शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
2
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
3
Operation Sindoor Live Updates: स्फोटाचा आवाजांमुळे अमृतसरमध्ये रात्रभर ब्लॅक आऊट; पोलिस म्हणतात काहीच सापडले नाही
4
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
6
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
7
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
8
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
9
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
10
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
11
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
12
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
13
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
14
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
15
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
16
चंद्रावर उमटणार भारतीय अंतराळवीराचे पदचिन्ह
17
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा
18
रोहितने ‘तो’ निर्णय तेव्हाच घेतलेला? गंभीर आलेला, पण रोहित शर्मा अनुपस्थित होता... 
19
रोहित शर्माने घेतली कसोटीतून तडकाफडकी निवृत्ती; इंग्लंड दौऱ्यात मिळणार होता डच्चू...
20
गोष्ट मिठी नदीच्या न उपसलेल्या गाळाची..., गाळाने भरले भ्रष्ट अभियंत्याचे खिसे; चौकशीतून स्पष्ट 

मागण्यांच्या पुर्ततेसाठी जिल्हाधिकाऱ्यांना श्रीफळ अर्पण

By admin | Updated: November 8, 2016 01:40 IST

राज्य हमाल मापाडी महामंडळाच्यावतीने जिल्ह्यात शासकीय गोदामातील हमालांनी सोमवारपासून पाठबंद-

हमाल मापाडी महामंडळाचे आंदोलन : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पूजा वर्धा : राज्य हमाल मापाडी महामंडळाच्यावतीने जिल्ह्यात शासकीय गोदामातील हमालांनी सोमवारपासून पाठबंद-कामबंद आंदोलन पुकारले आहे. विविध मागण्यांना मंजुरी देण्याकरिता आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत तिथे पूजा केली. तसेच जिल्हाधिकाऱ्यांना श्रीफळ अर्पण करून मागण्या पूर्ण करण्याकरिता साकडे घातले. या मागण्यांच्या पूर्ततेकरिता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. या आंदोलनात जिल्ह्यातील शासकीय गोदामात कार्यरत असलेले हमाल सहभागी झाले असल्याने गोदामात धान्यसाठा घेवून आलेल्या ट्रकांच्या रांगा लागल्या असल्याचे दिसून आले. मोर्चानंतर एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन सादर केले. या निवेदनानुसार, शासकीय गोदामातील कामगारांच्या मुळ वेतनातून एकूण ४० टक्के रक्कमेची कपात करण्यात येत आहे. तसेच त्यांना वेळीच वेतन मिळत नसल्याने हमालांना आर्थिक तंगीचा सामना करावा लागत आहे. यामुळे होत असलेली कपात कमी करून वेतन महिन्याच्या १० तारखेच्या आत ते देण्यात यावे अशी मागणी त्यांच्यावतीने करण्यात आली. महाराष्ट्र माथाडी, हमाल व इतर श्रमजिवी अधिनियम १९६९ व त्यानुसार शासनाने विधियुक्त केलेल्या योजनेची वर्धा जिल्ह्यातील सर्व शासकीय गोदामात अंमलबजावणी सुरू आहे. याच अधिनियमाप्रमाणे कामगारांना मूळ मजुरी व त्यावर ३० टक्के रकमेची कपात केली जाते. तसेच दरमहा वेतन मिळत नाही. विशेष म्हणजे मुख्य नियोक्ता म्हणून जिल्हा पुरवठा अधिकारी माथाडी मंडळात नोंदीत आहे. यासंबंधी शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण विभाग, उद्योग उर्जा व कामगार विभागाने २००३ ते २०१६ या कालावधीत वेळोवेळी आदेश व सूचना केलेल्या आहेत. याशिवाय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने वेतन व लेव्हीसंबंधी आदेश दिले आहेत. तरीही कामगारांच्या वेतनातून एकूण ३० टक्के रक्कमेची कपात सुरू असल्याचा आरोप करीत कामगारांच्या मूळ वेतनातील तीस टक्के रक्कमेची कपात बंद करावी, कामगारांचे दरमहा वेतन १० तारखेच्या आत अदा करण्यात यावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. या आंदोलनात आंदोलनात डॉ. हरिष धुरटे, वसंत भागडकर, श्रीराम केवट, खुशाल तुपट, श्रीकृष्ण कैकाडी, दत्तु दुरगुडे, अनिल धोत्रे, किशोर मारबते, गणेश मुते, गंगाधर लांबट यांच्यासह कामगार सहभागी झाले होते.(शहर प्रतिनिधी) मोर्चातून नोंदविला निषेध ४शासकीय गोदामातील कामगारांनी आंदोलनादरम्यान जिल्हाधिकारी कार्यालय ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढून शासनाच्या कामगार विरोधी धोरणांचा निषेध नोंदविला. हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेश द्वाराजवळ आला असता आंदोलनकर्त्यांनी जिल्हा प्रशासनाला प्रसन्न करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर पूजा करून पुष्प व श्रीफळ अर्पण केले. तसेच आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिवसभर ठिय्या दिला. जिल्हा पुरवठा कार्यालयाचे सहाय्यक लेखाधिकारी रामराव चव्हाण यांनी आंदोलन मंडपाला भेट देत आंदोलनकर्त्यांचे म्हणणे जाणून घेतले. गोदामासमोर लागल्या वाहनांच्या रांगा ४शासकीय गोदामातील सर्वच भारवाहकांनी पाठबंद-कामबंद आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनामुळे शासकीय गोदामातील कामकाज ठप्प असल्याचे दिसून आले. येथील एफसीआय गोदामातून शहरातील गांधी पुतळ्याजवळील शासकीय गोदामात ट्रकद्वारे मोठ्या प्रमाणात धान्यसाठा येतो. सर्व कामगार आंदोलनात सहभागी झाल्याने धान्याचे पोते असलेले ट्रक आज तसेच उभे असल्याचे दिसून आले आहे. परिणामी, वर्धेच्या शासकीय गोदामासमोर शासकीय धान्यसाठा भरलेल्या मालवाहू वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. शासकीय गोदामातील कामगारांच्या वेतनातून १० टक्के पीएफ व ३० टक्के लेव्ही अशी एकूण ४० टक्क्याची कपात करण्यात येत आहे. ही कपात बंद करून शासनाने ती रक्कम भरावी, अशी आमची मागणी आहे. जेव्हापासून ही मागणी आम्ही करीत आहो तेव्हापासून पाच जिल्हाधिकारी झालेत; परंतु, कामगारांची समस्या जैसे थेच असून या मागणीकडे पाचही जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. डॉ. हरिष धुरट, उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळ.