शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
3
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
4
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
5
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
6
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
7
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
8
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
9
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
10
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
11
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
12
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
13
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
14
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
15
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
16
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
17
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
18
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
19
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
20
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 

वर्धा जिल्ह्यात हागणदारी मुक्तीचे कागदी घोडे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 13:08 IST

Wardha news मार्च २०१८ मध्ये वर्धा जिल्हा हागणदारीमुक्त झाला ५१३ ग्रामपंचायतीमधील सुमारे एका लाखावरील कुटुंबीयांकडे वैयक्तिक शौचालये असल्याचे कागदावर दिसून आले.

ठळक मुद्देअनेक कुटुंब शौचालयाविनाकागदावर मात्र शंभरटक्के उद्दिष्टपूर्ती

लोकमत न्यूज नेटवर्क 

वर्धा : मार्च २०१८ मध्ये जिल्हा हागणदारीमुक्त झाला ५१३ ग्रामपंचायतीमधील सुमारे एका लाखावरील कुटुंबीयांकडे वैयक्तिक शौचालये असल्याचे कागदावर दिसून आले. परंतु, त्यानंतर सुद्धा ग्रामीण भागातील नागरिक उघड्यावर शौच करण्यास जात असल्याचे वास्तव आहे. परिणामी, जिल्ह्यात हागणदारीमुक्तीचा फज्जा उडाल्याचे दिसून येत आहे. ‘स्वच्छ भारत अभियाना’ अंतर्गत ग्रामीण भागात शौचालय बांधण्याचा कार्यक्राम राबविण्यात आला. त्यासाठी २०११ मध्ये पायाभूत सर्वेक्षणाचा आधार घेण्यात आला. ५१३ ग्रामपंचायतीमध्ये जिल्हा हागणदारीमुक्त करण्यासाठी नियाेजन करण्यात आले. दारिद्र्य रेषेखालील (बीपीएल) आणि दारिद्र्य रेषेवरील (एपीएल) लाभार्थी कुटुंबांना शौचालय बांधकामासाठी प्रत्येकी १२ हजार रुपयांचे अनुदान देण्यात आले. मार्च २०१८ मध्ये जिल्ह्यातील सव्वालाख कुटुंबाकडे शौचालये असल्याचा दावा करण्यात आला. असे असले तरी प्रत्यक्षात मात्र, जिल्ह्यातील चित्र वेगळेच आहे. ग्रामीण भागात अजूनही नागरिक उघड्यावरच शौच करण्यास जात आहेत.

गाववेशीपासूनच सुटतेय दुर्गंधी

जिल्हा हागणदारीमुक्त झाल्याची नोंद शासन दरबारी करण्यात आली आहे. त्यानंतर सुद्धा खेडेगावांतच नाही तर शहरी भागात देखील उघड्यावर शौचास जाणाऱ्यांची संख्या कमी नाही. रस्त्याच्या दोन्ही बाजूने शौचास अनेकजण बसतात. परिणामी, गावाच्या वेशीपासूनच दुर्गंधी येत असते. म्हणजेच जिल्हा परिषद प्रशासनाकडून हागणदारीमुक्तीची कागदोपत्री घोषणा झाली असली तरी आज देखील गावे पूर्णपणे हागणदारीमुक्त झालेले नाही.

शौचालयांमध्ये भरतात भंगार

वैयक्तीक शौचालय उभारणीसाठी शासनाकडून लाभार्थ्यांना १२ हजार रुपयांचे अनुदान देण्यात येत होते. अनेकांनी हे अनुदान लाटण्यासाठी नुसत्याच शौचालयांच्या चार भिंती उभारल्या. कागदोपत्री शौचालय उभारणीचे काम दाखवून शासनाकडून मिळणारे अनुदान लाटण्याचे काम केले. असे असल्यानंतर देखील अनेकजण शौचालयाचा वापर न करता उघड्यावर शौचास जात असतात. तर बांधलेल्या शौचालयांचा वापर लाकडांचे सरपण तसेच भंगार ठेवण्यासाठी करत असल्याचे दिसून येत आहे.

गुड मॉर्निंग पथक कुचकामी

उघड्यावर शौचास बसणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी नगरपालिका आणि ग्रामपंचायत प्रशासनाने गुड मॉर्निंग पथकाची निर्मिती करण्यात आली हाेती. या पथकातील कर्मचारी गाववेशीवर सकाळी छापा मारुन उघड्यावर शौच करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करीत होते. पण, कालांतराने हे पथक गायब झाले असुन सध्या कुचकामी ठरत असल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :Governmentसरकार