शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
3
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
4
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
5
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
6
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
7
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
8
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
9
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
10
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
11
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
12
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
13
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
14
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
15
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
16
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
17
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
18
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
19
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
20
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...

कोविडमुळे नव्हे, तर डेंग्यू बाधितांमुळे दोन्ही रुग्णालयं होताहेत फुल्ल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 05:00 IST

कीटकजन्य आजार असलेल्या डेंग्यूबाबत वर्धेकर अजूनही गंभीर नसल्याने तसेच गाफील असल्यागत वागत असल्याने येत्या काही दिवसांत डेंग्यू बाधितांना रुग्णालयात जमिनीवर झोपवून त्यांच्यावर उपचार करण्याची वेळ येऊ शकत असल्याचे आरोग्य यंत्रणेतील तज्ज्ञ सांगतात. त्यामुळे सध्या प्रत्येक नागरिकाने डेंग्यूबाबत खबरदारीच्या उपाययोजनांचे पालन करण्याची गरज आहे.

ठळक मुद्देयंदा एकाचा घेतला बळी : सावधान ! ७० टक्के रुग्णांना चढवाव्या लागतेय प्लेटलेट्स

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यात सध्या नवीन कोविडबाधित सापडण्याची गती मंदावली असली तरी डेंग्यू या आजाराने चांगलेच डोकेवर काढल्याने कोरोनामुळे नव्हे, तर डेंग्यू बाधितांमुळे रुग्णालयांमधील रुग्णखाटा फुल्ल होत आहेत. सेवाग्राम आणि सावंगी (मेघे) येथील रुग्णालयात सध्या सुमारे १२९ हून अधिक डेंग्यूसदृश बाधितांवर उपचार सुरू असून, नागरिकांनीही दक्ष राहण्याची गरज आहे. विशेष म्हणजे सध्या ७० टक्के रुग्णांना प्लेटलेट्स चढवाव्या लागत आहेत. मागील साडेतीन महिन्यांत जिल्ह्यात ९८ डेंग्यूबाधितांची नोंद घेण्यात आली आहे, तर एका व्यक्तीचा डेंग्यू या आजाराने बळी घेतला आहे. जिल्ह्यात नवीन कोविडबाधितांच्या तुलनेत डेंग्यू बाधितांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने सेवाग्राम आणि सावंगी (मेघे) येथील रुग्णालयात सध्या रुग्णखाटांचा तुटवडा जाणवायला सुरुवात झाली आहे. कीटकजन्य आजार असलेल्या डेंग्यूबाबत वर्धेकर अजूनही गंभीर नसल्याने तसेच गाफील असल्यागत वागत असल्याने येत्या काही दिवसांत डेंग्यू बाधितांना रुग्णालयात जमिनीवर झोपवून त्यांच्यावर उपचार करण्याची वेळ येऊ शकत असल्याचे आरोग्य यंत्रणेतील तज्ज्ञ सांगतात. त्यामुळे सध्या प्रत्येक नागरिकाने डेंग्यूबाबत खबरदारीच्या उपाययोजनांचे पालन करण्याची गरज आहे.

कस्तुरबाच्या मेडिसीन विभागातील सर्व बेड फुल्ल- काेविड संकटाच्या काळात प्रत्येक कोविडबाधिताला चांगली आरोग्य सेवा देण्यासाठी उपयुक्त ठरलेल्या सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयातील मेडिसीन विभागातील बेडवर सध्या डेंग्यूसदृश आजाराची लागण झालेल्यांवर उपचार सुरू आहेत. या रुग्णांमध्ये सुमारे ३० मुले असून, ७० टक्के रुग्णांना प्लेटलेट्स चढवाव्या लागत आहेत.

कस्तुरबा रुग्णालयातील मेडिसीन विभागात डेंग्यू बाधितांवर उपचार सुरू असून, सध्या रुग्णखाटा फुल्ल झाल्या आहेत. ७० टक्के डेंग्यू बाधितांना प्लेटलेट्स चढवाव्या लागत असून, नागरिकांनीही डेंग्यूची लक्षणे आढळल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने टेस्ट करून घेत औषधोपचार घ्यावा. शिवाय प्रत्येक नागरिकाने आपल्या घराच्या आवारात कुठे डासांची उत्पत्ती होत तर नाही ना याची शहानिशा करून अडलेले पाणी वाहते करावे.- डॉ. नितीन गगने, अधिष्ठाता, कस्तुरबा रुग्णालय, सेवाग्राम

डेंग्यू या कीटकजन्य आजाराने डोकेवर काढले आहे. त्यामुळे सहा नगरपालिका, चार नगरपंचायती व सर्व ग्रामपंचायतींना खबरदारीच्या उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.- डॉ. जयश्री थोटे, जिल्हा हिवताप अधिकारी, वर्धा

जिल्ह्यात डेंग्यू डोकेवर काढत आहे. त्यामुळे नागरिकानी दक्ष राहून खबरदारीच्या उपाययोजनांचे पालन करणे गरजेचे आहे. सावंगी (मेघे) येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात सध्या ४९ डेंग्यू बाधितांवर उपचार सुरू आहेत.- डॉ. चंद्रशेखर महाकाळकर, मुख्य वैद्यकीय अधीक्षक, आ.वि.भा. ग्रामीण रुग्णालय.

 

टॅग्स :dengueडेंग्यूHealthआरोग्य