शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray pats Raj Thackeray Video : कौतुकाची थाप..!! राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला...
2
Raj Thackeray : "तुमच्याकडे सत्ता विधान भवनात असेल, आमच्याकडे रस्त्यावर...",हिंदी सक्तीवरुन राज ठाकरेंचा राज्य सरकारला इशारा
3
"३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी..."; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली
4
Uddhav Thackeray : "आमच्या दोघांमधला अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला"; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
5
Raj Thackeray : ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली, या आरोपावर राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
6
मराठी कलाकारांसमोर राज ठाकरेंकडून बॉलिवूडच्या ए.आर.रहमानचं कौतुक, सांगितला 'तो' प्रसंग
7
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ...तर आहोत आम्ही गुंड; उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान
8
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
9
"एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी, आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं," उद्धव ठाकरेंचं सूचक विधान
10
Raj Thackeray : जास्त नाटकं केली, तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे; पण...; राज ठाकरेंचा 'सैनिकां'ना आदेश
11
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
12
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
13
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
14
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
15
"इथेच येऊन बिजनेस करता आणि...", सुशील केडियांवर संतापले भरत जाधव, म्हणाले- "मराठी माणसाने जागं व्हायला हवं..."
16
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
17
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, ती उदाहरणं देत साधला निशाणा
18
Raj-Uddhav Thackeray Rally : "मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद
19
आषाढीला करा उपासाची थंडगार रसमलाई; घरचे खुश होतील, पुन्हा पुन्हा मागून खातील!
20
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?

आता विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांना दंडासह वेळप्रसंगी मिळेल काठीचा प्रसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2021 05:00 IST

जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी सक्तीच्या संचारबंदीचा आदेश निर्गमित करताच महसूल, पोलीस तसेच राजस्व विभाग अलर्ट मोडवर आला आहे. मागील रविवारी संचारबंदीच्या काळात काही बेशिस्त विनाकारण घराबाहेर फिरत असल्याचे संचारबंदीची अंमलबजावणी करणाऱ्यांच्या निदर्शनास आले होते. काही बेशिस्तांमुळेच वर्धा तालुक्यात कोरोनाचा झपाट्याने प्रसार होत असल्याने संचारबंदीच्या काळात बेशिस्तांवर धडक कारवाई केली जाणार आहे.

ठळक मुद्देसक्तीच्या संचारबंदीत वर्धा तालुक्यावर केले जाणार लक्ष केंद्रित : उपविभागीय महसूल अधिकाऱ्यांसह उपविभागीय पोलीस अधिकारी उतरणार रस्त्यावर

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रसार लक्षात घेऊन जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी शनिवार, २७ फेब्रुवारी रोजी रात्री ८ ते सोमवार १ मार्च सकाळी ८ पर्यंत सक्तीची संचारबंदी लागू केली आहे. याच संचारबंदीच्या काळात विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असून, वेळप्रसंगी बेशिस्तांना काठीचा प्रसादही मिळणार आहे. ३६ तासांच्या संचारबंदीच्या काळात जिल्हा प्रशासन कोरोनाचा हॉटस्पॉट ठरू पाहणाऱ्या वर्धा तालुक्यावर लक्ष केंद्रित करणार आहे.जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी सक्तीच्या संचारबंदीचा आदेश निर्गमित करताच महसूल, पोलीस तसेच राजस्व विभाग अलर्ट मोडवर आला आहे. मागील रविवारी संचारबंदीच्या काळात काही बेशिस्त विनाकारण घराबाहेर फिरत असल्याचे संचारबंदीची अंमलबजावणी करणाऱ्यांच्या निदर्शनास आले होते. काही बेशिस्तांमुळेच वर्धा तालुक्यात कोरोनाचा झपाट्याने प्रसार होत असल्याने संचारबंदीच्या काळात बेशिस्तांवर धडक कारवाई केली जाणार आहे. वर्धा शहर व शहराशेजारील १३ गावांमध्ये संचारबंदीची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस, महसूल, नगरपालिका तसेच राजस्व विभागाची एकूण १२ पथके सज्ज करण्यात आली आहेत. याच पथकांतील अधिकारी व कर्मचारी बेशिस्तांवर दंडात्मक व फौजदारी कारवाई करणार आहेत. विशेष म्हणजे रविवारी वर्धा तालुक्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी एसडीएम सुरेश बगळे व एसडीपीओ पीयूष जगताप रस्त्यावर उतरणार आहेत.

शहरातील प्रमुख चौकांत केली जाणार नाकेबंदीसंचारबंदीच्या काळात विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांसह जिल्हा प्रशासनाने केले आहे. पण, मागील रविवारी अनेक व्यक्ती विनाकारण घराबाहेर पडल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे रविवार, २८ फेब्रुवारी रोजी कुणी व्यक्ती विनाकारण घराबाहेर पडत नाही ना? याची शहानिशा करण्यासाठी वर्धा शहरातील प्रमुख चौकांत पोलिसांकडून नाकेबंदी केली जाणार आहे.

२० व्यक्तींच्या उपस्थितीतच करता येणार लग्नसोहळारविवार, २८ फेब्रुवारी रोजी लग्नाचा मुहूर्त असल्याने काहींनी मंगल कार्यालये आरक्षित केली आहेत. असे असले तरी रविवारी जिल्ह्यात सक्तीची संचारबंदी लागू राहणार असल्याने या काळात केवळ २० व्यक्तींच्या उपस्थितीतच नागरिकांना लग्नसोहळे आटोपते घ्यावे लागणार आहेत.

विशेष पथकाचा राहणार वॉचसंचारबंदीच्या काळात जिल्हा प्रशासनाच्या सूचनांचे प्रत्येक मंगल कार्यालयात पालन केले जात आहे ना? याची शहानिशा करण्यासाठी मंडळ अधिकारी झामरे यांच्या नेतृत्वात विशेष पथक तयार करण्यात आले आहे. या पथकातील अधिकारी व कर्मचारी रविवारी वर्धा शहर आणि शहराशेजारील ग्रा.पं.च्या हद्दीत असलेल्या प्रत्येक मंगल कार्यालयात जाऊन प्रत्यक्ष पाहणी करणार आहेत. शिवाय बेशिस्तांवर दंडात्मक कारवाई होणार आहे.

परीक्षार्थ्यांनी ओळखपत्र ठेवावे सोबतरविवार, २८ फेब्रुवारी रोजी आरोग्य विभागाची परीक्षा आहे. या परीक्षार्थ्यांना संचारबंदीच्या काळात परीक्षा देण्यासाठी जाता येणार असले तरी प्रत्येक परीक्षार्थ्याने आपले ओखळपत्र सोबत ठेवणे क्रमप्राप्त आहे.

सक्तीच्या संचारबंदीच्या काळात वर्धा तालुक्यावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. संचारबंदीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी १२ पथके तयार करण्यात आली आहेत. संचारबंदीच्या काळात प्रत्येक व्यक्तीने घरात थांबून प्रशासनाला सहकार्य करावे.- सुरेश बगळे, उपविभागीय महसूल अधिकारी, वर्धा.

 

टॅग्स :Policeपोलिसcorona virusकोरोना वायरस बातम्या