शहरं
Join us  
Trending Stories
1
पूरग्रस्तांसाठी ३१,६२८ कोटींचे महापॅकेज; शेतकऱ्यांना दिलासा : दोनऐवजी तीन हेक्टरसाठी मदतीची घाेषणा
2
छोट्या प्लाॅटधारकांची चिंता मिटली; मिळेल मालकी, तुकडेबंदी विनाशुल्क
3
हैदराबाद गॅझेट ‘जीआर’ला स्थगिती नाही; सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे हायकोर्टाचे निर्देश
4
नफ्यासाठी फिक्स होतो भारत विरुद्ध पाकिस्तान लढतींचा ड्रॉ! माइक आथर्टनचा ‘आयसीसी’वर आरोप
5
बिहारमध्ये पैशांचा पाऊस ठरणार का गेमचेंजर? महाराष्ट्रासारखेच निवडणुकीच्या तोंडावर सरकारी 'पॅकेज'
6
न्यायाधीशांच्या तोंडी शेऱ्यांचा सोशल मीडियात विपर्यास केला जात आहे; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली चिंता
7
टाटा सन्सच्या संचालक मंडळावरील नियुक्त्यांवरून उफाळले तीव्र मतभेद; केंद्र सरकार हस्तक्षेप करण्याची शक्यता
8
माझे अनेक डीपफेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली माहिती
9
सराव सामन्यात पृथ्वी शॉ मुंबईविरुद्ध तळपला, तंबूत जाता जाता भडकला...
10
जॉन क्लार्क, मिशेल देवोरेट अन् जॉन मार्टिनिस  यंदाचे भौतिकशास्त्राचे नोबेल पुरस्कार विजेते
11
रत्ने व आभूषण धोरण मंजूर, एक लाख कोटींची गुंतवणूक; पाच लाख रोजगार निर्मितीचे लक्ष्य
12
कर्जमाफीचे आश्वासन सरकार पूर्ण करणारच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुन्हा व्यक्त केला निर्धार 
13
आरक्षण, नोकरीसाठी आत्महत्येची चिठ्ठी अंगलट; तीन विविध समाजांची प्रकरणे : तिघांवर गुन्हा
14
आका मंत्रिमंडळात आहे का? पाटोळेंच्या अटकेवरून मित्रपक्ष व विरोधकांकडून शिंदेसेना लक्ष्य
15
विषारी ‘कफ सिरप’मुळे मृत्यूचे थैमान; १६ तासांत ३ बालकांचा बळी; मृतांची संख्या १६ 
16
वर्धा-भुसावळ, गोंदिया-डोंगरगड रेल्वे मार्ग मंजूर; २४,६३४ कोटी खर्चाच्या चार प्रकल्पांना केंद्राची मंजुरी
17
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
18
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
19
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
20
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण

जीव धोक्यात घालत शेतकऱ्यांची वहिवाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2020 21:49 IST

वर्धा-हिंगणघाट मार्गाचे त्रिनेवा कंत्राटदार कंपनीमार्फत रुंदीकरण केले जात आहे. रस्ता मजबुतीकरणाचे काम पूर्णत्वास गेले आहे. मात्र, विकासाचा समतोल साधताना शेतकºयांच्या अडचणी लक्षात घेण्यात आल्या नाही. वर्धा-हिंगणघाट मार्गालगत शेकडोवर शेतकऱ्यांच्या शेती असून या व्यवसायावरच त्यांचा उदरनिर्वाह आहे. सद्यस्थितीत शेतात गहू, हरभरा आदी रब्बी पिके आहेत. पीक काढणीचा हंगाम सुरू झाला आहे.

ठळक मुद्देवर्धा-हिंगणघाट मार्ग : महामार्ग प्राधिकरण,कंत्राटदाराची अनास्था

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहरासह संपूर्ण जिल्ह्यात विविध ठिकाणी रस्ता नाल्यांचे बांधकाम सुरू आहे. समन्वय आणि नियोजनाच्या अभावामुळे ही विकासकामे शेतकरी आणि नागरिकांकरिता डोकेदुखी ठरू लागली आहेत. अनेकांची रस्ता कामामुळे वहिवाट धोक्याची झाली असल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे.वर्धा-हिंगणघाट मार्गाचे त्रिनेवा कंत्राटदार कंपनीमार्फत रुंदीकरण केले जात आहे. रस्ता मजबुतीकरणाचे काम पूर्णत्वास गेले आहे. मात्र, विकासाचा समतोल साधताना शेतकºयांच्या अडचणी लक्षात घेण्यात आल्या नाही. वर्धा-हिंगणघाट मार्गालगत शेकडोवर शेतकऱ्यांच्या शेती असून या व्यवसायावरच त्यांचा उदरनिर्वाह आहे. सद्यस्थितीत शेतात गहू, हरभरा आदी रब्बी पिके आहेत. पीक काढणीचा हंगाम सुरू झाला आहे. मात्र, नव्याने झालेल्या रस्ता बांधकामाने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर घातली आहे. रस्त्याचे बांधकाम करताना कुणाची वहिवाट ठप्प होऊ नये, याचे भान कंत्राटदार आणि महामार्ग प्राधिकरणाने ठेवले नाही. यामुळे रस्ता अतिशय उंच तर शेतशिवार खाली गेले आहे. परिणामी शेतकऱ्यांना घसरगुंडीप्रमाणे तयार झालेल्या ढिगावरून जीव धोक्यात घालून ये-जा करावी लागत आहे. जिवावर उदार होत बैलबंडीनेही शेतीसाहित्याची वाहतूक करावी लागत आहे. यापूर्वी अनेक शेतकºयांना बैलबंडी घसरून अपघात झाला. कित्येकांना कायमचे अपंगत्व आले. मात्र, कंत्राटदार आणि महामार्ग प्राधिकरणाच्या अभियंत्यांच्या संवेदना बोथट झाल्या आहेत. शेतात जाण्यास रस्ता नसल्याने अनेकांवर कापणीला आलेली पिके शेतातच ठेवण्याची वेळ ओढवली आहे. मात्र, शेतात जाण्याकरिता रस्त्याचे कंत्राटदाराने बांधकाम करून दिले नाही. जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकºयांची महामार्ग प्राधिकरणाकडून थट्टा केली जात आहे. शेतात जाण्याकरिता रस्त्याचे बांधकाम करून देण्यात यावे, अशी मागणी सुनील हिवंज, देवराव हिवंज, प्रवीण जाधव, भरणे, काशीकर, वाणी यांनी केली आहे.शेतकऱ्यांनी शेतातच ठेवला शेतमालरस्त्याचे बांधकाम करताना शेतकऱ्यांचे मत ग्राह्य धरण्यात आले नाही. रस्ता बांधकाम पूर्णत्वास गेले. मात्र, रस्ता उंच आणि शेती खाली अशी आज परिस्थिती आहे. यात वाहतुकीस अडचण निर्माण झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी कापूस आणि चण्याची पोती शेतातच ठेवली आहेत. अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. अशा स्थितीत शेतमाल शेतातच भिजण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली असून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.सध्या पीक काढणीचा हंगाम आहे. रस्ता बांधकामात वहिवाट अडचणीत आली आहे. मजुरांचा आधीच तुटवडा आहे. मजूर मिळत असताना वहिवाटीयोग्य रस्ता नसल्याने मजूर शेतात येण्यास नकार देत असून पीक काढणीत खोडा निर्माण झाला आहे.सुनील हिवंज, शेतकरी, सेलूकाटे