शहरं
Join us  
Trending Stories
1
पंकजा मुंडे यांच्या पीएच्या पत्नीचा संशयास्पद मृत्यू; कुटुंबीयांकडून हत्येचा गंभीर आरोप, वरळी पोलीस ठाण्यात आक्रोश
2
युद्धाचा भडका उडणार, अमेरिका 'या' देशात सत्तांतर घडवण्याच्या तयारीत?; विमाने रद्द, युद्धनौका, लढाऊ विमाने तैनात
3
टॉर्चर अन् चॅटिंगने १० महिन्यातच संपवला संसार; पंकजा मुंडेंच्या पीएच्या पत्नीच्या मृत्यू प्रकरणात गूढ वाढले
4
काळाचा घाला! नैनीतालमध्ये भीषण अपघात, खोल दरीत पडली कार; तिघांचा मृत्यू, १ जखमी
5
"लढाई करून जिंकण्याचा दम नाही म्हणूनच..."; दिल्ली स्फोटावरून लष्करप्रमुख द्विवेदींनी पाकिस्तानचे काढले वाभाडे
6
टीम इंडियावर वनडेत नवा कर्णधार शोधण्याची वेळ! कोण घेणार शुभमन गिलची जागा?
7
जिल्हा परिषद, महापालिका निवडणुकांवर टांगती तलवार; सुप्रीम कोर्टात काय होईल? इच्छुकांची घालमेल
8
VIDEO: हरलेल्या संघाच्या कॅप्टनला विचारलं- "जिंकल्यावर कसं वाटतंय?"; चूक लक्षात येताच....
9
"तू आई-वडिलांना छोट्या गोष्टी..."; फिजिओथेरपिस्टचा होणाऱ्या नवऱ्याला मेसेज, का संपवलं आयुष्य?
10
५ डॉक्टरांनी २६ लाख जमवले; दिल्लीतील स्फोट फक्त ट्रेलर, अनेक शहरांत हल्ल्याची योजना, NIA चा खुलासा
11
आमदार आल्यानंतर उभे न राहिल्याने डॉक्टरवर कारवाई; हायकोर्टानं काढली सरकारची खरडपट्टी, म्हणाले...
12
VIDEO: तुझे लागे न नजरिया... श्रेयंका अन् जेमिमाचा 'टीम इंडिया'च्या पोरींसोबत भन्नाट डान्स
13
नाशिक: तस्कर टोळीतील एकाने वनपथकाच्या हाती दिल्या तुरी; बाऱ्हे वनविश्रामगृहातून ठोकली धूम
14
आजचे राशीभविष्य, २३ नोव्हेंबर २०२५: यश मिळेल, प्रतिष्ठा उंचावेल; पण पाण्यापासून सावधान!
15
VIDEO: स्मृती मंधानाचा होणाऱ्या पतीसोबत अफलातून डान्स, लग्नाआधी 'संगीत'मध्ये तुफान धम्माल
16
मेहनती आहात, सातत्याने काम करता तरीही तुमचे करिअर 'स्लो' झालेय?; तुम्ही ५ 'ट्रॅप'मध्ये अडकलात
17
भाजपा नेत्यानं जिथं कानशिलात लगावली, तिथेच अपमानाचा वचपा काढण्यासाठी शिंदेसेनेचा जल्लोष
18
भाजपचे नेतेच पसरवत आहेत राज्यात भाषिक प्रांतवादाचे विष; उद्धव ठाकरे यांची टीका
19
कुजबुज! आनंद दिघेंच्या मुशीत तयार झालेली शिवसेना ठाण्यात भाजपासमोर नांगी टाकते का? चर्चा सुरू
20
'नॉमिनी' ही मालमत्तेची केवळ 'कायदेशीर विश्वस्त'; मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
Daily Top 2Weekly Top 5

जीव धोक्यात घालत शेतकऱ्यांची वहिवाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2020 21:49 IST

वर्धा-हिंगणघाट मार्गाचे त्रिनेवा कंत्राटदार कंपनीमार्फत रुंदीकरण केले जात आहे. रस्ता मजबुतीकरणाचे काम पूर्णत्वास गेले आहे. मात्र, विकासाचा समतोल साधताना शेतकºयांच्या अडचणी लक्षात घेण्यात आल्या नाही. वर्धा-हिंगणघाट मार्गालगत शेकडोवर शेतकऱ्यांच्या शेती असून या व्यवसायावरच त्यांचा उदरनिर्वाह आहे. सद्यस्थितीत शेतात गहू, हरभरा आदी रब्बी पिके आहेत. पीक काढणीचा हंगाम सुरू झाला आहे.

ठळक मुद्देवर्धा-हिंगणघाट मार्ग : महामार्ग प्राधिकरण,कंत्राटदाराची अनास्था

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहरासह संपूर्ण जिल्ह्यात विविध ठिकाणी रस्ता नाल्यांचे बांधकाम सुरू आहे. समन्वय आणि नियोजनाच्या अभावामुळे ही विकासकामे शेतकरी आणि नागरिकांकरिता डोकेदुखी ठरू लागली आहेत. अनेकांची रस्ता कामामुळे वहिवाट धोक्याची झाली असल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे.वर्धा-हिंगणघाट मार्गाचे त्रिनेवा कंत्राटदार कंपनीमार्फत रुंदीकरण केले जात आहे. रस्ता मजबुतीकरणाचे काम पूर्णत्वास गेले आहे. मात्र, विकासाचा समतोल साधताना शेतकºयांच्या अडचणी लक्षात घेण्यात आल्या नाही. वर्धा-हिंगणघाट मार्गालगत शेकडोवर शेतकऱ्यांच्या शेती असून या व्यवसायावरच त्यांचा उदरनिर्वाह आहे. सद्यस्थितीत शेतात गहू, हरभरा आदी रब्बी पिके आहेत. पीक काढणीचा हंगाम सुरू झाला आहे. मात्र, नव्याने झालेल्या रस्ता बांधकामाने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर घातली आहे. रस्त्याचे बांधकाम करताना कुणाची वहिवाट ठप्प होऊ नये, याचे भान कंत्राटदार आणि महामार्ग प्राधिकरणाने ठेवले नाही. यामुळे रस्ता अतिशय उंच तर शेतशिवार खाली गेले आहे. परिणामी शेतकऱ्यांना घसरगुंडीप्रमाणे तयार झालेल्या ढिगावरून जीव धोक्यात घालून ये-जा करावी लागत आहे. जिवावर उदार होत बैलबंडीनेही शेतीसाहित्याची वाहतूक करावी लागत आहे. यापूर्वी अनेक शेतकºयांना बैलबंडी घसरून अपघात झाला. कित्येकांना कायमचे अपंगत्व आले. मात्र, कंत्राटदार आणि महामार्ग प्राधिकरणाच्या अभियंत्यांच्या संवेदना बोथट झाल्या आहेत. शेतात जाण्यास रस्ता नसल्याने अनेकांवर कापणीला आलेली पिके शेतातच ठेवण्याची वेळ ओढवली आहे. मात्र, शेतात जाण्याकरिता रस्त्याचे कंत्राटदाराने बांधकाम करून दिले नाही. जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकºयांची महामार्ग प्राधिकरणाकडून थट्टा केली जात आहे. शेतात जाण्याकरिता रस्त्याचे बांधकाम करून देण्यात यावे, अशी मागणी सुनील हिवंज, देवराव हिवंज, प्रवीण जाधव, भरणे, काशीकर, वाणी यांनी केली आहे.शेतकऱ्यांनी शेतातच ठेवला शेतमालरस्त्याचे बांधकाम करताना शेतकऱ्यांचे मत ग्राह्य धरण्यात आले नाही. रस्ता बांधकाम पूर्णत्वास गेले. मात्र, रस्ता उंच आणि शेती खाली अशी आज परिस्थिती आहे. यात वाहतुकीस अडचण निर्माण झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी कापूस आणि चण्याची पोती शेतातच ठेवली आहेत. अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. अशा स्थितीत शेतमाल शेतातच भिजण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली असून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.सध्या पीक काढणीचा हंगाम आहे. रस्ता बांधकामात वहिवाट अडचणीत आली आहे. मजुरांचा आधीच तुटवडा आहे. मजूर मिळत असताना वहिवाटीयोग्य रस्ता नसल्याने मजूर शेतात येण्यास नकार देत असून पीक काढणीत खोडा निर्माण झाला आहे.सुनील हिवंज, शेतकरी, सेलूकाटे