शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

स्मार्ट सिटीसाठी इंचभरही जमीन देणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 23:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : समृद्धी महामार्गासाठी जमिन संपदनाची प्रक्रिया सुरू असली तरी योग्य मोबदला मिळाल्या शिवाय स्मार्ट सिटी करीता इंचभरही जमीन देणार नाही, असा निर्धार विरुळ येथे पार पडलेल्या शेतकरी सभेत शेतकऱ्यांची केला.तालुक्यांमधील विरूळ येथे ज्या शेतकऱ्यांची शेतजमीन समृद्धी महामार्गात गेली आहे व या भूसंपादनामध्ये शासन शेतकऱ्यांवर विविध प्रकारे अन्याय ...

ठळक मुद्देशेतकऱ्यांचा निर्धार : विरूळ येथील शेतकरी सभा

लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : समृद्धी महामार्गासाठी जमिन संपदनाची प्रक्रिया सुरू असली तरी योग्य मोबदला मिळाल्या शिवाय स्मार्ट सिटी करीता इंचभरही जमीन देणार नाही, असा निर्धार विरुळ येथे पार पडलेल्या शेतकरी सभेत शेतकऱ्यांची केला.तालुक्यांमधील विरूळ येथे ज्या शेतकऱ्यांची शेतजमीन समृद्धी महामार्गात गेली आहे व या भूसंपादनामध्ये शासन शेतकऱ्यांवर विविध प्रकारे अन्याय करीत आहे, अशा प्रकल्प बाधित शेतकऱ्यांची विशेष सभा रविवारी घेण्यात आली. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून महात्मा फुले समता परिषदेचे विभागीय संघटक प्रा. दिवाकर गमे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. त्यांनी मार्गदर्शन करताना कायदा आपल्या बाजुने आहे. कुणाच्याही दबावाला किंवा फसव्या आमिषाला शेतकºयांनी बळी पडण्याची गरज नाही. आपला निर्धार आणि एकजुट असली तरच शासनाकडून आपण कायदेशीर संघर्ष करून आपल्या मागण्या मान्य करू घेऊ शकतो, असे यावेळी त्यांनी सांगितले.अनेक शेतकऱ्यांवर जमिनींची किंमत ठरवताना अन्याय झाला आहे. त्यांनी आपली निवेदने देवून आपल्या जमिनीचे मोल पुर्णपणे घ्यावे. त्यासाठी आपण पुन्हा संघर्ष करण्यासाठी तयार आहो असेही यावेळी प्रा. गमे यांनी सांगितले. या सभेत शेतकऱ्यांसह काही मान्यवरांनी मनोगत व्यक्त करीत सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांचा निषेध नोंदविला. सभेत ज्या शेतकऱ्यांची शेतजमिन समृद्धी मार्गासाठी जाणार आहे त्यांना योग्य मोबदला न मिळाल्यास आंदोलन करण्याचे एकमताने निश्चित करण्यात आले. याप्रसंगी अ‍ॅड. महेंद्र धोटे यांनी उपस्थितांना कायदेविषयक माहिती दिली. तसेच प्रा. सय्यद, विनय डहाके, जीतेंद्र गोरडे, निळकंठ राऊत यांनीही मनोगत व्यक्त केले. सभेला राजेंद्र झिले, विनोद पारिसे, लुकेश सावरकर, संतोष डोळे, प्रवीण झाडे, अनिल गळहाट, मनोहर गोंडाने, गोविंद मेहरे, सुभाष भोयर, गुणवंत धामले, रमेश उरकुडे, देवानंद कनेरी, वंजारी यांच्यासह विरूळ, रसुलाबाद भागातील शेतकरी हजर होते.योग्य मोबदला न मिळाल्यास आंदोलनविरुळ येथे पार पडलेल्या विशेष सभेत विविध मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी कायदे तज्ज्ञांनीही शेतकऱ्यांच्या बाजूने असलेल्या कायद्यांची माहिती दिली. अ‍ॅड. महेंद्र धोटे यांनी कुठल्याही आमिषांना शेतकऱ्यांनी बळी पडू नये, असे आवाहन केले. इतकेच नव्हे तर सभेदरम्यान ज्या शेतकऱ्यांची शेतजमिन समृद्धी मार्गासाठी संपादीत होणार आहे त्यांना योग्य मोबदला न दिल्यास रस्त्यावर येत तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. सभेला परिसरातील शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.