शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
2
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
3
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
4
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
5
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?
6
ट्रम्प बनले व्हिलन! केली नवी घोषणा; चित्रपटांवरही लावला १००% टॅरिफ
7
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
8
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
9
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
10
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
11
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
12
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
13
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
14
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
15
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
16
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
17
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
18
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
19
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
20
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...

ओलितासाठी आता ट्रॅक्टरचा वापर, भारनियमनावर शेतकयांची शक्कल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2017 16:41 IST

कृषीपंपाकरिता असलेले भारनियमाचे वेळापत्रक शेतक-यांसाठी त्रासदायक ठरत आहे. वारंवार मागणी करुनही यात बदल होत नसल्याने पिकांना जगविण्यासाठी शेतक-यांनी वेगळी शक्कल लढविली.

वर्धा : कृषीपंपाकरिता असलेले भारनियमाचे वेळापत्रक शेतक-यांसाठी त्रासदायक ठरत आहे. वारंवार मागणी करुनही यात बदल होत नसल्याने पिकांना जगविण्यासाठी शेतक-यांनी वेगळी शक्कल लढविली. घोराड येथे शेतक-यांनी ट्रॅक्टरचलित वीजनिर्मिती यंत्राचा वापर करून ओलित केले. यात वेळेची बचत होते असली तरी ओलिताचा खर्च मात्र वाढला आहे. ट्रॅक्टरचलित यंत्रावर ५, ३, ७.५ ते २ अश्वशक्ती मर्यादा असलेले विद्युतपंप कार्य करतात. यावर ६० स्प्रींकलरचे नोझलने सिंचन करता येते. कमी वेळात जास्त ओलित करणे शक्य होत आहे. दिवसाला ३ ते ४ एकरातील ओलित येथील शेतकरी करू लागला आहे. याकरिता शेतक-याला ५ हजार रुपए खर्च येतो. ज्या शेतक-याकडे स्वत:च्या मालकीचा ट्रॅक्टर आहे त्याला दोन ते अडीच हजार रुपए खर्च येतो. हा सर्व खटाटोप करुन शेतकरी ओलित करीत असला तरी शेतक-यांना खर्च परवडणारा नाही. भारनियमनाचे वेळापत्रक गैरसोयीचे आहे. रात्रीचे ओलीत करताना शेतक-यांना अडचण येते. कधी ब्रेकडाऊन तर कधी वीज पुरवठा खंडित होतो. वारंवार खंडित होणा-या वीज पुरवठ्यामुळे शेतकरी त्रस्त आहे. यामुळे ओलिताकरीता दिलेली मजुरी वाया जाते. एकीकडे मजुरीचे वाढलेले दर आणि भारनियमनातील अनियमितता यामुळे  शेतक-यांनी हे यंत्र विकत घेतले, असे शेतकरी सांगतात.