शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

स्मार्ट सिटीसाठी इंचभरही जमीन देणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 23:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : समृद्धी महामार्गासाठी जमिन संपदनाची प्रक्रिया सुरू असली तरी योग्य मोबदला मिळाल्या शिवाय स्मार्ट सिटी करीता इंचभरही जमीन देणार नाही, असा निर्धार विरुळ येथे पार पडलेल्या शेतकरी सभेत शेतकऱ्यांची केला.तालुक्यांमधील विरूळ येथे ज्या शेतकऱ्यांची शेतजमीन समृद्धी महामार्गात गेली आहे व या भूसंपादनामध्ये शासन शेतकऱ्यांवर विविध प्रकारे अन्याय ...

ठळक मुद्देशेतकऱ्यांचा निर्धार : विरूळ येथील शेतकरी सभा

लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : समृद्धी महामार्गासाठी जमिन संपदनाची प्रक्रिया सुरू असली तरी योग्य मोबदला मिळाल्या शिवाय स्मार्ट सिटी करीता इंचभरही जमीन देणार नाही, असा निर्धार विरुळ येथे पार पडलेल्या शेतकरी सभेत शेतकऱ्यांची केला.तालुक्यांमधील विरूळ येथे ज्या शेतकऱ्यांची शेतजमीन समृद्धी महामार्गात गेली आहे व या भूसंपादनामध्ये शासन शेतकऱ्यांवर विविध प्रकारे अन्याय करीत आहे, अशा प्रकल्प बाधित शेतकऱ्यांची विशेष सभा रविवारी घेण्यात आली. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून महात्मा फुले समता परिषदेचे विभागीय संघटक प्रा. दिवाकर गमे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. त्यांनी मार्गदर्शन करताना कायदा आपल्या बाजुने आहे. कुणाच्याही दबावाला किंवा फसव्या आमिषाला शेतकºयांनी बळी पडण्याची गरज नाही. आपला निर्धार आणि एकजुट असली तरच शासनाकडून आपण कायदेशीर संघर्ष करून आपल्या मागण्या मान्य करू घेऊ शकतो, असे यावेळी त्यांनी सांगितले.अनेक शेतकऱ्यांवर जमिनींची किंमत ठरवताना अन्याय झाला आहे. त्यांनी आपली निवेदने देवून आपल्या जमिनीचे मोल पुर्णपणे घ्यावे. त्यासाठी आपण पुन्हा संघर्ष करण्यासाठी तयार आहो असेही यावेळी प्रा. गमे यांनी सांगितले. या सभेत शेतकऱ्यांसह काही मान्यवरांनी मनोगत व्यक्त करीत सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांचा निषेध नोंदविला. सभेत ज्या शेतकऱ्यांची शेतजमिन समृद्धी मार्गासाठी जाणार आहे त्यांना योग्य मोबदला न मिळाल्यास आंदोलन करण्याचे एकमताने निश्चित करण्यात आले. याप्रसंगी अ‍ॅड. महेंद्र धोटे यांनी उपस्थितांना कायदेविषयक माहिती दिली. तसेच प्रा. सय्यद, विनय डहाके, जीतेंद्र गोरडे, निळकंठ राऊत यांनीही मनोगत व्यक्त केले. सभेला राजेंद्र झिले, विनोद पारिसे, लुकेश सावरकर, संतोष डोळे, प्रवीण झाडे, अनिल गळहाट, मनोहर गोंडाने, गोविंद मेहरे, सुभाष भोयर, गुणवंत धामले, रमेश उरकुडे, देवानंद कनेरी, वंजारी यांच्यासह विरूळ, रसुलाबाद भागातील शेतकरी हजर होते.योग्य मोबदला न मिळाल्यास आंदोलनविरुळ येथे पार पडलेल्या विशेष सभेत विविध मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी कायदे तज्ज्ञांनीही शेतकऱ्यांच्या बाजूने असलेल्या कायद्यांची माहिती दिली. अ‍ॅड. महेंद्र धोटे यांनी कुठल्याही आमिषांना शेतकऱ्यांनी बळी पडू नये, असे आवाहन केले. इतकेच नव्हे तर सभेदरम्यान ज्या शेतकऱ्यांची शेतजमिन समृद्धी मार्गासाठी संपादीत होणार आहे त्यांना योग्य मोबदला न दिल्यास रस्त्यावर येत तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. सभेला परिसरातील शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.