शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

कोविडमुळे नव्हे, तर डेंग्यू बाधितांमुळे दोन्ही रुग्णालयं होताहेत फुल्ल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 05:00 IST

कीटकजन्य आजार असलेल्या डेंग्यूबाबत वर्धेकर अजूनही गंभीर नसल्याने तसेच गाफील असल्यागत वागत असल्याने येत्या काही दिवसांत डेंग्यू बाधितांना रुग्णालयात जमिनीवर झोपवून त्यांच्यावर उपचार करण्याची वेळ येऊ शकत असल्याचे आरोग्य यंत्रणेतील तज्ज्ञ सांगतात. त्यामुळे सध्या प्रत्येक नागरिकाने डेंग्यूबाबत खबरदारीच्या उपाययोजनांचे पालन करण्याची गरज आहे.

ठळक मुद्देयंदा एकाचा घेतला बळी : सावधान ! ७० टक्के रुग्णांना चढवाव्या लागतेय प्लेटलेट्स

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यात सध्या नवीन कोविडबाधित सापडण्याची गती मंदावली असली तरी डेंग्यू या आजाराने चांगलेच डोकेवर काढल्याने कोरोनामुळे नव्हे, तर डेंग्यू बाधितांमुळे रुग्णालयांमधील रुग्णखाटा फुल्ल होत आहेत. सेवाग्राम आणि सावंगी (मेघे) येथील रुग्णालयात सध्या सुमारे १२९ हून अधिक डेंग्यूसदृश बाधितांवर उपचार सुरू असून, नागरिकांनीही दक्ष राहण्याची गरज आहे. विशेष म्हणजे सध्या ७० टक्के रुग्णांना प्लेटलेट्स चढवाव्या लागत आहेत. मागील साडेतीन महिन्यांत जिल्ह्यात ९८ डेंग्यूबाधितांची नोंद घेण्यात आली आहे, तर एका व्यक्तीचा डेंग्यू या आजाराने बळी घेतला आहे. जिल्ह्यात नवीन कोविडबाधितांच्या तुलनेत डेंग्यू बाधितांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने सेवाग्राम आणि सावंगी (मेघे) येथील रुग्णालयात सध्या रुग्णखाटांचा तुटवडा जाणवायला सुरुवात झाली आहे. कीटकजन्य आजार असलेल्या डेंग्यूबाबत वर्धेकर अजूनही गंभीर नसल्याने तसेच गाफील असल्यागत वागत असल्याने येत्या काही दिवसांत डेंग्यू बाधितांना रुग्णालयात जमिनीवर झोपवून त्यांच्यावर उपचार करण्याची वेळ येऊ शकत असल्याचे आरोग्य यंत्रणेतील तज्ज्ञ सांगतात. त्यामुळे सध्या प्रत्येक नागरिकाने डेंग्यूबाबत खबरदारीच्या उपाययोजनांचे पालन करण्याची गरज आहे.

कस्तुरबाच्या मेडिसीन विभागातील सर्व बेड फुल्ल- काेविड संकटाच्या काळात प्रत्येक कोविडबाधिताला चांगली आरोग्य सेवा देण्यासाठी उपयुक्त ठरलेल्या सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयातील मेडिसीन विभागातील बेडवर सध्या डेंग्यूसदृश आजाराची लागण झालेल्यांवर उपचार सुरू आहेत. या रुग्णांमध्ये सुमारे ३० मुले असून, ७० टक्के रुग्णांना प्लेटलेट्स चढवाव्या लागत आहेत.

कस्तुरबा रुग्णालयातील मेडिसीन विभागात डेंग्यू बाधितांवर उपचार सुरू असून, सध्या रुग्णखाटा फुल्ल झाल्या आहेत. ७० टक्के डेंग्यू बाधितांना प्लेटलेट्स चढवाव्या लागत असून, नागरिकांनीही डेंग्यूची लक्षणे आढळल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने टेस्ट करून घेत औषधोपचार घ्यावा. शिवाय प्रत्येक नागरिकाने आपल्या घराच्या आवारात कुठे डासांची उत्पत्ती होत तर नाही ना याची शहानिशा करून अडलेले पाणी वाहते करावे.- डॉ. नितीन गगने, अधिष्ठाता, कस्तुरबा रुग्णालय, सेवाग्राम

डेंग्यू या कीटकजन्य आजाराने डोकेवर काढले आहे. त्यामुळे सहा नगरपालिका, चार नगरपंचायती व सर्व ग्रामपंचायतींना खबरदारीच्या उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.- डॉ. जयश्री थोटे, जिल्हा हिवताप अधिकारी, वर्धा

जिल्ह्यात डेंग्यू डोकेवर काढत आहे. त्यामुळे नागरिकानी दक्ष राहून खबरदारीच्या उपाययोजनांचे पालन करणे गरजेचे आहे. सावंगी (मेघे) येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात सध्या ४९ डेंग्यू बाधितांवर उपचार सुरू आहेत.- डॉ. चंद्रशेखर महाकाळकर, मुख्य वैद्यकीय अधीक्षक, आ.वि.भा. ग्रामीण रुग्णालय.

 

टॅग्स :dengueडेंग्यूHealthआरोग्य