शहरं
Join us  
Trending Stories
1
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
2
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
3
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
4
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
5
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत पर्यटक अनेक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
6
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
7
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
8
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!
9
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
10
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
11
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
12
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
13
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
14
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
15
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
16
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
17
विशेष लेख: ढिसाळ रेल्वे, बेदरकार प्रवासी हेच जबाबदार!
18
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
19
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
20
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक

वर्धा जिल्ह्यात हागणदारी मुक्तीचे कागदी घोडे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 13:08 IST

Wardha news मार्च २०१८ मध्ये वर्धा जिल्हा हागणदारीमुक्त झाला ५१३ ग्रामपंचायतीमधील सुमारे एका लाखावरील कुटुंबीयांकडे वैयक्तिक शौचालये असल्याचे कागदावर दिसून आले.

ठळक मुद्देअनेक कुटुंब शौचालयाविनाकागदावर मात्र शंभरटक्के उद्दिष्टपूर्ती

लोकमत न्यूज नेटवर्क 

वर्धा : मार्च २०१८ मध्ये जिल्हा हागणदारीमुक्त झाला ५१३ ग्रामपंचायतीमधील सुमारे एका लाखावरील कुटुंबीयांकडे वैयक्तिक शौचालये असल्याचे कागदावर दिसून आले. परंतु, त्यानंतर सुद्धा ग्रामीण भागातील नागरिक उघड्यावर शौच करण्यास जात असल्याचे वास्तव आहे. परिणामी, जिल्ह्यात हागणदारीमुक्तीचा फज्जा उडाल्याचे दिसून येत आहे. ‘स्वच्छ भारत अभियाना’ अंतर्गत ग्रामीण भागात शौचालय बांधण्याचा कार्यक्राम राबविण्यात आला. त्यासाठी २०११ मध्ये पायाभूत सर्वेक्षणाचा आधार घेण्यात आला. ५१३ ग्रामपंचायतीमध्ये जिल्हा हागणदारीमुक्त करण्यासाठी नियाेजन करण्यात आले. दारिद्र्य रेषेखालील (बीपीएल) आणि दारिद्र्य रेषेवरील (एपीएल) लाभार्थी कुटुंबांना शौचालय बांधकामासाठी प्रत्येकी १२ हजार रुपयांचे अनुदान देण्यात आले. मार्च २०१८ मध्ये जिल्ह्यातील सव्वालाख कुटुंबाकडे शौचालये असल्याचा दावा करण्यात आला. असे असले तरी प्रत्यक्षात मात्र, जिल्ह्यातील चित्र वेगळेच आहे. ग्रामीण भागात अजूनही नागरिक उघड्यावरच शौच करण्यास जात आहेत.

गाववेशीपासूनच सुटतेय दुर्गंधी

जिल्हा हागणदारीमुक्त झाल्याची नोंद शासन दरबारी करण्यात आली आहे. त्यानंतर सुद्धा खेडेगावांतच नाही तर शहरी भागात देखील उघड्यावर शौचास जाणाऱ्यांची संख्या कमी नाही. रस्त्याच्या दोन्ही बाजूने शौचास अनेकजण बसतात. परिणामी, गावाच्या वेशीपासूनच दुर्गंधी येत असते. म्हणजेच जिल्हा परिषद प्रशासनाकडून हागणदारीमुक्तीची कागदोपत्री घोषणा झाली असली तरी आज देखील गावे पूर्णपणे हागणदारीमुक्त झालेले नाही.

शौचालयांमध्ये भरतात भंगार

वैयक्तीक शौचालय उभारणीसाठी शासनाकडून लाभार्थ्यांना १२ हजार रुपयांचे अनुदान देण्यात येत होते. अनेकांनी हे अनुदान लाटण्यासाठी नुसत्याच शौचालयांच्या चार भिंती उभारल्या. कागदोपत्री शौचालय उभारणीचे काम दाखवून शासनाकडून मिळणारे अनुदान लाटण्याचे काम केले. असे असल्यानंतर देखील अनेकजण शौचालयाचा वापर न करता उघड्यावर शौचास जात असतात. तर बांधलेल्या शौचालयांचा वापर लाकडांचे सरपण तसेच भंगार ठेवण्यासाठी करत असल्याचे दिसून येत आहे.

गुड मॉर्निंग पथक कुचकामी

उघड्यावर शौचास बसणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी नगरपालिका आणि ग्रामपंचायत प्रशासनाने गुड मॉर्निंग पथकाची निर्मिती करण्यात आली हाेती. या पथकातील कर्मचारी गाववेशीवर सकाळी छापा मारुन उघड्यावर शौच करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करीत होते. पण, कालांतराने हे पथक गायब झाले असुन सध्या कुचकामी ठरत असल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :Governmentसरकार