जात आहे.

सर्व शाळा झाल्या सुरू... म्हणून लागतो मुलांना मोबाइल... आता सर्वच शाळा सुरू झाल्या असल्या, तरी एसटी बंद असल्याने मुलांना खासगी वाहनाने शाळेत येणे-जाणे करावे लागते. त्यामुळे मुलांना काही अडचण आल्यास संपर्क, माहितीसाठी मोबाइल द्यावा लागतो, असे पालकांचे म्हणणे आहे. मात्र, मुलांची सवय टोकाला जाईपर्यंत पालकांनी प्रतीक्षा करू नये. सुरुवातीपासूनच याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. 

शाळेत मोबाईल नकोच......ऑनलाइनमुळे आता मोबाइलची सवय मुलांना  झाली. पालकही आता दुर्लक्ष करतात. शाळेत आल्यावर मुलांचे प्रत्यक्ष वर्गात लक्ष लागत नाही. काय मेसेज आला, कुणी काय पाठविले, याकडे त्यांचे लक्ष राहते. चॅटिंग करत राहत असल्याने शाळेत मोबाइल नकोच. मुलांच्या  मोबाइल सवयीवर पालकांनी नियंत्रण ठेवायला हवे.- साहेबराव अवथळे, प्राचार्य.

आधी मुलांना काही वेळेसाठीच मोबाइल मिळत होता. शाळा, महाविद्यालय, क्लासेस, मैदानावरील खेळ  यात मुलांचा वेळ जात होता. कोरोना  काळात मोबाइल स्क्रीनकडे मुले अत्यंत जवळ आली आहे. प्रत्यक्ष माणसाशी ते दूर गेल्याचे चित्र होते. आता शाळा सुरू झाल्या असल्याने, मोबाइलची सवय तोडणे आवश्यक असून, शाळेत येताना पालकांनी मुलांना मोबाइल देऊ नये.- संजय नांदे, मुख्याध्यापक.

मुलांची काळजी म्हणून दिला मोबाईल...कोरोनात शाळा बंद होत्या  ऑनलाइन क्लासेस होते, त्यामुळे त्यांचा स्क्रीन टाइम वाढलेला होता. आता मुलांना त्याची सवय झाली आहे, ही सवय आता बदलण्यासाठी पालकांना आता मेहनत घ्यावी लागेल, परंतु दुसरी बाब अशी की, मुले शिकण्यासाठी शहरात जातात काही अडचण आली, तर कसे करावे, म्हणून त्यांना मोबाइल दिला आहे.- संजय देशमुख, पालक.  

मोबाइलवर  मर्यादा आणणे आता आवश्यक आहे, परंतु आता बस नाही, खासगी वाहनाने, दुचाकीने मुले शाळेत जातात, त्यामुळे काळजी वाटते. त्यामुळे त्यांच्याकडे मोबाइल दिला आहे.- रवि वानखेडे, पालक. 

 

टॅग्स :SchoolशाळाMobileमोबाइल