शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

हरभऱ्याचे घरातच करावे लागणार काय फुटाणे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2019 13:12 IST

काबाडकष्ट करून चणा पिकविला. मात्र, मागील आठवडाभरापासून भावात सातत्याने घसरण होत असल्याने शेतकऱ्यांना घरातच चण्याचे फुटाणे तर करावे लागणार नाही ना? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देचिंताग्रस्त शेतकऱ्यांचा सवाल दरात आठवडाभरापासून होतेय घसरण

पुरुषोत्तम नागपुरे ।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : काबाडकष्ट करून चणा पिकविला. एकरी १० ते १४ क्विंटलपर्यंत उत्पादन झाले. मात्र, मागील आठवडाभरापासून भावात सातत्याने घसरण होत असल्याने शेतकऱ्यांना घरातच चण्याचे फुटाणे तर करावे लागणार नाही ना? असा प्रश्न निर्माण झाला आहे.हमी भावापेक्षा किमान १ हजार रूपये क्विंटल कमी भाव मिळत असून बाजारात चण्याची खरेदी ३ हजार ४०० रुपयांपर्यंत घसरल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहेत. हरभरा निघणे सुरू झाले, त्यावेळेस ४ हजार ८०० रुपये प्रतिक्विंटल भाव होता. बाजारात झपाट्याने आवक वाढताच चण्याचे भाव ३ हजार ४०० रुपयांवर आले. यामुळे शेतकऱ्यांचा लागवड खर्चही निघणे कठीण झाले आहे. उत्पादन खर्चाची जेमतेम तोंड मिळवणी होऊ शकेल. त्यामुळे शेतकऱ्यांचा नफाच गेला असून, शासनाने दीडपट भावाचे दाखविलेले शेतकऱ्यांचे स्वप्न भंगले आहे. त्यामुळे आता घरातच घुगऱ्या कराव्या लागणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.गेल्या हंगामात हरभऱ्याचा बाजार चांगलाच तेजीत होता. खासगीतही हमीभावाच्या बरोबरीने भाव मिळत होते. शासनाच्या पोर्टलवरही हरभरा चांगलाच भाव खाऊन गेला. त्यामुळे हरभऱ्याला चांगले दिवस येतील, असा शेतकऱ्यांचा समज होता. परंतु यावर्षीच्या मंदीने हा समज गैरसमज ठरत आहे. साडेचार हजारी पार केलेला हरभरा आता साडेतीन हजार रूपयांवर स्थिरावला आहे. आता हरभऱ्याचा हंगाम जोरात सुरू झाला. हंगामाच्या मध्यान्हात हरभरा आणखी खाली येईल का? अशी चिंता शेतकऱ्यांना पडली आहे. किमान उत्पादन खर्च निघण्याइतके दर मिळावे, अशी अपेक्षा शेतकरी करीत आहेत.शासनाची खरेदी कधी सुरू होणार आधारभूत किमतीमध्ये शासनामार्फत करण्यात येत असलेल्या हरभरा खरेदीला विलंब होत आहे. याचाही परिणाम खासगीत हरभऱ्याच्या बाजारावर पडतो. लहान-सहान शेतकरी अधिक काळ थांबू शकत नाहीत. शेतमाल विकून त्यांना रोजचे व्यवहार करावे लागतात. त्यामुळे असे शेतकरी शासनाच्या खरेदीची प्रतीक्षा न करता खासगीत माल विकून मोकळे होतात. त्यांना हमीभावाचा लाभ मिळू शकत नाही. शासनाच्या खरेदीला विलंब हे कारणदेखील हरभऱ्याचे दर पडण्याला कारणीभूत आहे. त्यामुळे चण्याचे घरातच फुटाणे फोडून द्यावे का? असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत.अधिक पिकले तर भाव पडतात, शेतकऱ्यांना हा अनुभव नवा नाही. कधी व्यापाऱ्यांकडून कवडीमोल भावात शेतमाल करून लूट केली जाते तर कधी शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे शेती व्ळवसायात तोटा सहन करावा लागतो. अशा परिस्थितीत करावे तरी काय, असा प्रश्न शेतकऱ्यांतून केला जात आहे.

लागवड खर्च निघणे अवघड तेजीत आलेला हरभरा, हीच तेजी कायम ठेवणार, अशी आशा होती. मात्र, अधिक उत्पन्न आणि बाजारात आवक सुरू झाल्यानंतर आता चणा चांगलाच मंदीत आला आहे. साडेचार हजारांवर गेलेले हरभऱ्याचे दर गेल्या दोन आठवड्यापासून सातत्याने घटत आहेत. आर्वी बाजार समितीत साडेतीन हजारांपासून चण्याची खरेदी सुरू आहे. या दरात लागवड खर्चही निघणे कठीण झाले आहे.

शेतकऱ्यांचा चणा पूर्णपणे कमी भावात विकून झाल्यावर शेवटच्या टप्प्यात एक महिन्यानंतर शासनाची खरेदी सुरू होण्याची शक्यता आहे.- विनोद कोटेवार, प्र. सचिव.

टॅग्स :agricultureशेती