शहरं
Join us  
Trending Stories
1
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
2
Russia Ukrain War : डोनाल्ड ट्रम्प युक्रेनचे दोन तुकडे करणार? क्रिमिया अन् दोन मोठी शहरे रशियाला मिळणार
3
तरुण वयात ₹१०० ची बचत वृद्धापकाळात देऊ शकते ३ कोटींची रक्कम; SIP मध्ये गुंतवणुकीसाठी वापरू शकता 'हा' फॉर्म्युला
4
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
5
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
6
परळी हादरलं! लग्नावरून परतताना जीप पुरात वाहून गेली; तिघे बचावले, एकाचा मृत्यू
7
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
8
Video: टोलनाक्यावरील कर्मचारी की गुंड; लष्कराच्या जवानावर तुटून पडले, खांबाला बांधून दांडक्याने मारले
9
चेकच्या मागच्या बाजूला सही का करतात? ९०% लोकांना या प्रश्नाचे उत्तर माहित नसणार
10
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
11
Technology: ATM मधून पैसे काढल्यानंतर तुमचा PIN सुरक्षित राहतो का? 'अशी' घ्या काळजी!
12
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
13
धक्कादायक! रणथंभोर व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची गाडी अचानक पडली बंद आणि मग...
14
श्रावणातला शेवटचा आठवडा; 'या' दिशेला लावा बेलाचे झाड, घरात धन, समृद्धी, पैसा येईल अपार
15
"सिनेमाच्या नावाखाली अभिनेते मजा..." कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करण्यावर आर माधवनचं भाष्य
16
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
17
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
18
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
19
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल
20
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन

नागरिकांच्या सुविधेकरिता बदलली कार्यालयीन वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2018 00:09 IST

ऑनलाईन लोकमतवर्धा : शहरालगत असलेली मोठी ग्रामपंचायत म्हणून पिपरी (मेघे) ची ओळख आहे. या भागात बहुतांश रहिवासी सरकारी नोकरीपेशातील आहेत. त्यांना येथे एका कामाकरिता नागरिकांना संपूर्ण दिवस वाया घालवावा लागतो. याची ओरड नागरिकांकडून झाल्याने थेट ग्रामपंचायतीच्या कामकाजात बदल करण्याचा निर्णय ग्रामपंचायतीने घेतला. येथील कामकाज आता सकाळी ८ वाजता सुरू होते. ...

ठळक मुद्दे पिपरी (मेघे) ग्रामपंचायत जिल्ह्यातील पहिली : सकाळी ८ वाजता सुरू होणार कार्यालय

ऑनलाईन लोकमतवर्धा : शहरालगत असलेली मोठी ग्रामपंचायत म्हणून पिपरी (मेघे) ची ओळख आहे. या भागात बहुतांश रहिवासी सरकारी नोकरीपेशातील आहेत. त्यांना येथे एका कामाकरिता नागरिकांना संपूर्ण दिवस वाया घालवावा लागतो. याची ओरड नागरिकांकडून झाल्याने थेट ग्रामपंचायतीच्या कामकाजात बदल करण्याचा निर्णय ग्रामपंचायतीने घेतला. येथील कामकाज आता सकाळी ८ वाजता सुरू होते. एवढ्या सकाळी काम सुरू होणारी ही जिल्ह्यातील पहिलीच ग्रामपंचायत असावी.शासकीय कामकाजाची वेळ सकाळी १० वाजताची आहे. या वेळत काम सुरू होईल हे सांगणेही तसे कठीणच. शासकीय कार्यालयात याचा प्रत्यय अनेकवार नागरिकांना आला आहे. ग्रामपंचायत स्तरावर तर ग्रामसचिव बाहेर गावातून येणारेच आहेत. दिलेल्या वेळेत काम सुरू होणे अशक्यच आहे. यामुळे एका कामाकरिता नागरिकांना पूर्ण दिवसच वाया घालवावा लागतो. याची दखल घेत ग्रामपंचायतीने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांच्या परवानगीने थेट कामाची वेळ बदलवून टाकली आहे.पिपरी ग्रामपंचायतीच्या ग्रामपंचायतीच्या सचिवालाही या वेळेत कार्यालयात हजर राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. सकाळी ८ वाजता गेलेल्या व्यक्तीला त्याच्या कामाकरिता दुपारी येण्याची वेळ लागणार नाही. तात्काळ मिळणारे कागदपत्र त्याला त्याच वेळी मिळेल, अशी सुविधा करण्यात आली आहे. सकाळपासून सुरू झालेले काम दुपारी १ वाजता संपत आहे. यांनतर दुपारी ३ वाजता पुन्हा काम सुरू होते. दुपारी १ ते ३ या काळात आलेली कागदपत्रे कर्मचाऱ्यांमार्फत स्वीकारण्यात येत असून नागरिकांना आवश्यक कागदपत्र तात्काळ देण्यात येत आहे.दोन शनिवार पूर्णवेळशासनाच्या नियमानुसार दोन शनिवार रजेचे असल्याने ते सोडून दोन शनिवारी याच काळात काम सुरू होणार आहे. या वेळेत ग्रामपंचायत कार्यालयात आलेल्या व्यक्तीला आवश्यक कागदपत्र मिळाले नसल्यास त्यांना सरपंचाकडे तक्रार करण्याची मुभा आहे.एका साध्या रहिवाशी प्रमाणपत्राकरिता नागरिकांना दिवस वाया घालवावा लागत असल्याचे दिसून आले. या भागात सरकारी नोकरी पेशा नागरिक आहेत. त्यांना छोट्याशा कामाकरिता दिवस घालवावा लागत होता. यामुळे कामकाजाची वेळ बदलविण्याचा निर्णय ग्रामपंचायतीने घेतला. तसा ठराव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांना दिला. त्यांच्याकडून परवानगी येताच हा निर्णय लागू करण्यात आला आहे. नागरिकांना याचा लाभ होईल अशी अपेक्षा आहे.- अजय गौळकर, सरपंच, पिपरी (मेघे)

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायत