शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

सुपीकता वाढीसाठी आता तंत्रज्ञानाचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 23:36 IST

रासायनिक खते, फवारण्यांच्या भडीमारामुळे जमिनीची सुपीकता नष्ट होत आहे. परिणामी, शेतमालाचे उत्पादन दिवसेंदिवस घटत असून पिकांवरील रोगांची संख्या वाढीस लागली आहे.

ठळक मुद्देश्रेडर यंत्र ठरणार उपयोगी : बोंडअळीचे कोष नष्ट करण्याचा मार्ग

प्रशांत हेलोंडे।ऑनलाईन लोकमतवर्धा : रासायनिक खते, फवारण्यांच्या भडीमारामुळे जमिनीची सुपीकता नष्ट होत आहे. परिणामी, शेतमालाचे उत्पादन दिवसेंदिवस घटत असून पिकांवरील रोगांची संख्या वाढीस लागली आहे. या सर्वांवर सेंद्रिय शेती, हाच एक पर्याय असल्याचे सर्वमान्य असले तरी प्रत्यक्ष कुणी धाडस करताना दिसत नाही; पण आता बोंडअळीच्या निमित्ताने का होईना शेतकरी ‘श्रेडर’ या यंत्राच्या साह्याने शेतातील कपाशी काढत आहे. जमिनीचाब कस वाढविण्यासाठी हे तंत्रज्ञान उपयुक्त ठरणारे आहे.कपाशीवर गुलाबी व बोंडअळीने हल्ला केला. परिणामी, एक-दोन वेच्यातच शेतातील कापूस संपला. काहींनी धाडस तथा खर्च करून उर्वरित कापूस वेचला; पण तो विविध आजारांना जन्म देणारा ठरत आहे. शिवाय व्यापारी तो खरेदी करीत नसल्याने शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागत आहे. बोंडअळीने हल्ला केलेली कपाशीची शेती सध्या शेतकºयांना डोकेदुखीच ठरत आहे. कपाशी उपटण्याकरिता मजूर सापडत नाही. शिवाय ती मुळासकट शेतातून बाहेर करायची असल्याने अधिक पैसा खर्च करावा लागणार आहे. यामुळे अनेक शेतकऱ्यांनी अद्यापही कपाशीची शेती जैसे थे ठेवल्याचे दिसते. असे असले तरी पूढील खरीप हंगामासाठी जमीन मोकळी करावी लागणार आहे. यामुळे शेतकरी मिळेल त्या मार्गाने कपाशीची शेती रिकामी करीत आहे.कपाशीची शेतजमीन रिकामी करण्यासाठी शेतकऱ्यांना मागील दोन वर्षांत नवीन पर्याय उपलब्ध आहे. ट्रॅक्टरच्या साह्याने चालविता येणाऱ्या ‘श्रेडर’ यंत्राद्वारे शेतातील कपाशीची झाडे उपटून टाकता येतात. हे यंत्र केवळ पऱ्हाटी उपटतच नाही तर त्याचे बारिक कुटारामध्ये रूपांतर करते. यामुळे शेतकरी, शेतमजुरांचे श्रम वाचतात. शिवाय कपाशीच्या झाडांची बारिक भुकटी शेतातच पडून राहिल्याने बायोमास जमिनीत जाऊन सुपिकता वाढते. यामुळे श्रेडर हे यंत्र शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीकडे नेणारा दुवा ठरणार असल्याचेच दिसते.१२०० ते १५०० रुपये एकरप्रमाणे खर्चसध्या काहीच गावांमध्ये श्रेडर हे यंत्र शेतकऱ्यांनी खरेदी केले आहे. या यंत्राद्वारे शेतकरी शेतातील कपाशी काढून घेत आहेत. हे यंत्र कमी असल्याने कपाशी काढण्याकरिता अधिक आकारणी केली जात असल्याचे दिसत आहे. सध्या १२०० ते १५०० रुपये प्रती एकरप्रमाणे कपाशीची काढणी केली जात आहे. ही रक्कम अधिक वाटत असली तरी शेतकऱ्यांना मजुरांकडून कपाशी काढण्याकरिताही सुमारे ८०० ते १००० रुपये प्रती एकर खर्च लागत आहे. या यंत्राचा फायदा अधिक असल्याने शेतकऱ्यांनी त्याद्वारे कपाशीची उलंगवाढी करणे उपयुक्त ठरणार आहे.शासनाकडून सबसिडीशेतकºयांना श्रेडर खरेदी करण्यासाठी यांत्रिकीकरण योजनेतून शासनाकडून ६३ हजार रुपयांची सबसिडी दिली जाते. सदर यंत्राची बाजारात किंमत १ लाख ७५ हजार रुपये असून शेतकºयांना केवळ १ लाख १२ हजार रुपये खर्च करायचे आहे. यातून ट्रॅक्टरधारक शेतकºयांना व्यवसायही उपलब्ध होऊ शकतो. या यंत्राद्वारे कपाशीची काढणी करण्यासाठी यंत्रधारकास डिझेल, चालक असा ६०० रुपये प्रतीएकर खर्च येतो. यामुळे यातून चांगला रोजगार उपलब्ध होऊ शकतो.प्रत्येक गावातील किमान एका ट्रॅक्टरधारक शेतकऱ्याने श्रेडर मशीन खरेदी करावी. या माध्यमातून रोजगार उपलब्ध होणार आहे. शिवाय गावातच यंत्र राहिल्यास शेतकऱ्यांनाही कमी खर्चामध्ये शेतजमिनी रिकाम्या करता येतील.- ज्ञानेश्वर भारती, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वर्धा.