शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

शौचालय बांधण्यासाठी ३०० घरांवर नोटीस

By admin | Updated: September 4, 2016 16:46 IST

शौचालय नसलेल्या कुटुंबांना शौचालय बांधण्याची सूचना देण्याचा एक वेगळाच प्रयोग जिल्ह्यातील रिसोड पंचायत समितीच्यावतीने राबविण्यात येत आहे.

दादाराव गायकवाड, ऑनलाइन लोकमत

वाशिम, दि. ४ -  शौचालय नसलेल्या कुटुंबांना शौचालय बांधण्याची सूचना देण्याचा एक वेगळाच प्रयोग जिल्ह्यातील रिसोड पंचायत समितीच्यावतीने राबविण्यात येत असून, या अंतर्गत शौचालय नसलेल्या घरांवर शौचालय बांधण्याची सूचना देणारी नोटीसच लावण्यात येत आहे. या आशयाच्या नोटीस आतापर्यंत जवळपास ३०० घरांवर लावण्यात आल्या.
 
वाशिम जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्यावतीने अत्यंत काटेकोरपणे स्वच्छ भारत मिशनची अंमलबजावणी करण्यात येत आहे. शासनाच्या या अभियानांतर्गत निर्धारित केलेले विविध कार्यक्रम वेगवेगळ्या पद्धतीने राबवून हे अभियान तडीस नेण्याचा जणू संकल्पच जिल्हा परिषदेच्या स्वच्छता व पाणी पुरवठा विभाग तथा स्वच्छता मिशन कक्षाने केला असून, यासाठी त्यांना जि.प.च्या पदाधिका-यांसह जिल्ह्यातील सर्वच पंचायत समित्यांचे पदाधिकारी आणि अधिकारी यांचे सहकार्य लाभत आहे. 
स्वच्छता आणि पाणी पुरवठा विभागाच्यावतीने जिल्हाभरात ‘भेटीगाठी स्वच्छतेसाठी’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत जिल्ह्यात ३५ हजार कुटुंबांच्या भेटी घेऊन त्यांच्याशी संवाद साधून त्यांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यासह त्यांना शौचालय बांधण्यास प्रेरित करण्यात येत आहे.
 
या अंतर्गत प्रत्येक पंचायत समिती आपापल्यापरीने वेगवेगळ्या संकल्पना अस्तित्वात आणत असताना रिसोड पंचायत समितीनेही एक वेगळीची संकल्पना राबविण्यास सुरुवात केली आहे. स्वच्छतेसाठी भेटीगाठी या अभियानात रिसोड तालुक्यात ४ हजार कुटुंबांच्या भेटी घेण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले असून, यासाठी पंचायत समितीचे पदाधिकारी हिरीरीने पुढाकार घेत आहेत. 
 
गत २२ ऑगस्टपासून सुरू झालेल्या या अभियानांतर्गत तालुक्यात आतापर्यंत ६०० कुटूंबाच्या भेटी घेऊन त्यांच्याशी संवाद साधत शौचालय बांधण्याचे आवाहन करण्यात आले. त्याशिवाय पंचायत समितीने शौचालय नसलेल्या घरांवर शौचालय बांधण्याची सूचना देणारी नोटीस लावण्यास सुरुवात केली आहे. संबंधित कुटूंबप्रमुखाच नावानिशी लावण्यात येत असलेल्या य नोटीसमध्ये असे नमूद करण्यात आले आहे, की ‘‘आपण रात असलेल्या घरी शौचालय बांधकाम केले नसून, आपण व आपला संपूर्ण परिवार उघड्यावर शौचास जाता. 
 
त्यामुळे आपण आपले व गावकºयांचे आरोग्य आणि परिसरही दुषित करीत आहात. उघड्यावर शौचास बसणे हा दंडनिय अपराध असून,  आपणाविरोधात मुंबई पोलिस अधिनियम १९५१ मधील कलम ११५ व ११७ अंतर्गत सहा महिन्यांची कैद व बाराशे रुपये दंडाची कारवाई होऊ शकते.’’ 
 
या आशयाच्या नोटीस आतापर्यंत जवळपास ३०० घरांवर लावण्यात आल्या असून, त्यावर रिसोड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आणि गटसमन्वयकाची स्वाक्षरीही आहे. या अभिनव उपक्रमामुळे रिसोड तालुक्यातील शौचालय नसलेल्या कुटुंबांनी धास्ती घेतली आहेच; परंतु त्यांना स्वच्छतेचे महत्त्वही पटले असून, प्रत्येक कुटूंब शौचालय बांधण्यासाठी प्रेरित होत असल्याचे दिसत आहे.