शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

नागरिकांच्या सुविधेकरिता बदलली कार्यालयीन वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2018 00:09 IST

ऑनलाईन लोकमतवर्धा : शहरालगत असलेली मोठी ग्रामपंचायत म्हणून पिपरी (मेघे) ची ओळख आहे. या भागात बहुतांश रहिवासी सरकारी नोकरीपेशातील आहेत. त्यांना येथे एका कामाकरिता नागरिकांना संपूर्ण दिवस वाया घालवावा लागतो. याची ओरड नागरिकांकडून झाल्याने थेट ग्रामपंचायतीच्या कामकाजात बदल करण्याचा निर्णय ग्रामपंचायतीने घेतला. येथील कामकाज आता सकाळी ८ वाजता सुरू होते. ...

ठळक मुद्दे पिपरी (मेघे) ग्रामपंचायत जिल्ह्यातील पहिली : सकाळी ८ वाजता सुरू होणार कार्यालय

ऑनलाईन लोकमतवर्धा : शहरालगत असलेली मोठी ग्रामपंचायत म्हणून पिपरी (मेघे) ची ओळख आहे. या भागात बहुतांश रहिवासी सरकारी नोकरीपेशातील आहेत. त्यांना येथे एका कामाकरिता नागरिकांना संपूर्ण दिवस वाया घालवावा लागतो. याची ओरड नागरिकांकडून झाल्याने थेट ग्रामपंचायतीच्या कामकाजात बदल करण्याचा निर्णय ग्रामपंचायतीने घेतला. येथील कामकाज आता सकाळी ८ वाजता सुरू होते. एवढ्या सकाळी काम सुरू होणारी ही जिल्ह्यातील पहिलीच ग्रामपंचायत असावी.शासकीय कामकाजाची वेळ सकाळी १० वाजताची आहे. या वेळत काम सुरू होईल हे सांगणेही तसे कठीणच. शासकीय कार्यालयात याचा प्रत्यय अनेकवार नागरिकांना आला आहे. ग्रामपंचायत स्तरावर तर ग्रामसचिव बाहेर गावातून येणारेच आहेत. दिलेल्या वेळेत काम सुरू होणे अशक्यच आहे. यामुळे एका कामाकरिता नागरिकांना पूर्ण दिवसच वाया घालवावा लागतो. याची दखल घेत ग्रामपंचायतीने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांच्या परवानगीने थेट कामाची वेळ बदलवून टाकली आहे.पिपरी ग्रामपंचायतीच्या ग्रामपंचायतीच्या सचिवालाही या वेळेत कार्यालयात हजर राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. सकाळी ८ वाजता गेलेल्या व्यक्तीला त्याच्या कामाकरिता दुपारी येण्याची वेळ लागणार नाही. तात्काळ मिळणारे कागदपत्र त्याला त्याच वेळी मिळेल, अशी सुविधा करण्यात आली आहे. सकाळपासून सुरू झालेले काम दुपारी १ वाजता संपत आहे. यांनतर दुपारी ३ वाजता पुन्हा काम सुरू होते. दुपारी १ ते ३ या काळात आलेली कागदपत्रे कर्मचाऱ्यांमार्फत स्वीकारण्यात येत असून नागरिकांना आवश्यक कागदपत्र तात्काळ देण्यात येत आहे.दोन शनिवार पूर्णवेळशासनाच्या नियमानुसार दोन शनिवार रजेचे असल्याने ते सोडून दोन शनिवारी याच काळात काम सुरू होणार आहे. या वेळेत ग्रामपंचायत कार्यालयात आलेल्या व्यक्तीला आवश्यक कागदपत्र मिळाले नसल्यास त्यांना सरपंचाकडे तक्रार करण्याची मुभा आहे.एका साध्या रहिवाशी प्रमाणपत्राकरिता नागरिकांना दिवस वाया घालवावा लागत असल्याचे दिसून आले. या भागात सरकारी नोकरी पेशा नागरिक आहेत. त्यांना छोट्याशा कामाकरिता दिवस घालवावा लागत होता. यामुळे कामकाजाची वेळ बदलविण्याचा निर्णय ग्रामपंचायतीने घेतला. तसा ठराव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांना दिला. त्यांच्याकडून परवानगी येताच हा निर्णय लागू करण्यात आला आहे. नागरिकांना याचा लाभ होईल अशी अपेक्षा आहे.- अजय गौळकर, सरपंच, पिपरी (मेघे)

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायत