शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
2
जीएसटी कपातीनंतरही कारवर जादा कर लागू शकतो...; सीएने केले विश्लेषण...
3
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
4
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
5
दोन वर्षाच्या मुलीसह अख्ख कुटुंब मृतावस्थेत आढळल्याने खळबळ; ५ जणांसोबत नेमकं काय घडलं? 
6
अभिनेत्रीला अश्लील मेसेज करणारा तो युवा नेता कोण? समोर आली धक्कादायक माहिती, राष्ट्रीय पक्षाशी संबंध 
7
4 वर्षांत तीन वेळा प्रेग्नंट, तुरुंगवासाची शिक्षा टाळण्यासाठी महिलेने भलताच मार्ग अवलंबला...! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
8
Mumbai Crime: 'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार
9
श्रावण अमावस्येला पिठोरी अमावस्या का म्हणतात? त्याच दिवशी असतो पोळा आणि मातृदिन
10
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
11
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर
12
ऑनलाइन गेमिंग विधेयकावरुन अनुपम मित्तल यांची सरकारवर टीका; म्हणाले 'या निर्णयामुळे थेट...'
13
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! १ ऑक्टोबरपासून 'हे' महत्त्वाचे फीचर कायमस्वरूपी बंद होणार
14
श्रावण शनि अमावास्या: शनिदोष, प्रतिकूल प्रभाव कसा ओळखावा? ‘हे’ ५ उपाय तारतील, कृपा होईल!
15
हा पी अर्जुन तेंडुलकर कोण? तुफानी खेळीत १२ चेंडूत ३ चौकार, ३ षटकार ठोकले; मुंबई इंडियन्सच्या नजरेत भरला?...
16
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
17
विद्यार्थ्याच्या हत्येवरून अहमदाबाद तापले, रस्त्यावर उतरले हजारो लोक, पोलीस आणि NSUI मध्ये वादावादी
18
युद्ध थांबण्याचे नाव नाही! रशियाचा युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला; एकाच वेळी डागली ४० क्षेपणास्त्र
19
छत गळतेय, उंदीर फिरतात आणि वीज नसते; इमरान खान यांच्या पत्नी बुशरा बीबींची तुरुंगात दयनीय अवस्था
20
Viral Video: लोणावळ्यात मद्यधुंद महिलांमध्ये फ्री-स्टाईलमध्ये हाणामारी; पोलीस आल्यानंतरही थांबल्या नाहीत!

हरभऱ्याचे घरातच करावे लागणार काय फुटाणे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2019 13:12 IST

काबाडकष्ट करून चणा पिकविला. मात्र, मागील आठवडाभरापासून भावात सातत्याने घसरण होत असल्याने शेतकऱ्यांना घरातच चण्याचे फुटाणे तर करावे लागणार नाही ना? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देचिंताग्रस्त शेतकऱ्यांचा सवाल दरात आठवडाभरापासून होतेय घसरण

पुरुषोत्तम नागपुरे ।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : काबाडकष्ट करून चणा पिकविला. एकरी १० ते १४ क्विंटलपर्यंत उत्पादन झाले. मात्र, मागील आठवडाभरापासून भावात सातत्याने घसरण होत असल्याने शेतकऱ्यांना घरातच चण्याचे फुटाणे तर करावे लागणार नाही ना? असा प्रश्न निर्माण झाला आहे.हमी भावापेक्षा किमान १ हजार रूपये क्विंटल कमी भाव मिळत असून बाजारात चण्याची खरेदी ३ हजार ४०० रुपयांपर्यंत घसरल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहेत. हरभरा निघणे सुरू झाले, त्यावेळेस ४ हजार ८०० रुपये प्रतिक्विंटल भाव होता. बाजारात झपाट्याने आवक वाढताच चण्याचे भाव ३ हजार ४०० रुपयांवर आले. यामुळे शेतकऱ्यांचा लागवड खर्चही निघणे कठीण झाले आहे. उत्पादन खर्चाची जेमतेम तोंड मिळवणी होऊ शकेल. त्यामुळे शेतकऱ्यांचा नफाच गेला असून, शासनाने दीडपट भावाचे दाखविलेले शेतकऱ्यांचे स्वप्न भंगले आहे. त्यामुळे आता घरातच घुगऱ्या कराव्या लागणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.गेल्या हंगामात हरभऱ्याचा बाजार चांगलाच तेजीत होता. खासगीतही हमीभावाच्या बरोबरीने भाव मिळत होते. शासनाच्या पोर्टलवरही हरभरा चांगलाच भाव खाऊन गेला. त्यामुळे हरभऱ्याला चांगले दिवस येतील, असा शेतकऱ्यांचा समज होता. परंतु यावर्षीच्या मंदीने हा समज गैरसमज ठरत आहे. साडेचार हजारी पार केलेला हरभरा आता साडेतीन हजार रूपयांवर स्थिरावला आहे. आता हरभऱ्याचा हंगाम जोरात सुरू झाला. हंगामाच्या मध्यान्हात हरभरा आणखी खाली येईल का? अशी चिंता शेतकऱ्यांना पडली आहे. किमान उत्पादन खर्च निघण्याइतके दर मिळावे, अशी अपेक्षा शेतकरी करीत आहेत.शासनाची खरेदी कधी सुरू होणार आधारभूत किमतीमध्ये शासनामार्फत करण्यात येत असलेल्या हरभरा खरेदीला विलंब होत आहे. याचाही परिणाम खासगीत हरभऱ्याच्या बाजारावर पडतो. लहान-सहान शेतकरी अधिक काळ थांबू शकत नाहीत. शेतमाल विकून त्यांना रोजचे व्यवहार करावे लागतात. त्यामुळे असे शेतकरी शासनाच्या खरेदीची प्रतीक्षा न करता खासगीत माल विकून मोकळे होतात. त्यांना हमीभावाचा लाभ मिळू शकत नाही. शासनाच्या खरेदीला विलंब हे कारणदेखील हरभऱ्याचे दर पडण्याला कारणीभूत आहे. त्यामुळे चण्याचे घरातच फुटाणे फोडून द्यावे का? असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत.अधिक पिकले तर भाव पडतात, शेतकऱ्यांना हा अनुभव नवा नाही. कधी व्यापाऱ्यांकडून कवडीमोल भावात शेतमाल करून लूट केली जाते तर कधी शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे शेती व्ळवसायात तोटा सहन करावा लागतो. अशा परिस्थितीत करावे तरी काय, असा प्रश्न शेतकऱ्यांतून केला जात आहे.

लागवड खर्च निघणे अवघड तेजीत आलेला हरभरा, हीच तेजी कायम ठेवणार, अशी आशा होती. मात्र, अधिक उत्पन्न आणि बाजारात आवक सुरू झाल्यानंतर आता चणा चांगलाच मंदीत आला आहे. साडेचार हजारांवर गेलेले हरभऱ्याचे दर गेल्या दोन आठवड्यापासून सातत्याने घटत आहेत. आर्वी बाजार समितीत साडेतीन हजारांपासून चण्याची खरेदी सुरू आहे. या दरात लागवड खर्चही निघणे कठीण झाले आहे.

शेतकऱ्यांचा चणा पूर्णपणे कमी भावात विकून झाल्यावर शेवटच्या टप्प्यात एक महिन्यानंतर शासनाची खरेदी सुरू होण्याची शक्यता आहे.- विनोद कोटेवार, प्र. सचिव.

टॅग्स :agricultureशेती