शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
4
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
5
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
6
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
7
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
8
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
9
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
10
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
11
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
12
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
13
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
14
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
15
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
16
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
17
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
18
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
19
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
20
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!

आता वाळूसाठा असलेल्या जागा मालकावर होणार कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2020 05:00 IST

जिल्ह्यातील वाळू घाटांचे लिलाव झाले नसले तरीही वाळू चोरट्यांनी नदी-नाल्यांसह लिलावाकरिता प्रस्तावित असलेल्या घाटातून वारेमाप उपसा चालविला आहे. नदीलगतच्या शेतकऱ्यांशी जवळीक साधून तसेच मुख्य मार्गालत असलेल्या मोकळ्या भुखंडाचा आडोसा घेत नदीपात्रातून काढलेल्या वाळूचा त्या जागेवर मोठ्या प्रमाणात साठा केल्या जातो. काही वाळू चोरट्यांनी शहरालगतच्या परिसरातील सोयीच्या जागेवर वाळू साठवून ठेवलेली आहेत.

ठळक मुद्देउपविभागीय अधिकाऱ्यांचे निर्देश : तिन्ही तालुक्यात शोध मोहीम सुुरु

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : नदी-नाल्यांतून अवैधरित्या उपसा केलेल्या वाळूचा मोकळ्या जागेवर ठिय्या मारला जात आहे. कारवाईदरम्यान तो ठिय्या जप्त केल्यानंतर वाळू चोरट्यांचा थांगपत्ता लागल नाही. त्यामुळे आता वाळूचा ठिय्या ज्या जागेवर असेल त्या जागा मालकाच्या विरुद्ध पचनामा, जप्तीनामा करुन दंडात्मक कारवाई किंवा वेळप्रसंगी गुन्हा दाखल करण्याचे निर्देश, उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे यांनी तहसीलदारांना दिले आहेत. त्यामुळे आता तिन्ही तालुक्यात वाळूच्या ठिय्यांचा शोध घेतला जात आहे.जिल्ह्यातील वाळू घाटांचे लिलाव झाले नसले तरीही वाळू चोरट्यांनी नदी-नाल्यांसह लिलावाकरिता प्रस्तावित असलेल्या घाटातून वारेमाप उपसा चालविला आहे. नदीलगतच्या शेतकऱ्यांशी जवळीक साधून तसेच मुख्य मार्गालत असलेल्या मोकळ्या भुखंडाचा आडोसा घेत नदीपात्रातून काढलेल्या वाळूचा त्या जागेवर मोठ्या प्रमाणात साठा केल्या जातो. काही वाळू चोरट्यांनी शहरालगतच्या परिसरातील सोयीच्या जागेवर वाळू साठवून ठेवलेली आहेत. शासनाकडे महसूल न भरताही मोठ्या प्रमाणात वाळूसाठा करण्यात आल्याने तो कोणाचा आहे, याचा शोध घेण्याकरिता अधिकाऱ्यांनाही अडचणीचे ठरत आहे. त्यामुळे वर्धा, देवळी व सेलू या तिन्ही तालुक्यात वाळू साठ्यांचा शोध घेण्यास सुरुवात झाली आहे. ज्या ठिकाणी वाळूचा साठा आढळून येईल, त्या जागा मालकाच्या पाठीमागे आता कारवाईचा ससेमिरा लागणार आहे.त्यामुळे आता शेतकऱ्यांनी आपले शेत किंवा भूखंड मालकाने आपल्या भुखंडावर वाळू साठा असल्यास वेळीच तक्रार करण्याची गरज आहे. अन्यथा त्यांच्या विरुद्ध दंडात्मक कारवाई किंवा फौजदारी कारवाई होण्याची शक्यता बळावली आहे.सुरगावातून साळूसाठा केला जप्तसेलू तालुक्यातील सुरगाव येथे गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरु आहे. यासंदर्भात लोकमतने वारंवार वृत्तही प्रकाशित केले. सोमवारी सुरगाव व महाकाळमध्ये कारवाई कधी? या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करताच खुद्द उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे यांच्या नेतृत्वात महाकाळ व सुरगाव गाठले. सुरगाव नदीपात्राच्या काठावर जवळपास १५ ते १६ ब्रास वाळूसाठा आढळून आला असून तो सेलू तहसील कार्यालयाच्या प्रांगणात आणण्यात आला आहे. या कारवाईमुळे सध्या वाळू चोरट्यांचे धाबे दणाणले आहे.ह्यत्याह्ण वाळू चोरट्यांचा मोर्चा भदाडी नदीवरचार दिवसांपूर्वी देवळी तालुक्यातील टाकळी (चणा) येथील नदीपात्रातून वाळू उपसा करताना महसूल विभागाने सालोड येथील अमोल कामडी व गिरोली येथील विवेक फरताडे यांची वाहने पडकून दंड ठोठावला. तसेच पोलिसांत गुन्हाही दाखल केला आहे. आता या वाळूचोरट्यांनी आपला मोर्चा सोनेगाव (बाई) व सिरसगाव (धनाढ्य) येथील भदाडी नदीपात्राकडे वळविल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली आहे. वायगाव (निपाणी) येथून जाणाऱ्या आडमार्गाने ही वाहतूक सुरु असल्याने रस्त्याची वाट लागली आहे. त्यामुळे वाळू चोरट्यांचा कायमचा बंदोबस्त करण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.वाळू चोरीचे प्रमाण वाढल्याने आळा घालण्यासाठी वर्धा, देवळी व सेलू तहसीलदारांना कठोर कारवाईचे निर्देश दिले आहे. सोबतच तालुक्यातील वाळू साठ्यांचा शोध घेऊन ज्या जागेवर वाळूसाठा असेल त्या जागा मालकाविरुद्ध पंचनामा, जप्तीनामा करुन पुढील कारवाई करण्याच्या लेखी सूचना केल्या आहे. त्यानुसार तिन्ही तालुक्यामध्ये कारवाईचा धडका सुरु झाला आहे.- सुरेश बगळे, उपविभागीय अधिकारी, वर्धा.

टॅग्स :sandवाळूSmugglingतस्करी