शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

आता रेशनऐवजी रक्कम; साडेआठ हजार शेतकऱ्यांना लाभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2024 16:38 IST

शेतकरी आत्महत्याप्रवण जिल्ह्यासाठी योजना : एपीएल शेतकरी कार्डधारकांना मिळतोय लाभ

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : विदर्भ मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त १४ जिल्ह्यांमध्ये एपीएल शेतकरी रेशन कार्डधारक शेतकऱ्यांना आता रेशनऐवजी दरमहा १७० रुपयांचा लाभ त्यांच्या खात्यात जमा केला जात आहे. जिल्ह्यात या योजनेंतर्गत २ हजार ४६६ कार्डधारक असून, ८ हजार ७४६ शेतकरी लाभार्थीच्या खात्यात जुलैपर्यंतची रक्कम टाकण्यात आली आहे.

अन्य रेशनकार्डधारक शेतकऱ्यांप्रमाणे या शेतकऱ्यांनाही यापूर्वी दोन रुपये किलो तांदूळ व तीन रुपये किलो गव्हाचा लाभ देण्यात येत होता. मात्र, या योजनेत यानंतर धान्य पुरविता येणार नसल्याचे भारतीय अन्न महामंडळाने ३१ मे व १ सप्टेंबर २०२२ रोजी शासनाला कळविले आहे. त्यामुळे या रेशन कार्डधारकांना आता रेशनधान्याऐवजी दरमहा १५० रुपये देण्याचे पुरवठा विभागाने सुरू केलेले आहे. त्यानंतर या रकमेमध्ये २० रुपयांनी वाढ करण्यात आल्याने आता प्रतिलाभार्थी १७० रुपयांचा लाभ देण्यात येत आहे. 

या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी रेशन कार्डधारक लाभार्थीना संबंधित स्वस्त धान्य दुकानदाराकडे अर्ज द्यावा लागतो व अर्जाचा नमुनादेखील तेथेच मिळतो. अर्जासोबत बँक पासबुकच्या पहिल्या पानाची व रेशनकार्डच्या पहिल्या व शेवटच्या पानाची प्रत जोडावी लागत असल्याची माहिती आहे. 

तालुकानिहाय लाभार्थी शिधापत्रिकाधारकआर्ची - १,१८६देवळी - ४,१९१हिंगणघाट - १,९६६वर्धा - १,४०३

लाभार्थी संख्या - ८,७४६शेतकरी रेशनकार्डधारक - २,४६६

"एपीएल शेतकरी शिधापत्रिका धारकांना धान्याऐवजी पैसे देण्यात येत आहेत. जिल्ह्यात एपीएल डीबीटीद्वारे ८,७४६ लाभार्थीच्या खात्यात रक्कम जमा करण्यात आली आहे." - शालिकराम भराडी, जिल्हा पुरवठा अधिकारी.

टॅग्स :government schemeसरकारी योजनाwardha-pcवर्धा