शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
4
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
5
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
6
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
7
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
8
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
9
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
10
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
11
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
12
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
13
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
14
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
15
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
16
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
17
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
18
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
19
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
20
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

प्लास्टिक उत्पादकांना नोटीस बजावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2019 22:27 IST

निरुपयोगी प्लास्टिक व्यवस्थापन धोरणातंर्गत जिल्ह्यात प्लास्टिकचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना निरुपयोगी प्लास्टिक संकलन करुन त्याचे पुन:निर्मिती करणे बंधनकारक आहे. मात्र, जिल्ह्यात प्लास्टिक बॉटल आणि दुध पिशव्यांची निर्मिती करणाऱ्या कंपन्या निरुपयोगी प्लास्टिकचे संकलन करत नसल्याचे निदर्शनास आले आहे.

ठळक मुद्देविवेक भिमनवार : पर्यावरण समितीची विशेष बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : निरुपयोगी प्लास्टिक व्यवस्थापन धोरणातंर्गत जिल्ह्यात प्लास्टिकचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना निरुपयोगी प्लास्टिक संकलन करुन त्याचे पुन:निर्मिती करणे बंधनकारक आहे. मात्र, जिल्ह्यात प्लास्टिक बॉटल आणि दुध पिशव्यांची निर्मिती करणाऱ्या कंपन्या निरुपयोगी प्लास्टिकचे संकलन करत नसल्याचे निदर्शनास आले आहे. अशा अशा कंपन्याना संकलन आणि पुन:निर्मिती करण्याबाबत, नोटीस देऊन जाब विचारण्याच्या सूचना जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी दिल्यात.जिल्हा पर्यावरण समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. यावेळी पर्यावरणा संबंधी विविध प्रश्नाचा आढावा घेताना ते बोलत होते. याप्रसंगी जि.प. मुख्य कार्यपालन अधिकारी सचिन ओंबासे, उपवनसरंक्षक सुनील शर्मा, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी राहुल वानखेडे, पर्यावरण तज्ज्ञ चोपडा, अशासकिय सदस्य मुरलीधर बेलखोडे, डॉ. सागर हेमके आदींची उपस्थिती होती.नगर परिषद क्षेत्रातील घनकचरा व्यवस्थापन व सांडपाणी प्रक्रिया सयंत्र बसविणे याबाबत बैठकीत चर्चा झाली. नगर परिषद तसेच नगरपंचायत यांनी घनकचरा व्यवस्थापनासाठी लागणारी जागा निश्चित करुन त्यावर घनकचरा व्यवस्थापन व हाताळणी अधिनियमांतर्गत कार्यवाही करणे आवश्यक आहे. मात्र, पुलगाव नगर परिषद क्षेत्रातील घनकचरा संकलन, व्यवस्थापन व हाताळणी व्यवस्थित होत नसल्याबाबत चोपडा यांनी प्रश्न उपस्थित केला. याबाबत नगर परिषद, हिंगणघाट व वर्धा येथील घरगुती सांडपाणी प्रक्रिया सयंत्रणेचे काम सुरू झाले असून ते लवकरात लवकर पुर्ण होण्याबाबत जिल्हा प्रशासन अधिकारी यांनी पाठपुरावा करावा, असे जिल्हाधिकारी भिमनवार यांनी सांगितले.हिंगणघाट नगर परिषद क्षेत्रात घरगुती सांडपाणी विना प्रक्रिया वणा नदी मध्ये मिसळत असल्यामुळे वणा नदी तिरावरील कवडघाट ते हिंगणघाट हा परिसर प्रदुषित झाला आहे. त्यामुळे प्रदुषित पट्टयाच्या कृती आराखडयामध्ये हा परिसर मोडत असून हिंगणघाट नगर परिषदे तर्फे डिसेंबर २०२० पर्यंत सांडपाणी सयंत्राची उभारणी करणे आवश्यक असल्याचे प्रादेशिक अधिकारी राहुल वानखेडे यांनी सांगितले.याबाबत जिल्हाधिकारी यांनी हिंगणघाट आणि वर्धा शहराकरिता घरगुती सांडपाणी प्रक्रिया संयत्रण प्रकल्पाचे काम मंजूर झाले असून डिसेंबर २०१९ पर्यंत पूर्ण होत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. मुरलीधर बेलखोडे आणि डॉ. सागर हेमके यांनी रस्ता बांधकामासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत असल्याबाबत समितीला अवगत केले. याबाबत जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता टाके यांच्याची तात्काळ दुरध्वनीवरून संपर्क साधून त्याना कडक शब्दात सुचना दिल्या.उद्योगांना सहा महिन्यांची मुदतदेवळी एमआयडीसीमधील महालक्ष्मी टीएमटी या उद्योगामुळे मोठ्या प्रमाणात वायुप्रदूषण होत असल्याची तक्रार राहुल चोपडा यांनी मांडली. याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने सदर उद्योगाची तपासणी केली असून त्यांना पुरेशी वायु प्रदुषण नियंत्रण यंत्रणा बसविण्याबाबत. कळविण्यात आले आहे. सहा महिन्यात उद्योगाने वायु प्रदूषण नियंत्रण यंत्रणा न बसविल्यास सदर उद्योगावर कार्यवाही करण्यात येईल, असे यावेळी सांगण्यात आले.