शहरं
Join us  
Trending Stories
1
शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
2
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
3
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
4
shefali jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
5
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
6
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
7
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
8
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
9
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
10
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
11
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
12
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
13
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
14
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!
15
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
16
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
17
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
18
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
19
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
20
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले

'दफ्तर दिरंगाई कायदा' कागदावरच

By admin | Updated: May 9, 2014 01:48 IST

राज्य शासनाने शासकीय कर्मचाऱ्यांच्या गलथान कारभाराला आवर घालणे व कामात नियमितता, सुसूत्रता आणण्याकरिता 'दफ्तर दिरंगाई कायदा २00५' लागू केला; पण या कायद्याची अंमलबजावणी होत नाही.

वर्धा : राज्य शासनाने शासकीय कर्मचार्‍यांच्या गलथान कारभाराला आवर घालणे व कामात नियमितता, सुसूत्रता आणण्याकरिता 'दफ्तर दिरंगाई कायदा २00५' लागू केला; पण या कायद्याची अंमलबजावणी होत नाही. यामुळे अद्यापही शासकीय कामकाजात सुसूत्रता आलेली नाही. वरिष्ठ अधिकार्‍यांनी या कायद्यावर अंमल करणे गरजेचे आहे.दप्तर दिरंगाईकायद्यानुसार प्रशासकीय प्रकरणांचा निपटारा दिलेल्या मुदतीत करणे बंधनकारक आहे; पण पुलई येथील शेतकर्‍याने फेरफाराकरिता अर्ज करून १३५ दिवसांचा कालावधी लोटला असताना अद्याप प्रकरणाचा निपटारा झाला नाही. यामुळे त्रस्त झालेल्या शेतकर्‍याने तलाठी गोटे यांच्याविरूद्ध दफ्तर दिरंगाई कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. या मागणीचे निवेदन शेतकरी गणेश गायकी यांनी जिल्हाधिकार्‍यांना सादर केले आहे. गायकी यांचे मौजा पुलई शिवारात सर्व्हे क्रं. ५९ मध्ये शेत आहे. त्यांनी फेरफाराकरिता १९ ऑगस्ट २0१३ रोजी अर्ज केला होता. नियमानुसार या प्रक्रियेला १५ दिवसांचा कालावधी लागतो. गायकी हे निर्धारित कालावधीनंतर ग्रा.पं. कार्यालयात गेले; मात्र त्यांना तलाठय़ाने नंतर येण्यास सांगितले. वारंवार चकरा मारूनही काहीच उपयोग झाला नाही. अखेर त्रस्त शेतकर्‍याने तहसीलदार व जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले; पण तलाठय़ाने याकडे दुर्लक्षच केले. कागदपत्रांची पोचपावती मागितली असता तलाठय़ाने नकार दिला. यामुळे शेतकर्‍याने लोकशाही दिनात तक्रार करून न्यायाची मागणी केली; पण अद्याप कुठलीही कारवाईकरण्यात आली नसून शेतकर्‍याला कागदपत्रेही मिळालेली नाहीत. याकडे लक्षदेत दप्तर दिरंगाई कायद्यान्वये कारवाईची मागणी होत आहे.(स्थानिक प्रतिनिधी)