शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा 'तो' घाव बरोब्बर वर्मावर बसला, पाकिस्तान हडबडला! नूर खान एअरपोर्टवर दडलंय युद्धविरामाचं रहस्य
2
बापरे! गुरुग्राममध्ये एटीएम न फोडता १० लाख रुपये काढले; बँक अन् पोलिसांनाही कळेना
3
बलुचिस्तानात पाकिस्तानी सैन्यावर युक्रेनसारखे हल्ले; बलुच लिबरेशन आर्मीचा मोठा दावा 
4
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
5
"ते कधीच मूर्ख महिलेसाठी घर...", गोविंदासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चेवर सुनीता आहुजानं सोडलं मौन
6
विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव हायवाने कारला उडविले; भीषण अपघातात दोन ठार, पाच गंभीर
7
भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीवर काँग्रेस खासदाराचे मोठे वक्तव्य, पीएम मोदींना केली 'ही' मागणी...
8
भारतीय सैन्यानं उडवली दाणादाण, आता पाकिस्तान सैन्य करतंय कचरा साफ! पाक एअरबेसवर सध्या परिस्थिती काय? 
9
१००० रुपये किंमतीचा Jio चा प्लान आहे बेस्ट; दीर्घ वैधतेसह एन्टरटेन्मेंटचीही मजा, पाहा डिटेल्स
10
India Pakistan War :"हमने भेजे कश्मीर में मुजाहिद...", दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारावेळी नमाज पठण करणाऱ्या अब्दुल रौफच्या व्हिडिओने पाकिस्तानचा पर्दाफाश
11
मृत्यूने गाठण्यापूर्वी 'ती' "मला जगायचंय" एवढेच म्हणत राहिली अन् अखेरचा घेतला श्वास
12
ट्रम्पनी म्हटलं खूप छान, चीननं केलं उलट काम; असं काय चाललंय ज्याचा भारतावर थेट होऊ शकतो परिणाम?
13
India Pakistan War:भारत - पाकिस्तानमधील तणाव निवळतोय, रात्री कोणताही हल्ला झाला नाही; लष्कराने दिली माहिती
14
वडिलांना लग्नाला का बोलावलं नाही? प्रतीकने अखेर खरं कारण सांगितलंच, म्हणाला- "आईची इच्छा होती की..."
15
भारत-पाकिस्तान तणाव कमी करण्यासाठी अमेरिकेनं खरंच मध्यस्थी केली? जाणून घ्या, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
16
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
17
मुलांसाठी Post Office ची खास स्कीम, गॅरंटीड रिटर्न; विमा कव्हरसह बोनसही, अनेकांना याबद्दल कल्पनाही नाही
18
कुठलाही भारतीय पायलट ताब्यात नाही, आमच्या एका विमानाचं नुकसान; पाक लष्कराची कबुली
19
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
20
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही

नर्सिंगची शिष्यवृत्ती रद्द; बंदला संमिश्र प्रतिसाद

By admin | Updated: December 8, 2014 22:38 IST

नर्सिंग अभ्यासक्रमात प्रवेशित विद्यर्थिनींना शिष्यवृत्ती देण्यात येत होती; पण राज्य शासनाने ती बंद करण्याचा फतवा काढला़ यामुळे राज्यातील इमाव, अनु़ जाती, जमाती प्रवर्गाच्या हजारो विद्यार्थिनींचे

वर्धा : नर्सिंग अभ्यासक्रमात प्रवेशित विद्यर्थिनींना शिष्यवृत्ती देण्यात येत होती; पण राज्य शासनाने ती बंद करण्याचा फतवा काढला़ यामुळे राज्यातील इमाव, अनु़ जाती, जमाती प्रवर्गाच्या हजारो विद्यार्थिनींचे शैक्षणिक नुकसान होण्याचा धोका निर्माण झाला आहे़ यामुळे असंतोष पसरला आहे़ हा अन्यायकारक आदेश रद्द करावा, अशी मागणी महात्मा फुले समता परिषदेने केली आहे़ याबाबत निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करून सोमवारी (दि़८) नर्सिंग विद्यालये, शाळा, महाविद्यालयांचा बंद पाळण्यात आला़ या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला़निर्सिंगच्या शिष्यवृत्ती बंदच्या निर्णयाचा निषेध नोंदविण्यात आला़ सोमवारी शहरातील नर्सिंग विद्यालये तसेच शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आले़ यावेळी विद्यार्थिनींनी शिष्यवृत्ती कायम ठेवण्याची मागणी लावून धरत तत्सम घोषणा दिल्या़ नर्सिंगचे शिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थिनींना राज्य शासन शिष्यवृत्ती देत होते. यामुळे गोरगरीब कुटुंबातील विद्यार्थिनी शिक्षण घेऊन नोकरीस पात्र ठरत होत्या. दुर्बल घटकातील नर्सिंगचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती देण्याकरिता शासनाला दरवर्षी ८९ कोटी रुपयांची तरतूद करावी लागत होती; पण राज्यात भाजपची सत्ता आल्यानंतर केवळ उद्योगपती व व्यापाऱ्यांचे हित साध्य करण्यासाठी चुकीची धोरणे राबविली जात आहे़ यात सर्वसामान्य समाज घटकांतील नागरिकांवर अन्याय केला जातो़ ओबीसी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी राज्यभर उभारलेल्या आंदोलनास सध्या मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी समर्थन दिले होते. आघाडी शासनाच्या नाकर्तेपणावर तोफ डागली होती; पण आता ओबीसी, एससी, एसटी प्रवर्गातील नर्सिंगचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींची शिष्यवृत्ती बंद करून भाजप शासनाने खरा चेहरा उघड केला आहे, असा आरोप विभागीय संघटक प्रा. दिवाकर गमे यांनी केला आहे. एकीकडे एलबीटी रद्द करून व्यापाऱ्यांना खुष करण्याचे आश्वासन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार देत असून शिष्यवृत्ती बंद करण्याचा निर्णय घेत बहुजन समाजातील विद्यार्थिनींना अज्ञानाच्या अंध:कारात ढकलत आहे़ या धोरणामुळे विद्यार्थिनींत असंतोष पसरला आहे़ शासनाने आठ दिवसांत नर्सिंगची शिष्यवृत्ती सुरू न केल्यास राज्यभर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा समता परिषदेने दिला़ निवेदन देताना इंदू वानखेडे, प्रीती खुडसंगे, अनिरूद्ध गवई, संजय म्हस्के, किशोरी विलोकर, संगीता काविस्कर, मोनिका मडावी, शिल्पा गोल्हर, प्रतिमा महाजन, कांचन गवई, स्वाती कासारे, कोमल तायडे, प्रेमा वानखेडे आदी उपस्थित होते़(कार्यालय प्रतिनिधी)