शहरं
Join us  
Trending Stories
1
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
2
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
3
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
4
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
5
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
6
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
7
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
8
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
9
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
10
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
11
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
12
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
13
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
14
“महाराष्ट्र विधानपरिषद देशासाठी आदर्श”; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे कौतुकोद्गार
15
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
16
Mamata Banerjee : "मी माफी मागते"; मेस्सीच्या कार्यक्रमातील गोंधळ पाहून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी नाराज
17
H-1B व्हिसाच्या नव्या नियमांवरुन ट्रम्पच गोत्यात, वॉशिंग्टन ते कॅलिफोर्नियापर्यंत १९ राज्यांनी कोर्टाचा दरवाजा ठोठावला
18
Lionel Messi: सॉल्ट लेक स्टेडियम तोडफोडप्रकरणी आयोजकाला अटक, प्रेक्षकांनाही तिकिटाचे पैसे परत मिळणार!
19
WhatsApp कॉलवर बोलताय? तुमचं लोकेशन होऊ शकतं ट्रॅक; सुरक्षिततेसाठी ऑन करा 'ही' सेटिंग
20
शोएब मलिकचं तिसरं लग्नही मोडण्याच्या मार्गावर? सना जावेदसोबतच्या नात्यात दुरावा 
Daily Top 2Weekly Top 5

नागरिकांच्या सुविधेकरिता बदलली कार्यालयीन वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2018 00:09 IST

ऑनलाईन लोकमतवर्धा : शहरालगत असलेली मोठी ग्रामपंचायत म्हणून पिपरी (मेघे) ची ओळख आहे. या भागात बहुतांश रहिवासी सरकारी नोकरीपेशातील आहेत. त्यांना येथे एका कामाकरिता नागरिकांना संपूर्ण दिवस वाया घालवावा लागतो. याची ओरड नागरिकांकडून झाल्याने थेट ग्रामपंचायतीच्या कामकाजात बदल करण्याचा निर्णय ग्रामपंचायतीने घेतला. येथील कामकाज आता सकाळी ८ वाजता सुरू होते. ...

ठळक मुद्दे पिपरी (मेघे) ग्रामपंचायत जिल्ह्यातील पहिली : सकाळी ८ वाजता सुरू होणार कार्यालय

ऑनलाईन लोकमतवर्धा : शहरालगत असलेली मोठी ग्रामपंचायत म्हणून पिपरी (मेघे) ची ओळख आहे. या भागात बहुतांश रहिवासी सरकारी नोकरीपेशातील आहेत. त्यांना येथे एका कामाकरिता नागरिकांना संपूर्ण दिवस वाया घालवावा लागतो. याची ओरड नागरिकांकडून झाल्याने थेट ग्रामपंचायतीच्या कामकाजात बदल करण्याचा निर्णय ग्रामपंचायतीने घेतला. येथील कामकाज आता सकाळी ८ वाजता सुरू होते. एवढ्या सकाळी काम सुरू होणारी ही जिल्ह्यातील पहिलीच ग्रामपंचायत असावी.शासकीय कामकाजाची वेळ सकाळी १० वाजताची आहे. या वेळत काम सुरू होईल हे सांगणेही तसे कठीणच. शासकीय कार्यालयात याचा प्रत्यय अनेकवार नागरिकांना आला आहे. ग्रामपंचायत स्तरावर तर ग्रामसचिव बाहेर गावातून येणारेच आहेत. दिलेल्या वेळेत काम सुरू होणे अशक्यच आहे. यामुळे एका कामाकरिता नागरिकांना पूर्ण दिवसच वाया घालवावा लागतो. याची दखल घेत ग्रामपंचायतीने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांच्या परवानगीने थेट कामाची वेळ बदलवून टाकली आहे.पिपरी ग्रामपंचायतीच्या ग्रामपंचायतीच्या सचिवालाही या वेळेत कार्यालयात हजर राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. सकाळी ८ वाजता गेलेल्या व्यक्तीला त्याच्या कामाकरिता दुपारी येण्याची वेळ लागणार नाही. तात्काळ मिळणारे कागदपत्र त्याला त्याच वेळी मिळेल, अशी सुविधा करण्यात आली आहे. सकाळपासून सुरू झालेले काम दुपारी १ वाजता संपत आहे. यांनतर दुपारी ३ वाजता पुन्हा काम सुरू होते. दुपारी १ ते ३ या काळात आलेली कागदपत्रे कर्मचाऱ्यांमार्फत स्वीकारण्यात येत असून नागरिकांना आवश्यक कागदपत्र तात्काळ देण्यात येत आहे.दोन शनिवार पूर्णवेळशासनाच्या नियमानुसार दोन शनिवार रजेचे असल्याने ते सोडून दोन शनिवारी याच काळात काम सुरू होणार आहे. या वेळेत ग्रामपंचायत कार्यालयात आलेल्या व्यक्तीला आवश्यक कागदपत्र मिळाले नसल्यास त्यांना सरपंचाकडे तक्रार करण्याची मुभा आहे.एका साध्या रहिवाशी प्रमाणपत्राकरिता नागरिकांना दिवस वाया घालवावा लागत असल्याचे दिसून आले. या भागात सरकारी नोकरी पेशा नागरिक आहेत. त्यांना छोट्याशा कामाकरिता दिवस घालवावा लागत होता. यामुळे कामकाजाची वेळ बदलविण्याचा निर्णय ग्रामपंचायतीने घेतला. तसा ठराव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांना दिला. त्यांच्याकडून परवानगी येताच हा निर्णय लागू करण्यात आला आहे. नागरिकांना याचा लाभ होईल अशी अपेक्षा आहे.- अजय गौळकर, सरपंच, पिपरी (मेघे)

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायत