शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
6
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
7
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
8
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
9
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
10
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
11
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
12
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
13
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
14
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
15
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
16
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
17
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
18
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
19
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
20
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?

स्मार्ट सिटीसाठी इंचभरही जमीन देणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 23:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : समृद्धी महामार्गासाठी जमिन संपदनाची प्रक्रिया सुरू असली तरी योग्य मोबदला मिळाल्या शिवाय स्मार्ट सिटी करीता इंचभरही जमीन देणार नाही, असा निर्धार विरुळ येथे पार पडलेल्या शेतकरी सभेत शेतकऱ्यांची केला.तालुक्यांमधील विरूळ येथे ज्या शेतकऱ्यांची शेतजमीन समृद्धी महामार्गात गेली आहे व या भूसंपादनामध्ये शासन शेतकऱ्यांवर विविध प्रकारे अन्याय ...

ठळक मुद्देशेतकऱ्यांचा निर्धार : विरूळ येथील शेतकरी सभा

लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : समृद्धी महामार्गासाठी जमिन संपदनाची प्रक्रिया सुरू असली तरी योग्य मोबदला मिळाल्या शिवाय स्मार्ट सिटी करीता इंचभरही जमीन देणार नाही, असा निर्धार विरुळ येथे पार पडलेल्या शेतकरी सभेत शेतकऱ्यांची केला.तालुक्यांमधील विरूळ येथे ज्या शेतकऱ्यांची शेतजमीन समृद्धी महामार्गात गेली आहे व या भूसंपादनामध्ये शासन शेतकऱ्यांवर विविध प्रकारे अन्याय करीत आहे, अशा प्रकल्प बाधित शेतकऱ्यांची विशेष सभा रविवारी घेण्यात आली. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून महात्मा फुले समता परिषदेचे विभागीय संघटक प्रा. दिवाकर गमे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. त्यांनी मार्गदर्शन करताना कायदा आपल्या बाजुने आहे. कुणाच्याही दबावाला किंवा फसव्या आमिषाला शेतकºयांनी बळी पडण्याची गरज नाही. आपला निर्धार आणि एकजुट असली तरच शासनाकडून आपण कायदेशीर संघर्ष करून आपल्या मागण्या मान्य करू घेऊ शकतो, असे यावेळी त्यांनी सांगितले.अनेक शेतकऱ्यांवर जमिनींची किंमत ठरवताना अन्याय झाला आहे. त्यांनी आपली निवेदने देवून आपल्या जमिनीचे मोल पुर्णपणे घ्यावे. त्यासाठी आपण पुन्हा संघर्ष करण्यासाठी तयार आहो असेही यावेळी प्रा. गमे यांनी सांगितले. या सभेत शेतकऱ्यांसह काही मान्यवरांनी मनोगत व्यक्त करीत सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांचा निषेध नोंदविला. सभेत ज्या शेतकऱ्यांची शेतजमिन समृद्धी मार्गासाठी जाणार आहे त्यांना योग्य मोबदला न मिळाल्यास आंदोलन करण्याचे एकमताने निश्चित करण्यात आले. याप्रसंगी अ‍ॅड. महेंद्र धोटे यांनी उपस्थितांना कायदेविषयक माहिती दिली. तसेच प्रा. सय्यद, विनय डहाके, जीतेंद्र गोरडे, निळकंठ राऊत यांनीही मनोगत व्यक्त केले. सभेला राजेंद्र झिले, विनोद पारिसे, लुकेश सावरकर, संतोष डोळे, प्रवीण झाडे, अनिल गळहाट, मनोहर गोंडाने, गोविंद मेहरे, सुभाष भोयर, गुणवंत धामले, रमेश उरकुडे, देवानंद कनेरी, वंजारी यांच्यासह विरूळ, रसुलाबाद भागातील शेतकरी हजर होते.योग्य मोबदला न मिळाल्यास आंदोलनविरुळ येथे पार पडलेल्या विशेष सभेत विविध मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी कायदे तज्ज्ञांनीही शेतकऱ्यांच्या बाजूने असलेल्या कायद्यांची माहिती दिली. अ‍ॅड. महेंद्र धोटे यांनी कुठल्याही आमिषांना शेतकऱ्यांनी बळी पडू नये, असे आवाहन केले. इतकेच नव्हे तर सभेदरम्यान ज्या शेतकऱ्यांची शेतजमिन समृद्धी मार्गासाठी संपादीत होणार आहे त्यांना योग्य मोबदला न दिल्यास रस्त्यावर येत तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. सभेला परिसरातील शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.