शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
2
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
3
निळ्या ड्रमातील मर्डर मिस्ट्रीचा खुलासा; पहिल्यांदाच प्रियकरासोबत समोर आली आरोपी पत्नी लक्ष्मी
4
'त्या' ५०० जवानांसाठी सुप्रीम कोर्ट पुढे सरसावलं; केंद्र अन् तिन्ही सैन्य दलाकडे मागितले उत्तर
5
Mumbai Rain Updates Live: मुंबईला उद्याही अतिवृष्टीचा इशारा, सतर्क राहण्याचे आवाहन!
6
शेवटचा श्रावण बुधवार: प्रदोष व्रतासह बुध पूजन; ‘अशी’ करा महादेवांची सेवा, शुभ-मंगल होईल!
7
सलग दुसऱ्या दिवशी बाजारात तेजी! रिलायन्स-टाटासह 'या' शेअर्स ठरले हिरो; कुठे झाली घसरण?
8
"तेजस्विनीचा रात्री ११ वाजता फोन आला अन्...", सुचित्रा बांदेकरांनी सांगितलं नक्की काय घडलं?
9
Thane Rain: कार भुयारी मार्गात फसली अन् मरता मरता...; ठाण्यातील घटनेचा थरारक व्हिडीओ
10
व्लादिमीर पुतिन यांची ऑफर लीक झाली, डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचा प्लान जगाला सांगितला
11
४४ रुपयांच्या स्मॉलकॅप स्टॉकमध्ये तेजी; ५ वर्षात दिला ४०,०००% रिटर्न, FII नं वाढवला हिस्सा
12
नाथपंथीय दीक्षा, माऊलींची परंपरा, स्वामीकृपा; ‘सोऽहम’मंत्र देणारे पावसचे स्वामी स्वरुपानंद
13
विधानसभा निवडणुकीत बंडखोरी करणाऱ्या नेत्याचे निलंबन भाजपकडून रद्द, राणेंची डोकेदुखी वाढणार?
14
गणेश चतुर्थी २०२५: बाप्पाच्या आगमनाला उरले ८ दिवस, घराबाहेर काढा 'या' वस्तू; ज्यामुळे राहू केतू करतात अमंगल!
15
मुंबईपासून हाकेच्या अंतरावर आहे महाराष्ट्राचं 'मिनी काश्मीर'! तुम्ही कधी फिरायला गेलात का?
16
नोकरी खाजगी, पैसा सरकारी! पंतप्रधान विकासित भारत रोजगार योजनेचं पोर्टल सुरू, किती मिळणार पैसे?
17
फक्त १० वर्षांत कोट्यधीश होण्याची संधी! पती-पत्नीसाठी आर्थिक तज्ज्ञांनी सांगितला ‘स्मार्ट’ गुंतवणूक प्लॅन
18
आईने दोन पेग घेतले, त्यानंतर..., निळ्या ड्रमातील मृतदेह प्रकरणात मुलाने दिली धक्कादायक माहिती  
19
Asia Cup 2025 : त्याची काही चूक नाही, पण... आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? पुन्हा तोच रिप्लाय
20
Mumbai Local Train Update: मध्य, हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे सेवा रद्द; कुठून कुठपर्यंत सुरू?

अधिकारी, कर्मचाऱ्यांपूर्वी पोहोचले ‘लोकमत’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 05:00 IST

९.४५ वाजता सर्व अधिकारी व कर्मचाºयांनी कार्यालयात येणे अपेक्षीत होते. मात्र, अपवाद वगळता एकाही कार्यालयात या वेळेत अधिकारी व कर्मचारी पोहोचले नाही. त्यांच्यापूर्वी लोकमतचे प्रतिनिधी कार्यालयात पोहोचल्याचे दिसून येताच अधिकारी व कर्मचाºयांची चांगलीच धावपळ उडाली. काहींनी लगबगीने थम्ब करायची तर काहींनी स्वाक्षरी मारण्याची घिसाडघाई केली.

ठळक मुद्देनऊ वाजतापासून तासभर उपस्थिती : कुठे कार्यालये कुलूपबंद तर कुठे अधिकारी व कर्मचाऱ्यांची दिसली धावपळ

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पाच दिवसांच्या आठवड्यातील कामकाजाचा आजचा पहिला दिवस. नवीन वेळेनुसार शासकीय कार्यालय उघडण्याची वेळ सकाळी ९.३० वाजताची होती. त्यामुळे सातही तालुक्यात निवडलेल्या शासकीय कार्यालयापुढे लोकमतचे प्रतिनिधी सकाळी ९ वाजतापासूनच उपस्थित होते.कार्यालयातील शिपायांनी नवीन वेळेनुसार ९.३० वाजता कार्यालय उघडून आपले दैनंदिन काम सुरू केले. त्यानंतर ९.४५ वाजता सर्व अधिकारी व कर्मचाºयांनी कार्यालयात येणे अपेक्षीत होते. मात्र, अपवाद वगळता एकाही कार्यालयात या वेळेत अधिकारी व कर्मचारी पोहोचले नाही. त्यांच्यापूर्वी लोकमतचे प्रतिनिधी कार्यालयात पोहोचल्याचे दिसून येताच अधिकारी व कर्मचाºयांची चांगलीच धावपळ उडाली. काहींनी लगबगीने थम्ब करायची तर काहींनी स्वाक्षरी मारण्याची घिसाडघाई केली.अशातच हजेरी पटावर स्वाक्षरी करताना रविवार आहे की सोमवार, याचेही भान न ठेवता रविवारच्या रकाण्यातच स्वाक्षरी केल्याचाही प्रकार घडला. काहींनी आपल्या सहकार्यांना भ्रमणध्वनीवर संपर्क साधून कार्यालयात लवकर येण्यास सांगितले, तर काही काहींनी निगरगट्टपणाचे पांघरुण घेतल्याचेही दिसून आले.जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयच्आर्वी मार्गावरील कारला चौकात असलेल्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात पाच दिवसांच्या आठवड्यातील पहिल्याच दिवशी कर्मचाºयांचा चांगलाच गोंधळ उडाला. बोटावर मोजण्याइतकेच कर्मचारी कार्यालयात वेळेत उपस्थित झाले तर अनेकांना नव्या वेळेचा विसर पडल्याचे दिसून आले. कामकाजाचे दिवस कमी केल्याने कामाच्या वेळेत ४५ मिनिटांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे नवीन वेळेनुसार सकाळी ९.४५ वाजतापर्यंत कर्मचाºयांना कार्यालयात हजेरी लावणे अनिवार्य करण्यात आले आहे. सोमवारी सकाळी ९ वाजता शिपायी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय उघडत होता. त्यानंतर कर्तव्याप्रमी प्रामाणिक असलेले कर्मचारी ९.४५ वाजतापर्यंत कार्यालयात उपस्थित झाले. तर बहुतांश कर्मचाºयांना या बदललेल्या वेळेचा विसर पडल्याने ते वेळेवर पोहोचलेच नाही. या कार्यालयात ३० अधिकारी व कर्मचारी तर २४ कंत्राटी कर्मचारी असून एकूण ३४ कर्मचारी कार्यरत आहे. पहिल्या दिवशी हर्षल शेडमाके, घोसळकर, किरण चौधरी, प्रभाकर कुंभारे, अमोल चौधरी, देवेंद्र ठाकरे, स्वप्नील बाभुळकर, सूर्यकांत चौधरी, यशवंत मुरखे, नीतेश कोठेकर, किरण ढोक, अविनाश भागवत हे कर्मचारीच नियोजित वेळेत पोहोचले. उर्वरित अधिकारी व कर्मचारी वेळेनंतरही कार्यालयात आले नाही.रविवारच्या तारखेत केली कर्मचाºयांनी स्वाक्षरीच्सोमवारपासून शासकीय कार्यालयातील कामाकाजाची वेळ बदलविण्यात आल्याने कर्मचाºयांचा चांगलाच गोंधळ उडाला. आपला लेटमार्क लागू नये म्हणून अनेकांनी हजेरी बुकात स्वाक्षरी करण्याची घाई केली. त्यातही लोकमतचा वॉच असल्याने अनेकांना घाम फुटला होता. त्यामुळे बहूतांश कर्मचाºयांनी सोमवार ऐवजी रविवारच्या तारखेतच स्वाक्षरी केली. ही बाब कार्यालयातील अधिकारी घोसाळकर यांच्या लक्षात येताच त्यांनी पुन्हा कर्मचाºयांना बोलावून सोमवारच्या तारखेत स्वाक्षरी करण्यास सांगितले.