शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
2
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
3
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
6
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
7
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
8
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
9
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
10
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
11
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
12
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
13
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
14
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
15
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
16
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
17
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
18
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
19
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
20
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
Daily Top 2Weekly Top 5

दारूबंदीच्या जिल्ह्यात आता खर्रा विक्रेत्यांवर कारवाईचा बडगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 14:30 IST

वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली या तीन दारूबंदी असलेल्या जिल्ह्यात आता राज्यशासनाच्या अन्न औषध प्रशासनाने खर्रा विक्रेत्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. काही ठिकाणी लाखाच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

ठळक मुद्देअन्न औषध प्रशासन दंडात्मक कारवाईचा उगारला बडगा

अभिनय खोपडे ।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली या तीन दारूबंदी असलेल्या जिल्ह्यात आता राज्यशासनाच्या अन्न औषध प्रशासनाने खर्रा विक्रेत्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. काही ठिकाणी लाखाच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे या व्यवसायिकांवर बेरोजगारीचे दाट संकट निर्माण झाले आहे. व्यसनमुक्ती कार्यक्रमाला गती देण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले असले तरी याचे परिणाम वाईट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.वर्धा जिल्ह्यात पूर्वीपासून दारूबंदी आहे. तर गडचिरोली जिल्ह्यात १९९२ पासून दारूबंदी करण्यात आली. चंद्रपूर जिल्ह्यात १५ एप्रिल २०१६ पासून दारूबंदी करण्यात आली आहे. या तीनही जिल्ह्यात बंदी असली तरी राजरोसपणे दारूची अवैध विक्री केली जात असल्याचे वास्तव आहे. राज्याच्या सिमावर्ती भागासह राज्याची उपराजधाणी असलेल्या नागपूर व दारूविक्री खुली असलेल्या जिल्ह्यांमधून कोट्यावधी रूपयाची दारू आणून या तीन जिल्ह्यांमध्ये विकली जात आहे. असे असताना आता या जिल्ह्यात व्यसनमुक्तीच्या उद्देशाने पानठेला विक्रेत्यांवर कारवाई केली जात आहे. वर्धा जिल्ह्यात गेल्या महिन्याभरात ७० वर अधिक पानठेला व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. तर १६ पानसेंटर अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी सील केले. इतकेच नव्हे तर हिंगणघाट येथे खर्रा तयार करणारा कारखाना सील करण्यात आला. अन्न व औषध प्रशासनाकडून झालेल्या कारवाईला न्यायालयात पानठेला व्यावसायिकांनी आव्हान दिले आहे.खर्रा व पान विक्री करून कुटुंबाचा गाढा ओढणाऱ्या या छोट्या व्यावसायिकांवर अन्न व औषध प्रशासनाच्या या कारवाईमुळे बेरोजगारीचे संकट निर्माण झाले आहे. राज्यसरकारने आमचे पुनर्वसन करावे, आम्हाला दुसऱ्या रोजगारासाठी विना व्याज कर्ज पुरवठा करावा. त्यानंतर खर्रा व पान विक्रीचा व्यवसाय करणाºयांवर कारवाई करावी, असे या छोट्या व्यावसायिकांचे म्हणणे आहे. यापूर्वी गडचिरोली येथेही अशी कारवाई करण्यात आली होती. त्यावेळी विविध राजकीय पक्षानी सरकारच्या या भूमिकेचा निषेध केला होता.

व्यसनमुक्तीसाठी एकाच जिल्ह्याला निधीराज्याचे वित्त व नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या आग्रहामुळे चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी करण्यात आली. त्यावेळी वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली या तीन जिल्ह्याच्या दारूबंदी झोनमध्ये व्यसनमुक्ती कार्यक्रम राबविला जाईल, असे जाहीर करण्यात आले होते. मात्र, मागील तीन वर्षात केवळ गडचिरोली जिल्ह्यातील एका स्वयंसेवी संस्थेला ५ कोटी रूपयाचा निधी हा कार्यक्रम राबविण्यासाठी देण्यात आला. मुक्तीपथ अभियान नावाने हा कार्यक्रम राबविण्यात आला असला तरी वर्धा व चंद्रपूर या जिल्ह्याला व्यसनमुक्तीच्या कामासाठी एक कवडीही मिळाली नाही. त्यामुळे राज्यसरकारच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.

दारूबंदीबाबत पुर्नविचार करण्याची मागणीराज्यसरकारने केवळ तीनच जिल्ह्यात दारूबंदी केली आहे. मात्र, येथे राजरोसपणे अवैध दारूविक्री केली जात आहे. त्यामुळे या दारूबंदीच्या निर्णयाबाबत फेरविचार करावा, अशी मागणी भाजपसह विविध पक्षाच्या आमदारांनी मुख्यमंत्र्यांकडे यापूर्वी अनेकदा केली आहे. एका सत्ताधारी आमदाराने तर विधानसभेत दारूच्या व्यसनामुळे किती व्यक्ती दगावले याची आकडेवारी विधानसभेच्या पटलावर ठेवली होती, हे विशेष.

टॅग्स :Crimeगुन्हा