शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

१५ दिवसांपासून वहिवाट ठप्प; शेतीकामे खोळंबली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2020 05:00 IST

परिसरात झालेल्या दमदार पावसाने आलेल्या पुरात डिगडोह ते देवळीकडे जाणारा डांबरी रस्ता खचून गेला. तब्बल १५ दिवसांचा कालावधी उलटला पण, रस्त्याची दुरुस्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे बैलबंडी नेणेही शक्य होत असून संपूर्ण वाहतूक ठप्प झाली आहे. डिगडोह येथील नागरिकांना देवळीच मुख्य बाजारपेठ आहे.

ठळक मुद्देपुराच्या पाण्यात रस्ता गेला वाहून : शेती साहित्य आणण्यासाठी १५ कि.मी.चा मारावा लागतोय फेरा

लोकमत न्यूज नेटवर्कचिकणी (जामणी) : नजीकच्या डिगडोह येथील देवळी मार्गावरील पुलाजवळचा डांबरी रस्ता २६ जून रोजी आलेल्या पुरात वाहून गेला होता. त्यामुळे मागील १५ दिवसांपासून शेतकऱ्यांची वहिवाट ठप्प असून शेतीच्या हंगामात शेतीकामे खोळंबल्याने शेतकऱ्यांत संतापाची लाट उसळली आहे.परिसरात झालेल्या दमदार पावसाने आलेल्या पुरात डिगडोह ते देवळीकडे जाणारा डांबरी रस्ता खचून गेला. तब्बल १५ दिवसांचा कालावधी उलटला पण, रस्त्याची दुरुस्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे बैलबंडी नेणेही शक्य होत असून संपूर्ण वाहतूक ठप्प झाली आहे. डिगडोह येथील नागरिकांना देवळीच मुख्य बाजारपेठ आहे.शेतीपयोगी साहित्य आणायचे असल्यास त्यांनी तीन किमी अंतरासाठी चक्क १५ किमीचे अंतर गाठावे लागत आहे. त्यासाठी वाहनकिराया तिप्पटीने द्यावा लागत असल्याने आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. शेतात जायचे असल्यास चार ते पाच किमीचे अंतर गाठावे लागत आहे.संबंधित विभागाने रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली आहे.लोकप्रतिनिधींच्या सूचनेनंतर प्रशासन उदासीनदेवळी येथून हाकेच्या अंतरावर डिगडोह गाव आहे. तसेच जि.प.उपाध्यांचेही गाव अवघ्या चार किमीवर आहे. खासदार रामदास तडस आणि जि.प.उपाध्यक्षा वैशाली येरावार यांनी खचलेल्या रस्त्याची पाहणी केली होती. पण, आज १५ दिवस उलटून गेले तरीही रस्त्याची दुरुस्ती न झाल्याने शेतकºयांसह नागरिकांमधून शासनाच्या धोरणांविषारी नाराजीचा सूर उमटत आहे.या रस्त्याने दुचाकी काढणेही जिकरीचे झाले आहे. इतकेच नव्हेतर पायदळ चालताना जीव मुठीत घेऊन जावे लागत आहे. शेती वाहिसाठी देखील अवघड झाले आहे.- मंगेश येसनखेडे, शेतकरी, डिगडोह.

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर